शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
3
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
4
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
5
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
6
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
7
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
8
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
9
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
10
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
11
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
12
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
13
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
14
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
15
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
16
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
17
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
18
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
19
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
20
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!

कमी दाबाचा पट्टा, मानवी हस्तक्षेप पुराची प्रमुख कारणे : डॉ. प्रमोद हिरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2021 01:25 IST

बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण होताच गंगापूर धरणातून विसर्ग केल्यास गोदावरीला येणारा पूर टाळता येऊ शकतो. त्यामुळे ऐनवेळी पाण्याचा विसर्ग करण्याची वेळ येणार नाही. चक्रीवादळे आणि कमी दाबाचा पट्टा निर्माण होणे ही पूरस्थितीची प्रमुख कारणे असून, काही मानवनिर्मित कारणेदेखील असल्याचे मत डॉ. प्रमोद हिरे यांनी व्यक्त केले. तसेच गोदावरीला आलेल्या पुराच्या पातळीविषयी डॉ. हिरे यांनी माहिती दिली.

ठळक मुद्दे नदी महोत्सवाची जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सांगता
नाशिक : बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण होताच गंगापूर धरणातून विसर्ग केल्यास गोदावरीला येणारा पूर टाळता येऊ शकतो. त्यामुळे ऐनवेळी पाण्याचा विसर्ग करण्याची वेळ येणार नाही. चक्रीवादळे आणि कमी दाबाचा पट्टा निर्माण होणे ही पूरस्थितीची प्रमुख कारणे असून, काही मानवनिर्मित कारणेदेखील असल्याचे मत डॉ. प्रमोद हिरे यांनी व्यक्त केले. तसेच गोदावरीला आलेल्या पुराच्या पातळीविषयी डॉ. हिरे यांनी माहिती दिली.नदी महोत्सवात ‘ऊर्ध्व गोदावरी नदीवरील आधुनिक पूर : कारणे आणि परिणाम’ या विषयावर ते बोलत होते. मंगळवारी (दि. २१) दरबार हॉल, सरकारवाडा येथे या महोत्सवाची सांगता झाली. जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमास पुरातत्त्व विभागाच्या साहाय्यक संचालक आरती आळे, उपजिल्हाधिकारी नितीन मुंडावरे, योगेश कासार उपस्थित होते.डॉ. हिरे म्हणाले, ज्या पुरांचे मोजमाप करण्यात आले त्यास ‘आधुनिक पूर’ म्हणतात; तर मोजमाप नसलेले पूर ऐतिहासिक पूर आहेत. नोंदी नसलेल्या प्राचीन पुरांचा अभ्यास सुरू आहे. नाशिकमध्ये दुतोंड्या मारुती पूर मोजण्याचे प्रमाण मानले जाते. मात्र तो शास्त्रीय आधार नाही. भारतात ५०० वर्षांपूर्वीच्या पुराची नोंद आढळत नाही. सक्रिय आणि जोमदार मान्सून, कमी दाबाचे पट्टे ही पुराची प्रमुख कारणे आहेत. पूर ही नैसर्गिक प्रक्रिया असली तरी मानवनिर्मित कारणांमुळे पुराचे प्रमाण वाढले आहे. १९६९ च्या तुलनेत गोदावरी व गिरणा नद्यांना मोठा पूर आले नसल्याचा दावा त्यांनी केला. गोदावरीला १९१९ मध्ये पूर विसर्गाने मोठा होता. तर १९६९ मध्ये पाण्याची पातळी मोठी असल्याचे त्यांनी सांगितले.--दुष्काळ अधिक त्रासदायक : जिल्हाधिकारीबंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण होताच धरणातून विसर्ग केल्यास पुराचे नियंत्रण करता येऊ शकते, असे मत डॉ. हिरे यांनी मांडले. मात्र, कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला तर पाऊस येईलच असे नसल्याचे जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी सांगितले. दुष्काळाच्या तुलनेत पुराचा सामना करणे सोपे असते. दुष्काळ जास्त त्रासदायक असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. पूर आटोक्यात आणण्यासाठीचे पर्याय आणि उपाययोजनांची जिल्हाधिकाऱ्यांनी चाचपणी केली.
टॅग्स :Nashikनाशिकcollectorजिल्हाधिकारी