शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसला कमी जागा मिळाल्याने राहुल गांधी नाराज; नाना पटोलेंनी सांगितले बैठकीत काय झालं?
2
मेहबूब शेख यांच्या उमेदवारीमागे वेगळीच शंका; माजी आमदारांसह १५० पदाधिकाऱ्यांचा राजीनामा
3
पदयात्रेदरम्यान अरविंद केजरीवालांवर हल्ला; AAP चा दावा, भाजपवर हल्ल्याचा आरोप
4
Maharashtra Assembly election 2024: काटोलमध्ये महाविकास आघाडीत, तर उमरेडमध्ये महायुतीत बंडखोरी
5
कागलमध्ये राडा! मुश्रीफ आणि घाटगे समर्थक भिडले; एकमेकांची कॉलर पकडून हाणामारी
6
महायुतीत भाजपच मोठा भाऊ! साताऱ्यातील आणखी एक मतदारसंघ मिळण्याचे प्रयत्न
7
मनसेकडून पाच नावांची घोषणा, चौथ्या यादीत कोणत्या मतदारसंघात उतरवले उमेदवार?
8
आता खरी 'कसोटी'! बंगळुरू-पुणे मार्गावर खडतर प्रवास; भारत WTC फायनलमध्ये पोहोचणार?
9
महायुतीचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला? 'या' 12 जागांचा वाद कायम, तिन्ही पक्षांचा दावा...
10
भायखळ्यात यामिनी जाधवांविरोधात ठाकरेंचा शिलेदार ठरला; कोण आहेत मनोज जामसुतकर?
11
"आम्हाला ५ जागा द्या, अन्यथा २५ जागांवर लढणार’’, मित्रपक्षाचा मविआला इशारा 
12
मृत्यू केव्हा गाठणार? एका रिपोर्टवर AI टूल करते भविष्यवाणी; लोकांच्या हॉस्पिटलमध्ये लागल्यात रांगा
13
जबरदस्त! Whatsapp मध्ये येणार कमाल फीचर; मोबाईल न वापरता मॅनेज करू शकता कॉन्टॅक्ट्स
14
Maharashtra Assembly Election: दिंडोशीत सुनील प्रभूंविरोधात शिंदेंच्या शिवसेनेचा उमेदवार कोण?
15
हॉकीच्या 'राणी'ला निरोप! "देशातील प्रत्येक मुलीचा आत्मविश्वास वाढवला", IAS अधिकारी भारावली
16
Maharashtra Assembly election 2024: अंधेरी पूर्वची जागा शिंदेंच्या शिवसेनेला की, भाजपला?
17
"वर्षभर वेळ मागितला, तरी दिला नाही; मातोश्रीवर गेलो तिथे ६ तास थांबवलं अन् २ मिनिटे भेटले"
18
अभिनेता पृथ्वीक प्रतापने साधेपणाने लग्न का केलं? कारण वाचून तुम्हीलाही वाटेल हेवा!
19
भारत-चीन सैन्य मागे घेण्यास सुरुवात; येत्या तीन दिवसांत टेंट, शेड अन् इमारती हटवल्या जाणार

नाशिक : शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी निघालेला लॉन्ग मार्च मोर्चा मुंबईच्या दिशेने

By संदीप भालेराव | Published: March 14, 2023 12:52 PM

आदिवासींच्या वन जमिनी बरोबरच शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी निघालेला लॉन्ग मार्च मोर्चा मंगळवारी मुंबईच्या दिशेने निघाला आहे.

नाशिक : आदिवासींच्या वन जमिनी बरोबरच शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी निघालेला लॉन्ग मार्च मोर्चा मंगळवारी मुंबईच्या दिशेने निघाला आहे. दरम्यान, आज दुपारी साडेतीन वाजता मुख्यमंत्र्यांबरोबर होणाऱ्या बैठकीनंतर मोर्चा बाबत निर्णय घेतला जाईल अशी माहिती मोर्चाचे नेतृत्व करणारे माजी आमदार जे.पी. गावीत त्यांनी दिली

गेल्या रविवारपासून नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी येथून आदिवासींचे हे लाल वादळ विधिमंडळावर मोर्चा घेऊन निघाले आहे. सोमवारी नाशिक जवळील आंबे बहुला गावात रात्रीचा मुक्काम केल्यानंतर मंगळवारी सकाळी मोर्चेकरी मुंबईकडे निघाले. मोर्चात सुमारे दहा हजार आदिवासी बांधव सहभागी झाले असून आतापर्यंत त्यांनी सुमारे 70 किलोमीटर पायी अंतर पूर्ण केले आहे. मुख्यमंत्र्यांच्या बैठकीनंतरही निर्णय झाल्यास मोर्चा तसाच सुरू राहणार असून 23 मार्चपर्यंत मुंबई गाठण्याचे नियोजन आहे. 

दरम्यान, मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनुसार पाच जणांचे शिष्टमंडळ दुपारी मुंबईकडे रवाना होणार असून मुख्यमंत्र्यांबरोबर आदिवासींच्या प्रश्नांवर चर्चा होणार आहे. एकीकडे चर्चा सुरू असली तरी मोर्चा मात्र मुंबईच्या दिशेने चालतच राहणार असल्याचे गावित यांनी सांगितले

टॅग्स :FarmerशेतकरीNashikनाशिक