शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या अध्यक्षपदी मधु मंगेश कर्णिक

By admin | Updated: June 17, 2014 00:07 IST

विश्वस्तपदी अशोक हांडे : पाच वर्षांसाठी नियुक्ती

 

नाशिक : येथील कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक मधु मंगेश कर्णिक यांची नियुक्ती करण्यात आली आहे, तर विश्वस्तपदाच्या एका जागेवर प्रसिद्ध कलाकार अशोक हांडे यांची नियुक्ती झाली आहे. विश्वस्त मंडळाच्या नुकत्याच झालेल्या सभेत ही नियुक्ती करण्यात आली. कुसुमाग्रज प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. जब्बार पटेल यांच्या विश्वस्तपदाची मुदत येत्या २५ जून रोजी संपत आहे. त्यामुळे विश्वस्त मंडळाच्या बैठकीत नवीन अध्यक्षपदाच्या निवडीबाबत चर्चा करण्यात आली. त्यात एकमताने ज्येष्ठ साहित्यिक मधु मंगेश कर्णिक यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. याशिवाय प्रतिष्ठानच्या विश्वस्तपदी ‘मराठा बाणा’ फेम प्रसिद्ध कलावंत अशोक हांडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या उपाध्यक्ष रंजना पाटील व प्रा. हर्षवर्धन कडेपूरकर यांची विश्वस्तपदाची मुदत संपल्याने त्यांच्या रिक्तपदांवर मधु मंगेश कर्णिक व अशोक हांडे यांची विश्वस्तपदी नियुक्ती करण्यात आल्याचे प्रतिष्ठानचे कार्यवाह लोकेश शेवडे यांनी सांगितले. अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आलेले मधु मंगेश कर्णिक यांनी साहित्य क्षेत्रात आपली वेगळीच ओळख निर्माण केलेली असून, त्यांनी महाराष्ट्र राज्य साक्षरता व संस्कृती विभागाचे अध्यक्षपद, महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे अध्यक्ष व राज्य मराठी विकास संस्थेचे अतिरिक्त संचालकपद भूषविले आहे. याशिवाय कोकण कला अकादमी, नाथ पै वनराई ट्रस्ट यांचे ते संस्थापकही आहेत. शैक्षणिक क्षेत्रात योगदान असणाऱ्या मधु मंगेश कर्णिक यांनी साहित्यातील कथा, कादंबरी या वाङ्मय प्रकारांत विपुल लेखन केले आहे.  तात्यांचे माझ्यावर ऋणकविश्रेष्ठ कुसुमाग्रजांचे एक लेखक म्हणून माझ्यावर मोठे ऋण आहेत. त्यांच्या नावाने असलेल्या प्रतिष्ठानच्या अध्यक्षपदी निवड झाल्याने तात्यांच्या या ऋणातून अंशत: उतराई होण्याचा मी नम्रपणे प्रयत्न करेन. वयोमानामुळे मी आता कोणतीही पदे स्वीकारत नाहीत. परंतु प्रतिष्ठानच्या विश्वस्त मंडळाने आग्रह धरल्याने मी विनम्र भावनेने ही जबाबदारी स्वीकारली आहे. यथाशक्ती जबाबदारी पार पाडण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करेन. - मधु मंगेश कर्णिक जब्बार पटेल टीकेचेच धनीप्रसिद्ध दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल यांनी दहा वर्षे अध्यक्षपदाची धुरा सांभाळली; परंतु पटेल यांची कारकीर्द नेहमीच टीकेस पात्र ठरली. जब्बार पटेल यांच्या नियुक्तीवरूनच त्यावेळी मोठी टीका झाली होती. स्थानिक व्यक्तींऐवजी बाहेरील व्यक्तींना अध्यक्ष व विश्वस्तपदी नेमले जात असल्याने आणि सदर व्यक्ती प्रतिष्ठानच्या कार्यास वेळ देऊ शकत नसल्याने पटेल यांना विरोध झाला होता. या विरोधानंतरही विश्वस्त मंडळाने पुन्हा एकदा नाशिक बाहेरील व्यक्तीची निवड केल्याने साहित्य क्षेत्रात आश्चर्य व्यक्त केले जात आहे.