शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक दिवस! मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा; केंद्र सरकारचा मोठा निर्णय
2
अजित पवार बारामतीमधून माघार घेणार? कार्यकर्त्यांसमोर दिले सूचक संकेत 
3
रेल्वे कर्मचाऱ्यांना मोदी सरकारची मोठी भेट! नवरात्रीच्या पहिल्या दिवशी बोनस मंजूर, मिळणार 'इतकी' रक्कम! 
4
Women's T20 World Cup : कॅप्टन Fatima Sana ची अष्टपैलू खेळी; लंकेविरुद्ध पाकचा 'डंका'
5
"आजचा दिवस मायमराठीच्या इतिहासातील एक ऐतिहासिक दिवस’’, देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया
6
मुलीच्या अपहरणाची तक्रार देणारा बापच निघाला विकृत, वडिलांच्याच अत्याचाराला कंटाळून मुलीने सोडले होते घर
7
अखेर सापडलं सोन्याचं घुबड, ३१ वर्षांपासून शोघ घेत होता संपूर्ण देश, नेमकं कारण काय?  
8
धक्कादायक! घरात घुसून पती-पत्नीसह दोन चिमुकल्यांची हत्या; CM योगींनी दिले कारवाईचे आदेश
9
केकमुळे कॅन्सरचा धोका! अन्न सुरक्षा आणि गुणवत्ता विभागाच्या अहवालात मोठा खुलासा
10
एक दोन नव्हे, तब्बल 7 आघाड्यांवर युद्ध लढतोय चिमुकला इस्रायल; जाणून घ्या, ज्यूंचे शत्रू कोण कोण?
11
अरुण गवळीची मुलगी गीता गवळी ठाकरे गटाच्या संपर्कात; लवकरच मशाल हाती घेणार?
12
Sangli: शरद पवारांच्या दौऱ्याने सांगलीत भाजपला मोठा धक्का; राजेंद्रअण्णा देशमुख पवार गटात
13
वैवाहिक बलात्कार गुन्हा नाही तर सामाजिक समस्या; सुप्रीम कोर्टात केंद्र सरकारची स्पष्टोक्ती
14
रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरला, ‘फादर ऑफ ऑल बॉम्ब’ चा वापर केल्याचा दावा! बघा धडकी भरवणारा VIDEO
15
Rohit Pawar Rohit Sharma, Viral VIDEO: रोहित पवार म्हणाले- "हमको और एक वर्ल्ड कप चाहिए", मग रोहित शर्माने काय केलं?
16
महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना खूशखबर, ५ तारखेला खात्यात जमा होणार ४ हजार रुपये
17
इराणमध्ये विषारी दारू प्यायल्यानं २६ जणांचा मृत्यू, १०० हून अधिक जण रुग्णालयात दाखल
18
"जरांगेंनी पाडापाडीचं राजकारण करण्यापेक्षा उमेदवारांना निवडून आणावं’’,संभाजीराजेंचा सल्ला
19
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा ठाणे दौरा, शहरातील वाहतुकीमध्ये बदल
20
"आधी स्वतःची परिस्थिती पाहा..." धार्मिक स्वातंत्र्याबाबत अमेरिकेच्या टीकेवर भारताचा पलटवार

नदीकाठावरील झोपड्यांसाठी मालेगावी दक्षता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2021 4:11 AM

यावर्षी महापालिकेतर्फे शहरातील १९ ठिकाणांवर पूरस्थितीत काळजी घेण्यासाठी उपाययोजना आखण्यात आली आहे. शहरातील गवळीवाडा, शीतलामातानगर, पंचशीलनगर, मकाजी पेढा, श्रीरामनगर, ...

यावर्षी महापालिकेतर्फे शहरातील १९ ठिकाणांवर पूरस्थितीत काळजी घेण्यासाठी उपाययोजना आखण्यात आली आहे. शहरातील गवळीवाडा, शीतलामातानगर, पंचशीलनगर, मकाजी पेढा, श्रीरामनगर, खलीलशेठ चाळ जवळचा भाग, ढोरवस्ती, सांडवा पूल, चावचावनगर, बजरंगवाडी, अमरधाम, स्मशानभूमी, आदिवासीनगर, भिकनशाह दरगाह जवळील भाग, बाहरा बाग, सिद्धार्धनगर, सर्व्हे नं. ५५ नदीकिनारचा भाग, किल्ला झोपडपट्टी, ईदगाह झोपडपट्टी, भायगाव, माणिकनगर, पवारवाडी हा भाग नद्यांना पूर आल्यानंतर पूरस्थितीत वेढला जातो. त्यामुळे नागरिकांच्या घरांमध्ये पूरपाणी गेल्याने नागरिकांचे संसार उघड्यावर पडतात. महापालिकेतर्फे आपत्ती व्यवस्थापन कक्ष अग्निशमन व आणीबाणी सेवा विभागाची नुकतीच बैठक मनपा आयुक्त भालचंद्र गोसावी यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. त्यात सुकाणू समिती व विविध विभागप्रमुख उपस्थित होते. पावसाळ्यात नदीकाठावरील झोपडपट्टी भागात उपाययोजना करण्यात येत आहेत.

शहरातील सर्व खड्डे बुजविण्यात येत आहेत. शहरातील सर्व बांधकाम साहित्य पावसाळ्यापूर्वी उचलून घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. बंधारा किंवा नाला अथवा नाल्यावरील पूल फुटल्यास वाहतूक पोलिसांच्या मदतीने वाहतूक सुरळीत करण्याचे ठरविण्यात आले. धरणे व पाटबंधारे विभागाशी संपर्क व समन्वय ठेवून वेळोवेळी धरणातून साेडण्यात येणाऱ्या पाण्याच्या पातळीबाबत माहिती घेण्याच्या सूचना देण्यात आल्या. पाण्याच्या टाक्यांवरील वीजरोधक यंत्रणा कार्यान्वित करण्यात येणार आहे. शहरात पुरवठा करण्यात येणाऱ्या पिण्याच्या पाण्याची तपासणी करण्यात येणार असून दूषित पाणीपुरवठा होणार नाही आणि नागरिकांच्या आरोग्यास बाधा पोहोचणार नाही, याची काळजी घेण्यात येत आहे. सर्व ड्रेनेजचे चोकअप काढण्यात येत आहे. भूमिगत गटारी पावसाळ्यात तुंबणार नाहीत, याची खबरदारी मनपाच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडून घेण्यात येत आहे.

नदीकाठच्या लोकांना पुराच्या धोक्याची सूचना देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. शहरात राेगराई पसरू नये म्हणून औषधफवारणी करण्यात येत आहे. नदीनाल्यांमधील गाळ काढून नद्यांना प्रवाही करण्यात येत आहे. शहरात पावसाळ्यात वीजपुरवठा अखंडित राहावा, यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. रस्त्यावर पडलेले पोल विद्युत विभागातर्फे काढून घेण्याची कार्यवाही सुरू आहे. आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी अधिकारी व कर्मचारी यांचे पथक सुसज्ज करण्यात आले आहे. धोकादायक इमारतींच्या मालकांना नोटिसा देण्यात आल्या आहेत. झोपड्यांना पुराचा धोका संभवत असेल. तर त्या झोपड्या काढून टाकण्याची व्यवस्था महानगरपालिकेतर्फे करण्यात आली आहे.

धाेकादायक आणि गर्दीच्या ठिकाणी बंदोबस्त लावण्यात येणार आहे. पूरपरिस्थितीत स्थलांतरित करण्यात येणाऱ्या नागरिकांच्या तात्पुरत्या निवासाची व्यवस्था करण्यात येणार आहे. त्यासाठी संबंधित भागातील शाळा, समाजमंदिरे, मंगल कार्यालये, कॉलेजेस आणि खाजगी शाळा ताब्यात घेण्यात येणार आहेत. पूरपरिस्थितीची एखादी आपत्ती उद्भवल्यास जखमी नागरिकांना रुग्णालयांमध्ये स्थलांतरित करण्यात येणार आहे. पूरपरिस्थितीत जीवरक्षक आणि पोहणारे कर्मचारी यांच्याकरिता लाइफ रिंग, लाइफ जॅकेट व इतर साधनांची व्यवस्था करण्यात आली आहे.

नगररचना आणि आपत्ती व्यवस्थापन कक्ष यांच्या वतीने नागरिकांना सुरक्षितस्थळी स्थलांतरित करण्यात येत आहे. त्यांच्या राहण्याची, भोजनाची आणि पिण्याच्या पाण्याचीदेखील व्यवस्था करण्यात आली आहे. १ जूनपासून कर्मचारी तीन पाळ्यांमध्ये काम करीत आहेत. नियंत्रण कक्षाचा क्रमांक ०२५५४ २३१९५० असा आहे. अग्निशमन विभागाचे प्रमुख संजय पवार यांच्या नेतृत्वाखाली कर्मचारी काम करीत आहेत. पूरस्थिती हाताळताना नागरिकांचा बचाव करण्यासाठी ट्रॅक्टर, जेसीबी, टीपर, डंपर, वाॅटर टँकर, लाइफगार्ड टँकर, दोर, आदी साहित्य आहे. धोकादायक २१० घरांना नोटिसा पाठविण्यात आल्या आहेत. आयेशानगरातील स्वीपर कॉलनी स्थलांतरित करण्यात आली आहे.