शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी सिंधू करार मोडला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
2
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
3
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
4
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई
5
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
6
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
7
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
8
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
9
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
10
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
11
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
12
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
13
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
14
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
15
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
16
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
17
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
18
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
19
काश्मीरला जाण्यासाठी अनेक महिने पैसे साठवले; आनंद, स्वप्न पूर्ण करायला गेले अन् घात झाला 
20
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...

विद्यमान आमदार अडचणीत असल्यास नवीन प्रयोग, इच्छुकांपैकी काहीजण नाराज होणे स्वाभाविक: तावडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2024 07:47 IST

विनोद तावडे म्हणाले की, शरद पवारांनी ठरवले असते, तर मराठा समाजाला ओबीसीमध्ये आरक्षण मिळाले असते. परंतु, त्यांनी कधीही मराठा समाजाला आरक्षण दिले नाही.

लोकमत न्यूज नेटवर्क, नाशिक : भाजपमध्ये तिकीट वाटपाची एक पद्धती आहे. ज्यात कार्यकर्त्यांचे, जनतेचे मत सर्वेक्षणाच्या माध्यमातून समजावून घेतले जाते. त्याआधारे प्राधान्यक्रम ठरवला जातो. सामाजिक, राजकिय, सर्व बाजूंनी विचार, चर्चा केल्यानंतर जागा ठरवण्याची पद्धत आहे. त्यानंतर विद्यमान आमदाराला तिकीट दिल्यास पुन्हा निवडून येणे अवघड असल्यास तेथे नवीन प्रयोग करण्याचा विचार केला जातो. त्यानुसार काही विद्यमान जागांचा पुनर्विचार केल्यामुळेच नाशिकमधील एका जागेचे नाव पहिल्या यादीत दिले नाही, असे भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे म्हणाले. 

नाशिक दौऱ्यादरम्यान महायुतीच्या मीडिया सेंटरच्या उ‌द्घाटन प्रसंगी पत्रकारांशी वार्तालाप करताना ते बोलत होते. पुढे बोलताना ते म्हणाले की, निवडणुकीसाठी तयारी करणाऱ्यांपैकी कोणा एकालाच तिकीट मिळू शकते. त्यामुळे इतर इच्छुक नाराज होणे स्वाभाविक आहे. राजकारणात आकांक्षा असणे चूक नाही. त्यातून काही जण बंडखोरी करतात. अर्ज भरलेल्यांशी चर्चा करून त्यांच्या माघारीसाठी प्रयत्न सुरू आहेत.

२०१९ साली मोदींचे फोटो छापून, त्यांच्या सभा घेऊन लढलेल्या शिवसेनेने निवडणुकीनंतर आकडेवारी पाहून गद्दारी केली. जिथे बाळासाहेबांचे वास्तव्य होते, त्याच मातोश्रीमधून गद्दारी पाहायला मिळणे हे दुर्दैवी होते. आम्ही युतीतील घटक पक्ष 'महायुती' म्हणून एकत्र लढत आहोत. महायुती म्हणूनच सरकार बनवू, आमची नियत निवडणुकी आधी वेगळी आणि निवडणुकीनंतर वेगळी कधीच नसते, असे म्हणत त्यांनी उद्धवसेनेला टोलाही लगावला.

...त्यांनी कधीही मराठा समाजाला आरक्षण दिले नाही

मंडल आयोग लागू झाले, त्यावेळी शरद पवारांनी ठरवले असते, तर मराठा समाजाला ओबीसीमध्ये आरक्षण मिळाले असते. आमच्या पेक्षा जास्त काळ काँग्रेस आणि शरद पवार सत्तेत मुख्यमंत्री पदावर राहिले. परंतु, त्यांनी कधीही मराठा समाजाला आरक्षण दिले नाही. आम्ही सत्तेत आल्यानंतर आरक्षण देऊन कोर्टात टिकवून दाखवले. त्यानंतर कोणीतरी त्याविरोधात सर्वोच्च न्यायालयात गेले. उद्धवसेनेच्या गद्दारीमुळे २०१९ आमचे सरकार गेल्यानंतर पुढील ५ तारखांना राज्य सरकारचा एकही प्रतिनिधी गेला नाही. त्यामुळे मराठा आरक्षणाला फटका बसला.

 

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Vinod Tawdeविनोद तावडेNashikनाशिकnorth maharashtra regionउत्तर महाराष्ट्र विधानसभा निवडणूक