शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईने पाकिस्तानची 'हवा टाईट'! मिसाइल चाचणीची केली घोषणा, सर्वत्र 'हाय अलर्ट'
2
बीएसएफ एका आदेशाची वाट पाहतेय, सुर्यास्तापूर्वी आला तर ठीक...; वाघा-अटारी बॉर्डरवर काय घडतेय...
3
"हिंदू हिंदू काय करताय?", पहलगाम हल्ल्यावर बोलताना शत्रुघ्न सिन्हांनी थेट पंतप्रधान मोदींवर साधला निशाणा
4
'देवाला घाबरलं पाहिजे, आता तुम्ही शून्याच्याही खाली जाणार'; पाकिस्तानी प्राध्यापकाची स्वतःच्याच देशावर टीका
5
संकटात कंपनी, गुंतवणकदार झाले कंगाल; ₹११२५ वरुन ₹९५ वर आला शेअर, सातत्यानं लोअर सर्किट
6
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध पेटले तर कोणता देश कोणाला पाठिंबा देईल? पाहा...
7
Pahalgam attack latest: पर्यटकांची हत्या करणाऱ्या तीन दहशतवाद्यांची ओळख पटली, 'या' दहशतवादी संघटनेशी कनेक्शन
8
सिंधू पाणी करार रद्द केल्यानंतर भारताचा थेट पाकच्या अर्थव्यवस्थेलाच धक्का! ३००० कोटींचे होणार नुकसान
9
पाकिस्तानचा गळा कापण्याची वेळ, इस्रायलसारखा बदला घ्यावा; अमेरिकेतून दिला गेला सल्ला
10
नवरी जोमात, नवरा कोमात! रसगुल्ला खाल्ला, हात धुण्याच्या बहाण्याने बॉयफ्रेंडसोबत गेली पळून
11
'पीएम मोदी 1 तासही देऊ शकत नाहीत?', सर्वपक्षीय बैठकीत न बोलवल्याने ओवेसी नाराज...
12
Varuthini Ekadashi 2025: भयंकर राग येतो? त्याक्षणी म्हणा 'हा' मंत्र, क्षणात शांत व्हाल आणि वाद मिटेल! 
13
'दहशतवाद्यांनी कल्पनाही केली नसेल त्यापेक्षा कठोर शिक्षा देणार'; बिहारमधून PM मोदींचा इशारा - Video पहा
14
गजकेसरी योगात स्वामी स्मरण दिन: ११ राशींना सर्वोत्तम, सुख-समृद्धी; स्वामींचे पाठबळ, शुभ-लाभ
15
Zim vs Ban test: झिम्बाब्वेचा चार वर्षांनी कसोटी विजय! बांगलादेशला पाजलं पराभवाचं पाणी
16
Pahalgam Terror Attack: "आम्ही जिवंत आहोत..."; पहलगाममधील 'तो' Video विनय नरवालचा नाही, जाणून घ्या 'सत्य'
17
नशीब बलवत्तर! फ्राईड राईसमध्ये जास्त पडलेल्या मीठानं जीव वाचवला; घटनास्थळापासून १५ मिनिटांवर होतं कुटुंब
18
पाकिस्तानी नागरिकांनी ४८ तासांत भारत न सोडल्यास काय कारवाई होणार? असा आहे गुप्तचर यंत्रणांचा ॲक्शन प्लॅन   
19
कधीपर्यंत धर्म सांगून गोळ्या खात राहायच्या?; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद काय बोलले?
20
पत्नीच्या नावे Post Office मध्ये ₹१,००,००० ची FD केल्यास २ वर्षांनी किती परतावा मिळेल, पाहा कॅलक्युलेशन

नाशिक: जानेवारी ते जूनपर्यंत डेंग्यू बाधितांची संख्या पोहोचली १६४ वर; प्रतिबंधक उपाय सुरु

By suyog.joshi | Updated: June 18, 2024 16:45 IST

गतवर्षी जानेवारी ते जून दरम्यान १२३ रुग्ण बाधित होते

नाशिक (सुयोग जोशी): पावसाळ्याच्या तोंडावरच शहरात डेंग्यू बाधितांची संख्या थेट १६४ वर पोहाेचल्याने महापालिकेचा आरोग्य विभाग सतर्क झाला आहे. जानेवारी ते जूनपर्यंत डेंग्यू रुग्णसंख्या १६४ व्यक्तींवर गेल्याचे समोर आले आहे. विशेष बाब म्हणजे गेल्या वर्षीपेक्षा यंदा डेंग्यूचे रुग्ण वाढल्याचे चित्र आहे. गतवर्षी जानेवारी ते जून दरम्यान १२३ रुग्ण बाधित होते. तर यावेळेस जानेवारी ते जून पंधरवड्यापर्यंत १६४ जण डेंग्यूने बाधित झाल्याचे चित्र आहे. दरम्यान, डेंग्यूवर प्रतिबंध घालण्यासाठी मलेरिया विभागाकडून उपाययोजना सुरु असल्याचा दावा मलेरिया विभागाने केला आहे.

महापालिकेच्या वतीने उपाययोजना म्हणून शहरातील सहाही विभागात डासोत्पत्ती केंद्र शोधले जात आहे. जेथे-जेथे डासोत्पत्ती केंद्र आढळून येत आहे, ते नष्ट केले जात आहे. शहरात अद्याप पावसाने दमदार हजेरी लावलेली नसली तरी डेंग्यू रुग्णांची संख्या दीडशे पार गेली आहे. त्यामुळे मलेरिया विभाग सतर्क झाला आहे. मुख्यत: डेंग्यू पावसाळ्यात अधिक दिसून येतो. कारण पाऊस पडल्यानंतर ठिकठिकाणी पाण्याचे डबके साचतात. मात्र, नंतर काही दिवसांनी त्या पाण्यामध्ये डेंग्यूचा संसर्ग करणाऱ्या डासांची उत्पत्ती होते.

तसेच रहिवासी भागातील अपार्टमेंटमध्ये, घरातील गच्चीवर, अडगळीला पडलेल्या वस्तूंमध्ये पावसाचे पाणी साचते. त्यामुळे डेंग्यू डासांची उत्पत्ती होते. डेंग्यूच्या डासांची उत्पत्ती ही स्वच्छ पाण्यात होत असल्याने नागरिकांनी आपल्या परिसरात, घराजवळ पाण्याचे डबके, कुठेही पाणी साचू देऊ नये, असे आवाहन मलेरिया विभागाने केले आहे. सहा महिन्यांतच रुग्णसंख्या १६४ वर गेली आहे. डेंग्यूची लक्षणे आढळल्यास नागरिकांनी रुग्णालयात जाऊन त्वरित तपासणी करुन घ्यावी, असे आवाहन मनपाने केले आहे.

डेंग्यूवर उपाययोजना सुरु आहे. नागरिकांना लक्षणे जाणवल्यास रुग्णालयात जाऊन तपासणी करुन घ्यावी. घरात किंवा आजूबाजूला पाण्याचे डबके साचणार नाही, याची काळजी घ्यावी. जानेवारी ते जूनच्या पंधरवड्यात रुग्णसंख्या १६४वर गेली असून, आरोग्य विभाग यावर लक्ष ठेवून आहे.-डॉ.नितीन रावते, जीवशास्त्रज्ञ मलेरिया विभाग, मनपा.

टॅग्स :Nashikनाशिकdengueडेंग्यू