शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

नांदगावी सब-वेने घेतला पहिला बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2021 01:27 IST

रविवारची सकाळ तीन कोवळ्या जीवांच्या ‘आई.. आई’ अशा आकांताने कंपित झाली. रेल्वे लाईन ओलांडण्याच्या प्रयत्नात असलेल्या कोवळ्या मुलींना तिने रुळापलीकडे नेऊन पोहोचवले. मात्र या गडबडीत भरधाव येणाऱ्या महाराष्ट्र एक्स्प्रेसपासून ती स्वत:ला वाचविण्यात अपयशी ठरली. या घटनेचे तीव्र पडसाद शहरात उमटले असून प्रशासकीय व राजकीय अनास्थेने तिचा बळी घेतल्याची प्रतिक्रिया व्यक्त करण्यात येत आहे.

ठळक मुद्देअपघात : रेल्वे रुळ ओलांडताना विवाहितेचा मृत्यू

नांदगाव : रविवारची सकाळ तीन कोवळ्या जीवांच्या ‘आई.. आई’ अशा आकांताने कंपित झाली. रेल्वे लाईन ओलांडण्याच्या प्रयत्नात असलेल्या कोवळ्या मुलींना तिने रुळापलीकडे नेऊन पोहोचवले. मात्र या गडबडीत भरधाव येणाऱ्या महाराष्ट्र एक्स्प्रेसपासून ती स्वत:ला वाचविण्यात अपयशी ठरली. या घटनेचे तीव्र पडसाद शहरात उमटले असून प्रशासकीय व राजकीय अनास्थेने तिचा बळी घेतल्याची प्रतिक्रिया व्यक्त करण्यात येत आहे.

सकाळी मुलींना घेऊन एकवीरा देवीच्या दर्शनासाठी रेल्वे लाईन ओलांडताना स्वाती रवींद्र शिंदे (३०) या महिलेचा महाराष्ट्र एक्स्प्रेसच्या धक्क्याने मृत्यू झाला. स्वातीच्या मृत्यूने संतप्त शेकडो नागरिकांनी रेल्वे स्टेशन गाठून स्टेशन प्रबंधक विश्वजित मीना यांना दोन तास धारेवर धरल्याने तणाव निर्माण झाला. ठोस आश्वासन मिळाल्यावरच स्वातीच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्याची भूमिका तिच्या नातेवाईकांनी घेतली. नागरिक आणि रेल्वे प्रशासन यांच्यात तोडगा काढतांना, सब वे मधले पाणी उपसण्यासाठी पंप गरजेनुसार सातत्याने सुरू राहतील. अप व डाऊन या दोन्ही लोहमार्गावर पादचारी क्रॉसिंगच्या ठिकाणी गाडी येण्याचा इशारा देणारे बझर सात दिवसात कार्यान्वित करण्यात येतील. क्रॉसिंगच्या जागी रेल्वे पोलीस तैनात करण्यात येतील, असे लेखी आश्वासन मीना यांनी दिले.

पूर व नियोजनशून्य सब-वे मुळे शहराचे विभाजन झाले असून दैनंदिन गरजांसाठी दोन्ही बाजूंकडे आवागमन करणाऱ्या दहा हजार नागरिकांचा प्रश्न निर्माण झाला आहे. रेल्वे सब-वेत पाणी भरल्याने शहरात येण्यासाठी रेल्वे रुळावरून जाणे हा एकमेव पर्याय उरला आहे. दुसरा पर्याय चार कि.मी. लांबीचा आहे. घटना घडली तेव्हा अपकडे मालगाडी जात होती. रूळ ओलांडण्याची वाट बघत असलेली स्वाती आपल्या निकिता (१४), नंदिनी (१०), साक्षी (८), सोनू (५) यांना पलीकडे घेऊन जाण्याच्या तयारीत होती. मागचा डबा गेल्याबरोबर तिने डाऊन लाईनवरून मुलीना पास केले. शेवटी सोनूला घेऊन जात असताना अंगावर येणाऱ्या गाडीला चुकविण्यासाठी तिने सोनूला अक्षरश: पलीकडे ढकलले. त्याचक्षणी कर्दनकाळ बनून आलेल्या गाडीचा जोरदार फटका बसून ती कोसळली. तिच्या समवेत सुवर्णा मोरे होती. आधीच गेल्याने ती बचावली. प्रत्यक्षदर्शी नगरसेवक नितीन जाधव व सोमनाथ घोंगाणे सेवाग्राम एक्स्प्रेसने मुंबईला जाण्यासाठी निघाले होते.

गाडी येत असताना बघून अनेकांनी आरडाओरडा करून स्वातीचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. परंतु मरणाच्या दारात पोहोचलेल्या स्वातीला तो आवाज ऐकूच आला नाही. दुकानात काम करणारा व रिक्षाने विद्यार्थी पोहोचवणारा तिचा पती रवींद्र शिंदे याचा आक्रोश सर्वांचे मन हेलावून गेला. मुलींच्या दु:खाला पारावार उरला नाही.

 

इन्फो

केंद्रीय मंत्री पवार यांच्याकडून कानउघाडणी

केंद्रीय राज्यमंत्री भारती पवार यांनी मोबाईलवरून संपर्क साधून कडक शब्दात प्रबंधक विश्वजित मीना यांची कानउघाडणी करून त्यांना नागरिकांची सोय तातडीने करण्याच्या सूचना दिल्या. मीना यांच्यासमवेत झालेल्या चर्चेत महावीर जाधव, विश्वास अहिरे, सुनील जाधव, भरत पारख, शंकर विसपुते, तुषार पांडे, सुनील सोर, सुनील नेग्णार, दत्तू आवारे, सौदागर आदींनी भाग घेतला.

            

टॅग्स :Nashikनाशिकrailwayरेल्वेAccidentअपघातDeathमृत्यू