मनमाड शहर व परिसरात आज रविवारी दुपारनंतर बेमोसमी पावसाचे आगमन झाले. अचानक आलेल्या या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. गेल्या आठवड्यापासून परिसरात थंडी जाणउ लागली असली तरी काल सायंकाळ नंतर मात्र थंडी गायब होउन वातावरणात कमालीचा उकाडा जाणवत होता. आज सकाळपासून ढगाळ वातावरण असल्याने सुर्यदर्शन झालेच नाही.दुपारनंतर विजांच्या कडकडाटासह पावसाला सुरवात झाली.आज आठवडे बाजार असल्याने भाजीपाला विक्रीस आनलेल्या शेतकऱ्यांची एकच धांदल उडाली.आठवड्याचा बाजार खरेदी करण्यासाठी आलेल्या ग्राहकांची धावपळ उडाली.आहे तो भाजीपाला विकून शेतकऱ्यांनी घर गाठण्याचा प्रयत्न केला. परिसरातील भालूर, मोहेगाव, एकवई, अनकवाडे , लोहशिंगवे गावांमधे दमदार पावसाने हजेरी लावली. हा पाउस सध्या शेतात उभ्या असलेल्या पिकाला हाणीकारक असल्याचे जाणकार शेतकऱ्यांचे म्हणने आहे.
मनमाडला आठवडे बाजारात धावपळ
By admin | Published: November 22, 2015 11:28 PM