शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदनगर जिल्हा बँकेने नोकर भरतीत आरक्षण वगळले; वाद पेटणार?
2
अंबाजोगाई - लातूर रोडवर भीषण अपघात; लातूर जिल्ह्यातील ४ जण जागीच ठार
3
मनोज जरांगेंची प्रकृती खालावली; बजरंग सोनवणेंचं मुख्यमंत्री अन् राज्यपालांना पत्र, म्हणाले...
4
सिनेट निवडणूक मंगळवारी होणार; सरकारच्या परिपत्रकाला स्थगिती
5
जगन्नाथ मंदिराच्या तळघरात गुप्त खजिन्याचा घेणार शोध; लेझर स्कॅनिंगचा वापर
6
परतीचा पाऊस देणार महामुंबईला तडाखा; २६ ते २९ सप्टेंबर मुसळधारेचा अंदाज
7
१४ दिवसांतच संग्राम चौगुलेची 'बिग बॉस मराठी'मधून एक्झिट, पोस्ट शेअर करत म्हणाला- "मला..."
8
स्वाभिमानी मणका तंदुरुस्त करून घ्या!; राज ठाकरेंची पुन्हा मराठी माणसांना हाक
9
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: महत्त्वाचा निर्णय घेण्यास दिवस अनुकूल नाही!
10
याही वेळी मुंबईत अपक्षांची संख्या लक्षणीय असणार? इच्छुकांमध्ये तिकिटासाठी रस्सीखेंच
11
पाकिस्तान मोदींना घाबरतो; आज पाकिस्तान गोळीबाराची हिंमतही करणार नाही
12
राष्ट्रवादीचे कार्यालय शरद पवार गटाचेच; लोकसभा सचिवालयाने दिले स्पष्टीकरण
13
तिरूपती लाडूबाबत अफवा पसरवणाऱ्यांवर गुन्हा; भेसळयुक्त तूप ‘अमूल’चे असल्याच्या पोस्ट
14
मुख्य निवडणूक आयुक्त ३ दिवस मुंबई दौऱ्यावर; विधानसभा निवडणुकीसाठी घेणार बैठका
15
भारतातील चाकरमानी दबले फायलींच्या ढिगाऱ्याखाली; ६१ टक्के जण आठवड्याला ४९ तासांपेक्षा अधिक राबतात
16
पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेत दाखल, ‘क्वाड’ शिखर परिषदेत सहभागी होणार
17
आता मेडिकलच्या ‘पीजी’च्या जागा वाढणार; वैद्यकीय आयोगाने अर्ज मागविले
18
वरिष्ठांना लाच देण्याचा कनिष्ठाचा प्रयत्न; ‘प्रॉव्हिडंट फंड’ची सीबीआयकडे तक्रार
19
आतिशी यांच्या शपथविधीसाठी आलेले हे IAS अधिकारी कोण? जे केजरीवाल बोलत असताना हात जोडून उभे होते
20
आम्हाला दिलेल्या आश्वासनांचे काय झाले? निवासी डॉक्टरांचा सवाल

वसुली-उत्पन्नाची अट रद्द करून किमान वेतनाची त्वरेने अंमलबजावणी करावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2020 10:17 PM

घोटी : शासनाने ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांसाठी किमान वेतनाचे नवीन दर मान्य केलेले आहे. मात्र, उत्पन्न व वसुलीची अट घालणाऱ्या शासन ...

ठळक मुद्देघोटी : ग्रामपंचायत कर्मचारी महासंघाची शासनाकडे मागणी

घोटी : शासनाने ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांसाठी किमान वेतनाचे नवीन दर मान्य केलेले आहे. मात्र, उत्पन्न व वसुलीची अट घालणाऱ्या शासन निर्णयाचा अडसर निर्माण झाल्याने ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना किमान वेतनाच्या नवीन दराचा लाभ मिळत नाही, याबाबत पुनर्विचार करून वसुली, उत्पन्नाची अट रद्द करावी, अशा मागणीचे निवेदन ग्रामपंचायत कर्मचारी महासंघाच्या वतीने ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ व ग्रामविकास खात्याचे अतिरिक्त प्रधान सचिव राजेशकुमार यांना देण्यात आले.शासन निर्णयाप्रमाणे ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना किमान वेतनाच्या नवीन दराने कमीत कमी ११ हजार ६२५ प्रमाणे तर जास्तीत जास्त १४ हजार १२५ रुपयांप्रमाणे दर निश्चित झाला आहे. मात्र, उत्पन्न व वसुलीची अट घालणारा शासन निर्णय अडथळा ठरत आहे, तसेच आणखी प्रलंबित मागण्याही सादर करण्यात आल्या.यात लोकसंख्येचा जाचक आकृतिबंध रद्द करा, तसेच वेतनश्रेणी देण्यासाठी यावलकर समितीच्या शिफारशी मान्य करा. कपात केलेल्या भविष्य निर्वाह निधीचा हिशेब अद्ययावत करा. उपदानाची रक्कम देण्यासाठी दहा कर्मचारी व ५० हजार रुपये रक्कम मर्यादेची अट रद्द करा आदी मागण्या करण्यात आल्या. या मागण्यांबाबत कर्मचारी प्रतिनिधींची बैठक आयोजित करावी, अशी मागणी करण्यात आल्याची माहिती प्रदेश सचिव सखाराम दुर्गुडे व उज्ज्वल गांगुर्डे यांनी दिली.मागण्यांबाबत अंमलबजावणी न झाल्यास जिल्हा, तालुकास्तरावर तसेच अधिवेशन काळात मंत्रालयावर आंदोलने करण्याचा निर्णय नाशिक येथे पदाधिकाऱ्यांच्या झालेल्या बैठकीत महासंघातर्फे घेण्यात आला.दरम्यान, लवकरच समन्वयाची बैठक बोलावून तोडगा काढण्यात येईल, असे मंत्रालय सचिवांनी सांगितल्याचे पत्रकात म्हटले आहे. निवेदनाचा पाठपुरावा करून न्याय मिळवून द्यावा, यासाठी राज्यमंत्री आदिती तटकरे, आमदार मोनिका राजळे यांनाही निवेदन देण्यात आले.निवेदनावर महासंघाचे अध्यक्ष तानाजी ठोंबरे, सरचिटणीस नामदेव चव्हाण, सचिव सखाराम दुर्गुडे, मंगेश म्हात्रे मिलिंद गणवीर यांच्यासह सर्व पदाधिकारी, तसेच संजय डमाळ, गोविंद म्हात्रे, अशोक वाघमारे आदींच्या सह्या आहेत.

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतElectionनिवडणूक