शहरं
Join us  
Trending Stories
1
अजित पवारांमुळे मंत्रिपदे गेली, आता किमान १०-१२ जागा हव्यात; मित्रपक्षाने महायुतीच्या जागावाटपात टाकला खडा
2
"त्या माणसाने आमच्या तोंडावर दरवाजा बंद केला", सुप्रिया सुळेंनी सांगितला वाईट अनुभव
3
हरियाणा विधानसभा निवडणुकीत कास्टिंग काऊच? काँग्रेसच्या महिला नेत्याच्या आरोपाने खळबळ
4
श्रीलंका: दिसानायकेंना राष्ट्रपती पदाने दिली तात्पुरती हुलकावणी; दुसऱ्या राऊंडची मतमोजणी सुरु
5
"मुलाच्या फीससाठी लोकांसमोर हात पसरावे लागले", मनीष सिसोदियांनी सांगितला 'तो' प्रसंग
6
कामगिरी सुधारण्यासाठी पाकिस्तानची वेगळी 'रणनीती', पाकिस्तान क्रिकेट बोर्ड लागले कामाला
7
सावधान! ऑफिस असो किंवा वर्क फ्रॉम होम; सतत खुर्चीवर बसणं खतरनाक, 'या' आजारांचा धोका
8
चंद्राबाबू नायडूंनी TTD वर केलेले आरोप बिनबुडाचे, त्यांच्यावर कारवाई व्हावी, जगनमोहन रेड्डींचं PM मोदींना पत्र 
9
Mamata Banerjee : "पश्चिम बंगालमधील पूर मानवनिर्मित, DVC ने न सांगता सोडलं पाणी"; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप
10
इराणच्या कोळसा खाणीत गॅस गळतीनंतर भीषण स्फोट; ५१ जणांचा मृत्यू
11
भारताला अमेरिका देणार 31 किलर ड्रोन्स; नरेंद्र मोदी आणि जो बायडेन यांच्यात 'डील डन'
12
सत्ता कुणाचीही येऊ देत, रामदास आठवलेंची जागा पक्की आहे- नितीन गडकरी
13
'यूपीआय'मध्ये मार्केटमध्ये PhonePe सुसाट! Google Pay, Paytm किती मागे?
14
video: दोन लाख रुपये देऊन बिहारचा तरुण बनला 'IPS' अधिकारी; पाहून पोलीसही चक्रावले...
15
"आम्ही कुणालाही सोडणार नाही!’’, तिरुपती लाडू भेसळीप्रकरणी आंध्र प्रदेश सरकार आक्रमक   
16
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोनाचा 'हा' नवा व्हेरिएंट किती खतरनाक, भारताला कितपत धोका?
17
"तुम्हाला दुःख झाले नाही का? देशाला सांगा", केजरीवालांचे मोहन भागवतांना पाच सवाल
18
IND vs BAN : "मला कोणी गिफ्ट दिलं नाही...", 'सामनावीर' अश्विनची मिश्किल प्रतिक्रिया, संघाला जिंकवलं
19
'गोळीला गोळीनेच उत्तर देणार; कलम 370 कधीही मागे घेणार नाही', अमित शाहंची गर्जना...
20
ENG vs AUS ODI : मिचेल स्टार्कचा अप्रतिम यॉर्कर! इंग्लंडचा कर्णधार 'चारीमुंड्या चीत', Video

मोदी सरकारविरोधात आंदोलन

By admin | Published: May 26, 2017 12:24 AM

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘अच्छे दिन’चे स्वप्न दाखवून जनतेची घोर निराशा केल्याचा आरोप करीत कॉँग्रेसच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले.

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : सत्तेवर येण्यापूर्वी गोरगरीब जनतेला दिलेले कोणतेही आश्वासन न पाळलेल्या भाजपा सरकारने आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘अच्छे दिन’चे स्वप्न दाखवून जनतेची घोर निराशा केल्याचा आरोप करीत शहर कॉँग्रेसच्या वतीने गुरुवारी (दि.२५) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सत्तेत येऊन २६ मे रोजी तीन वर्षे होत असून, त्यांनी निवडणुकीच्या काळात दिलेले एकही आश्वासन पूर्ण केलेले नाही. सत्तेत आल्यास १०० दिवसांत विदेशातील काळा पैसा भारतात आणून प्रत्येक गरिबाच्या खात्यावर १५ लाख रुपये जमा करण्याची घोषणा करण्यात आली होती. शेतीमालाला उत्पादन खर्चावर ५० टक्के नफा मिळेल इतका भाव देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. महागाई कमी करून जीवनावश्यक वस्तूंच्या किमती नियंत्रणात ठेवल्या जातील, अशी आश्वासने दिली होती. प्रत्यक्षात अद्याप भारतात कोणताही काळा पैसा आला नाही की कोणाच्याही खात्यावर १५ लाख रुपये जमा झालेले नाहीत. दररोज पेट्रोल, डिझेलचे भाव वाढतच आहेत. शेतमालाला बाजार भाव नसल्याने शेतकरी कर्जबाजारी झाला आहे. त्याला कर्जमाफी दिली जात नसल्याने रोजच शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत आहेत. समृद्धी महामार्गाला जमिनी घेऊन लोकांना उघड्यावर पाडण्याचे काम सरकारकडून करण्यात येत आहे. कायदा व व्यवस्था मोडीत निघाली असून, आतापर्यंत १२५ निरपराध जणांचे खून झाले आहेत. कॉँग्रेस आघाडीच्या कार्यकाळात असलेले ‘सच्चे दिन’ संपुष्टात आणून भाजपा सरकारने जनतेला अच्छे दिनचे स्वप्न दाखवून फसविल्याचा आरोप कॉँग्रेसच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलेल्या निवेदनात करण्यात आला आहे. यावेळी आंदोलनात कॉँग्रेसचे शहराध्यक्ष शरद अहेर, माजी मंत्री डॉ. शोभा बच्छाव, प्रदेश प्रवक्ते नगरसेवक डॉ. हेमलता पाटील, नगरसेवक वत्सलाताई खैरे, आशा तडवी, जॉय कांबळे यांच्यासह लक्ष्मण जायभावे, पंडित येलमामे, बबलू खैरे, उद्धव पवार, उमाकांत गवळी, मीराताई साबळे, गोपाळ जगताप, नितीन काकड, वसंत ठाकूर, कैलास कडलग आदी सहभागी झाले होते.