शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

स्वबळाची भाषा करायला आधी काँग्रेसकडे बळ तर हवे!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2021 16:32 IST

फेब्रुवारी महिन्यात महापालिकेची निवडणूक होत असून, त्यामुळेच सर्वच पक्ष सध्या स्वबळाची भाषा करीत आहेत. काँग्रेसचीही तीच भाषा आहे. मित्रपक्ष ...

फेब्रुवारी महिन्यात महापालिकेची निवडणूक होत असून, त्यामुळेच सर्वच पक्ष सध्या स्वबळाची भाषा करीत आहेत. काँग्रेसचीही तीच भाषा आहे. मित्रपक्ष राष्ट्रवादीकडून गद्दारी केली जाते आणि उमेदवार पाडले जातात, ही तीच ती कारणे देऊन शनिवारी पक्षाच्या बैठकीत एकमुखाने स्वबळाची मागणी करण्यात आली. रविवारी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले नाशिकच्या दौऱ्यावर आहेत. त्यांच्यासमवेत महसूलमंत्री बाळासाहेब थोरातही येणार असून, त्याच्या पूर्वसंध्येला बैठकीत मागणी करणे म्हणजे, आपल्या भावना या नेत्यांपर्यंत पोहोचण्याचा एक भाग आहे. 

स्वबळाची भाषा केली, तरी त्याची पक्षात कितपत तयारी आहे? एके काळी महापालिकेत सत्तेवर असलेल्या या पक्षांची सध्याची अवस्था अत्यंत वाईट आहे. महापालिकेत सहा नगरसेवक निवडून आले, हा इतिहास झाला, तरी आता संघटन वाढविण्यासाठी गेल्या पाच वर्षांत काय झाले? प्रभारी शहराध्यक्ष आठ वर्षे ठेवल्यानंतर नवीन अध्यक्ष नियुक्त करण्याच्या हालचालीच आता सुरू झाल्या आहेत. निवडणुकीसाठी दोन महिने जेमतेम शिल्लक असताना, पक्षाची राज्य स्तरावरच अशी तयारी असेल, तर कार्यकर्त्यांना काय बेाल देणार? समजा निवडणूक स्वबळावर लढायचे ठरले, तर काँग्रेस किती जागा अधिक वाढवू शकेल. एकंदरीतच आज तरी काँग्रेसला राष्ट्रवादीशिवाय पर्याय नाही, असे दिसते.

- संजय पाठक

टॅग्स :congressकाँग्रेसNashikनाशिकPoliticsराजकारण