शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
2
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
3
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
4
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
5
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं
6
सर्जिकल स्ट्राईकपेक्षा मोठा हल्ला; अजित डोभाल कामाला लागले, पाकिस्तावर मोठी कारवाई होणार?
7
पहलगाम हल्ला: मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची मदत देणार; CM देवेंद्र फडणवीसांची घोषणा
8
पहलगाम हल्ला: “मागच्याला गोळी घातली, मी कलमा वाचला अन् वाचलो”; प्रोफेसरांनी सांगितली आपबीती
9
Pahalgam Terror Attack : काश्मीर ट्रिपसाठी साठवलेले पैसे; ९ वर्षांच्या मुलासमोरच दहशतवाद्यांनी वडिलांवर झाडली गोळी
10
Pahalgam Terror Attack : पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर सिराज अन् शमीची संतप्त प्रतिक्रिया, म्हणाले...
11
“निरपराध पर्यटकांवर भ्याड हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचा कायमचा बिमोड करा”: हर्षवर्धन सपकाळ
12
“अशा भ्याड हल्ल्यांनी घाबरणार नाही, असे प्रत्युत्तर देऊ की...”; राजनाथ सिंह यांनी ठणकावले
13
इन्स्टाग्राम डिलीट केलं, सोशल मीडियापासून स्वतःला ठेवलं दूर; UPSC मध्ये नेत्रदिपक कामगिरी
14
पैसा ही पैसा होगा... सौरव गांगुलीला मिळणार तब्बल १२५ कोटी रूपये! महत्त्वाच्या करारावर झाली स्वाक्षरी
15
Swami Samartha: 'स्वामी' शब्दाचा 'हा' अर्थ जाणून घेतलात तर तारक मंत्राचा अर्थही नव्याने उलगडेल हे नक्की!
16
हॉस्पिटलमध्ये मनीषाला बळ मिळालं डॉक्टरांच्या कुटुंबातील सदस्याकडून; आत्महत्येच्या दिवशी डॉक्टरांचा चेहरा पडला होता
17
पहलगाम हल्ल्याचा हिशोब होणार! राजनाथ सिंह यांची दिल्लीत उच्चस्तरीय बैठक; तिन्ही दलांच्या प्रमुखांची उपस्थिती
18
Pahalgam Attack: दहशतवादी हल्ल्यानंतर शाहरुख हळहळला, भाईजान म्हणाला- "स्वर्गासारखं काश्मीर नरकात बदलत आहे..."
19
ट्रम्प टॅरिफची दहशत संपली? निफ्टी ४ महिन्यांच्या शिखरावर, आयटीमध्येही तेजी परतली
20
Pahalgam Terror Attack : हृदयद्रावक! साता जन्माची साथ ७ दिवसांत सुटली; रडली, शवपेटीला मिठी मारली, सॅल्यूट करुन म्हणाली...

केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी टाळला वीर सावरकरांच्या 'भारतरत्न'चा प्रश्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2024 14:04 IST

काँग्रेसने सुरुवातीपासूनच संविधानाचा अपमान केला आहे. लोकसभेत त्यांनी केलेल्या अपप्रचाराला काही भोळे नागरिक बळी पडले. त्यांना जेव्हा त्यातील सत्य समजेल तेव्हा ते काँग्रेसला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाहीत. याबद्दल ते काँग्रेसला कधीही माफ करणार नाहीत, असा दावाही त्यांनी केला.

लोकमत न्यूज नेटवर्क, नाशिक : महाविकास आघाडीच्या नेत्यांनी राहुल गांधी यांच्यासमोर स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल बोलण्याचे आव्हान पंतप्रधान मोदी यांनी नाशिकमध्ये झालेल्या सभेत दिले असताना नाशिक दौऱ्यावर आलेल्या केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांना सावरकरांना भारतरत्न केव्हा? असे विचारले असता त्यांनी याबाबत बोलणे टाळले. याबाबत आता बोलणे योग्य नाही, अशी पुष्टीही त्यांनी जोडली.

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रविवारी (दि. १०) पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी माजी मंत्री भारती पवार, शहराध्यक्ष प्रशांत जाधव, प्रवक्ते लक्ष्मण सावजी, गोविंद बोरसे, गणेश कांबळे, अजित चव्हाण आदी उपस्थित होते. ते म्हणाले, संविधानाबाबत फेक नरेटिव्ह पसरवून लोकसभेत काँग्रेसने भारतीय नागरिकांची फसवणूक केली आहे. एकीकडे संविधानाबाबत खोटा कळवळा दाखवायचा आणि दुसरीकडे काश्मीरमध्ये संविधान लागू करण्यास विरोध करणाऱ्यांना पाठिंबा द्यायचा, ही काँग्रेसची दुहेरी नीती लोकांना समजायला लागली आहे. काँग्रेसने सुरुवातीपासूनच संविधानाचा अपमान केला आहे. लोकसभेत त्यांनी केलेल्या अपप्रचाराला काही भोळे नागरिक बळी पडले. त्यांना जेव्हा त्यातील सत्य समजेल तेव्हा ते काँग्रेसला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाहीत. याबद्दल ते काँग्रेसला कधीही माफ करणार नाहीत, असा दावाही त्यांनी केला.

नाशिकमधून प्रकल्प पळवले जात आहेत, हादेखील फेक नरेटिव्ह आहे. देशातील प्रत्येक भागाचा विकास व्हायला हवा. एचएएलमध्ये विमानाचे सुटे भाग बनवण्याला मान्यता मिळाली तेव्हा त्याला विरोध करणारे आज नाशिकच्या विकासाचा जाब विचारत आहेत. पालघरला प्रकल्प आला तर नाशिकचा विकास होणार, पर्यायाने राज्याचा आणि देशाचाही विकास होणार, त्यामुळे त्यात राजकारण करणे चांगले नाही. उद्धवसेनेची विचारधारा बाळासाहेबांच्या विचारापेक्षा वेगळी आहे. सावरकरांचा वारंवार अपमान करणाऱ्या राहुल गांधी, मणिशंकर अय्यर यांना उद्धवसेना साथ देते हे न पटण्यासारखे आहे, असेही रिजिजू म्हणाले. 

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Vinayak Damodar Savarkarविनायक दामोदर सावरकरBJPभाजपा