शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

तक्रार करा; १०० मिनिटांत होणार कार्यवाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2019 00:33 IST

निवडणूक काळात आचारसंहितेचे काटेकोर अंमलबजावणी व्हावी यासाठी भारतीय निवडणूक आयोगाकडून अनेक मार्गदर्शक तत्त्वे ठरवून दिलेली आहेत. प्रशासकीय यंत्रणा, राजकीय पक्ष आणि उमेदवारांच आचारसंहिता राखण्याची जबाबदारी असून, आता या सर्वांवर सर्वसामान्यांनाही नजर ठेवता येणार आहे.

नाशिक : निवडणूक काळात आचारसंहितेचे काटेकोर अंमलबजावणी व्हावी यासाठी भारतीय निवडणूक आयोगाकडून अनेक मार्गदर्शक तत्त्वे ठरवून दिलेली आहेत. प्रशासकीय यंत्रणा, राजकीय पक्ष आणि उमेदवारांच आचारसंहिता राखण्याची जबाबदारी असून, आता या सर्वांवर सर्वसामान्यांनाही नजर ठेवता येणार आहे. आयोगाने सिटिझन व्हिजिलन्स अंतर्गत ‘सी-व्हिजिल’ हे मोबाइल अ‍ॅप नागरिकांना केवळ निवडणूक काळासाठी उपलब्ध करून देण्यात आले आहे. आचारसंहिता भंगाची तक्रार या अ‍ॅपद्वारे केल्यास अवघ्या १०० मिनिटांत संबंधितावर कारवाई करण्याचा दावा आयोगाने केला आहे.निवडणुकीच्या काळात आचारसंहितेचे पालन झाल्यास नैतिक मार्गाने आणि पारदर्शक वातावरणात निवडणुकीची प्रक्रिया होऊन लोकशाहीतील या मोठ्या उत्सवात जनतेचा विश्वास अधिक दृढ होण्यास मदत होणार आहे. या उद्देशाने आयोगाने सर्वसामान्यांना या सर्व घटनांवर नजर ठेवण्याचा अधिकारच या अ‍ॅपद्वारे बहाल केला आहे.यापूर्वी आचारसंहितेची तक्रार दाखल झाल्यानंतर तक्रारीची सत्यता तपासून पाहून त्यानंतर कार्यवाहीची प्रक्रिया करण्यासाठी यंत्रणेचा वेळ वाया जात होताच शिवाय अचारसंहिता भंग असल्याबाबतचे मतप्रवाहदेखील उमटत होते. यामुळे यंत्रणाला या प्रक्रियेसाठी चांगलीच धावाधाव करावी लागते.अशी असेल प्रक्रिया‘सी-व्हिजिल’ या मोबाइल अ‍ॅपवरून निवडणुकीचा खर्च आणि आचारसंहिता भंग करणाऱ्यांच्या तक्रारीचा पुरावा म्हणून नागरिकांसाठी शस्त्र ठरत आहे. सदर अ‍ॅप हे यूझर फे्रण्डली असून, त्याचा वापर अत्यंत सोपा आहे. निवडणुकीची आचारसंहिता जाहीर झाल्यापासून ते मतदानाच्या दुसºया दिवसांपर्यंत सदर अ‍ॅप कार्यरत राहणार आहे. या अ‍ॅपच्या माध्यमातून घटनेचे छायाचित्र, व्हिडीओ पुरावा म्हणून अपलोड करण्याची सुविधा आहे. त्यामुळे जेथे कुठे आचारसंहिता भंग होत आहे असे दिसते त्या घटनेचे छायाचित्र आणि व्हिडीओ काढून जीपीएसप्रणालीद्वारे स्वयंचलित मॅपिंगसह अपलोड करण्याची सुविधा आहे. अशा प्रकारची कार्यवाही केल्यानंतर मोबाइलधारकाला युनिक आयडी क्रमांक त्याच्या मोबाइलवर येतो. विशेष म्हणजे तक्रारकर्त्याला त्याची ओळख गोपनीय ठेवून तक्रार करता येणार आहे.अ‍ॅपवरून नोंदविलेली तक्रार अवघ्या पाच मिनिटांत जिल्हा नियंत्रण कक्षाकडे दाखल होणार आहे. तेथून सर्व तक्रारींचा तपशील हा भरारी पथकाकडे पाठविला जातो. त्यानुसार संबंधित पथक हे ‘जीव्हीआयजीआयएल’ नामक मोबाइल अ‍ॅप्लिकेशनच्या मदतीने नेव्हिगेशन तंत्रज्ञानाच्या साह्याने पथक घटनास्थळावर अवघ्या १५ मिनिटांच्या आत पोहोचू शकते. तेथून तक्रारीची सत्यता पडताळून निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना अहवाल सादर केला जाईल.तपास यंत्रणेकडून निवडणूक निर्णय अधिकाºयाकडे अहवाल पाठविल्यानंतर घटनेतील तथ्य तसेच पुराव्यांच्या आधारे कार्यवाहीचा निर्णय घेतला जाणार आहे. कार्यवाहीची माहिती संबंधित तक्रारदाराच्या मोबाइलवर संदेशाद्वारे दिली जाणार आहे.सी व्हिजिलचा उपयोग अत्यंत मर्यादित असून, या अ‍ॅपद्वारे घेतलेले चित्रण आणि फोटो हे आपल्या मोबाइलमध्ये सेव्ह करता येत नाहीत.अ‍ॅपद्वारे फोटो, व्हिडीओ अपलोड करण्याचा अवधी केवळ पाचच मिनिटांचा असेल.याचा वापर केवळ आचारसंहितेच्या तक्रारीसाठीच होऊ शकतो.चुकीच्या तक्रारी डिलीट करण्याचा अधिकार नियंत्रण कक्षाला असतील.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019nashik collector officeनाशिक जिल्हाधिकारी कार्यालय