शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेत e-KYC करताना चूक झाली? सरकारने दिली दुरुस्तीची संधी; ‘ही’ आहे शेवटची तारीख
2
टीम इंडियाचं नेमकं कुठं चुकतंय? गौतम गंभीरच्या रणनीतीवर रॉबिन उथप्पाची टीका
3
“आता येत्या २ महिन्यात एकनाथ शिंदे पुन्हा CM होतील असे वाटतेय”; कुणी केली भविष्यवाणी?
4
"मगरीचे अश्रू, बंगालचा अपमान...", मेस्सीच्या कार्यक्रमात गोंधळ; BJP-TMC मध्ये आरोप-प्रत्यारोप
5
प्रवाशांनो… वंदे भारत, राजधानीने प्रवास करताय? ‘हा’ नियम अनिवार्य; अन्यथा तिकीट मिळणार नाही!
6
५१००० हजारांचे कोल्हापुरी चप्पल थेट निघाले प्राडाच्या गावी; एक ग्रॅम ही वजनात फरक नसलेली एकमेव जोड
7
डोंबिवलीत पुन्हा प्रदूषण; रस्त्यावर गुलाबी रंग; पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, 'तथ्ये तपासून कारवाई करू'
8
सिडकोच्या घरांमध्ये मोठी सूट; लॉटरीपूर्वीच किमती १० टक्क्यांनी घटल्या, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय
9
जंगलात एक कोटींच्या शेळ्या सोडणे हास्यास्पद; वनमंत्र्यांच्या बिबट्यांच्या उपायांची अजित पवारांनी उडवली खिल्ली
10
'धन्यवाद तिरुवनंतपुरम'; थरूर यांच्या बालेकिल्ल्यात भाजपचा झेंडा! पंतप्रधान मोदींनी मानले केरळच्या जनतेचे आभार
11
केरळच्या राजधानीत भाजपाचा ऐतिहासिक विजय, डाव्या पक्षांचा अनेक वर्षांपासूनचा बालेकिल्ला ढासळला
12
साता जन्माची साथ ८ दिवसांत सुटली; नववधू बॉयफ्रेंडसोबत पसार, नवऱ्याची शोधण्यासाठी वणवण
13
“महापालिका निवडणुकीत युतीबाबत चर्चा करून एकत्र निर्णय बसून घेऊ”; अजित पवारांनी केले स्पष्ट
14
...तर थेट मुख्य सचिवांवरच हक्कभंग आणू; राहुल नार्वेकरांचा विधानसभेत संताप, नेमके काय घडले?
15
नवा ट्विस्ट! "पवन सिंहला धमकी दिली नाही, जे करतो ते..."; लॉरेन्स बिश्नोई गँगचा ऑडिओ व्हायरल
16
शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या पार्टीत राहुल गांधी आणि गौतम अदानी आले आमने-सामने, त्यानंतर घडलं असं काही...
17
Lionel Messi : Video - "फ्रॉड करून गेला, १२ हजारांचं तिकीट..."; मेस्सीची झलक न दिसल्याने फॅन्स प्रचंड चिडले
18
लग्नाच्या नावाखाली अल्पवयीन मुलींचा सौदा; राज ठाकरेंच्या पत्रावर CM फडणवीस म्हणाले, "९० टक्के मुली परत आल्या"
19
“महाराष्ट्र विधानपरिषद देशासाठी आदर्श”; विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचे कौतुकोद्गार
20
शशी थरूर यांच्याच बालेकिल्ल्यात भाजपचा ऐतिहासिक विजय; काँग्रेस खासदार म्हणाले, "हेच लोकशाहीचं सौंदर्य"
Daily Top 2Weekly Top 5

रब्बीच्या भांडवलासाठी कारभारणीचे मंगळसूत्र बँकांकडे गहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2019 14:19 IST

पाटोदा :- येवला तालुक्यात परतीच्या अवकाळी पावसाने खरीप हंगाम पूर्णपणे वाया गेल्यामुळे शेतकरी वर्गाचे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी ...

ठळक मुद्देपाटोदा परिसरात कामांची लगबग : शेतकऱ्यांची मका सोंगणीसह चारा साठवण्याची धावपळ

पाटोदा :- येवला तालुक्यात परतीच्या अवकाळी पावसाने खरीप हंगाम पूर्णपणे वाया गेल्यामुळे शेतकरी वर्गाचे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी वर्ग अडचणीत सापडला आहे.त्याचे भांडवल संपले असल्याने रब्बी हंगामाचे नियोजन कोलमडून पडले आहे. शेतात पाणी असल्यामुळे रब्बी हंगामाला आधीच दोन महिने उशीर झाला असून अजून उशीर नको म्हणून शेतकरी वर्गाने नुकसान भरपाई अनुदानाची वाट न पहाता आपल्या कारभारणीचे मंगळसूत्र व इतर दागिने बँकांकडे गहाण ठेवून तसेच उधार उसनवार करून रब्बी हंगामाची तयारी केली असून सर्वत्र रब्बी हंगामाची लगबग सुरु असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.सध्या बैल मशागतीला वेळ लागत असल्याने शेतकरी वर्गाने ट्रॅक्टरच्या सहाय्याने शेती मशागतीच्या कामांना प्राधान्य दिले असून ट्रक्टरच्या मदतीने नांगरणी , फणने रोटरी मारणे अशी कामे केली जात असल्याने हा व्यवसाय करणार्या ट्रक्टर मालकांना चांगले दिवस आले आहे. परतीच्या पावसाने खरीप हंगामातील सर्वच पिके सडून गेल्याने आधीच कर्जबाजारी असलेला शेतकरी आणखीनच कर्जाच्या खाईत लोटला गेला आहे. असे असले तरी शेतकरी वर्गाने हार न मानता रब्बी हंगामाच्या कामाला लागला आहे. या भागात मका पिकाचे क्षेत्र मोठे असून शेतकऱ्यांची मका सोंगणी व चारा साठवण्याची धावपळ सुरु आहे. आजही काही शेतात पाणी साचल्याने दलदलीचे साम्राज्य असल्याने मका सोंगणीसाठी अडथळा येत आहे. पाणी उपलब्ध राहाणार असल्याने या भागात गहू हरभरा,या पिकांचे क्षेत्र वाढणार आहे. शेतकरी वर्गाने या पिकांच्या पेरणीला प्रारंभ केला आहे.तर नगदी पिक म्हणून कांदा पिकाची मोठया प्रमाणात लागवड केली जाते.पाटोदा परिसरात कांदा लागवडीसाठी शेतकर्यांची धावपळ सुरु आहे.पावसाने कांदा रोपे सडून गेली आहे मात्र ज्या जमिनी उंच सखल तसेच मुरूमट होत्या अशा जमिनीमधील कांदा रोपांनी काही प्रमाणात तग धरल्याने शेतकरी वर्गाने कांदा लागवड सुरु ठेवली आहे. सध्या कांद्यास मिळत असलेला बाजारभाव पुढील काळातही मिळणार असल्याच्या कयास शेतकर्यांनी बांधला असल्याने कांदा लागवडीला प्राधान्य दिले जात आहे.ज्या शेतकर्यांकडे कांदा रोपे शिल्लक नाही असे शेतकरी कांदा रोप विकत घेऊन कांदा लागवड करतांना दिसत आहे.सध्या कांदा रोपाला सोन्याचे दिवस आले असून एक पायलीचे कांदा रोप सुमारे पन्नास ते साठ हजार रु पयांना विकले जात आहे. ही महागडे रोपे घेण्यातही शेतकरी वर्गात चढाओढ लागली आहे. त्यामुळे ज्याच्याकडे कांदा रोप आहे आशा शेतकºयांना सुगीचे दिवस आले आहे.

टॅग्स :Nashikनाशिक