शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

नाशिक निवडणूक निकाल : ‘मध्य’मध्ये तिरंगी लढत झाली एकतर्फी; देवयानी फरांदे यांच्याच बाजूने अद्याप मतदारांचा कल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2019 13:04 IST

Nashik Vidhansabha Election Results 2019 कॉँग्रेसच्या हेमलता पाटील २४ हजार २९१ मनसेचे नितीन भोसले यांना १२ हजार २४३ मते मिळाली आहे. पाटील आणि फरांदे यांच्या मतांच्या आकडेवारीत मोठा फरक असल्यामुळे जवळपास फरांदे यांचा विजय निश्चित मानला जात आहे.

ठळक मुद्देमनसेचे नितीन भोसले यांना १२ हजार २४३ मते मिळाली आहे.शहरी मतदार हे भावनेवर स्वार होणारे असल्याचे स्पष्ट हेमलता पाटील २४ हजार २९१ मते

नाशिक : मध्य मतदारसंघाने गेल्या दोन निवडणुकीत वेगवेगळ्या पक्षांना साथ दिली आहे. यामुळे विशिष्ट पक्षाचा प्रभाव जाणवत नव्हता. यंदाही युती, आघाडी आणि मनसे अशी तिरंगी लढत या मतसादरसंघात पहावयास मिळाली; मात्र मतमोजणीनंतर ही लढत थेट एकतर्फी झाली आणि मतदारांचा कल ११व्या फेरीअखेर देवयानी फरांदे यांनी ११ हजार ५५४ मतांनी आघाडी घेतली आहे. त्यांना ३५ हजार ८४५ मते तर कॉँग्रेसच्या हेमलता पाटील २४ हजार २९१ मनसेचे नितीन भोसले यांना १२ हजार २४३ मते मिळाली आहे.पाटील आणि फरांदे यांच्या मतांच्या आकडेवारीत मोठा फरक असल्यामुळे जवळपास फरांदे यांचा विजय निश्चित मानला जात आहे.नाशिक शहरातील मतदारसंघांची पुनर्रचना २००९ मध्ये झाल्यानंतर या मतदारसंघांत सर्वप्रथमच महाराष्टÑ नवनिर्माण सेनेने झेंडा रोवला होता, तर त्यानंतर २०१४ मध्ये झालेल्या निवडणुकीत भाजपच्या देवयानी फरांदे यांनी बाजी मारली होती. त्यामुळे या मतदारसंघात सामाजिक राजकीय गणिते काहीही असो मात्र हा निव्वळ शहरी मतदार हे भावनेवर स्वार होणारे असल्याचे स्पष्ट झाले आहे.यंदा भाजपने अनेक इच्छुकांना डावलून देवयानी फरांदे यांना उमेदवारी दिली आहे. तर दुसरीकडे कॉँग्रेसने डॉ. हेमलता पाटील यांना उमेदवारी दिली आहे. कॉँग्रेस पक्षात खरे तर नेहमीच उमेदवारीसाठी स्पर्धा असते; परंतु यंदा ऐनवेळी उमेदवारीचा निर्णय घेतला आहे. तर मनसेने नितीन भोसले यांचा नाशिक पश्चिम मतदारसंघ बदलून त्यांना मध्य मध्ये उभे केले आहे. याशिवाय वंचित बहुजन आघाडीचे संजय साबळे यांच्यासह अन्य उमेदवार रिंगणात आहेत.गेल्या विधानसभा निवडणुकीत युती आणि आघाडी नसल्याने पक्षीय उमेदवारांनी स्वतंत्र निवडणूक लढविली होती. यंदा मात्र युती आणि आघाडी झाली आहे; परंतु त्यातील युती आघाडीतील एकजिनसीपणा मात्र दिसत नाही. युतीत जसा शिवसेनेने हात आखडता घेतला तसा आघाडीतदेखील राष्टÑवादीचा एक गट नाराज आहे.या निवडणुकीत मनसेला समवेत घेण्याचे प्रयत्न फोल ठरल्याने भाजपला पर्याय ठरू शकणाऱ्या आघाडीतदेखील मत विभागणी होणार आहे. त्यातच वंचित बहुजन आघाडी प्रस्थापित पक्षांची किती मते घेणार यावर निर्णय होऊ शकतो.

मतदारसंघातील कळीचे मुद्दे* नदीकाठच्या पूररेषेचा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा असून, तो सुटलेला नाही.* गावठाण पुनर्वसनाचा प्रश्न क्लस्टरच्या लालफितीत.*  वाहतूक कोंडीच्या जटिल समस्येवर तोडगा नाही, नियोजन कागदावरच.*स्मार्ट सिटीमुळे रस्त्यापासून गावठाण सुविधांची झालेली कोंडी.गावठाण स्पिरीट कितपत प्रभावी ?* पुनर्रचनेपूर्वीचा नाशिक मतदारसंघाचा विचार केला तर गावठाण भागातील फार कमी उमेदवारांना संधी मिळाली आहे. त्यामुळे निवडणुकीपूर्वी उमेदवार गावठाणातीलच हवा अशी एक खेळी सुरू झाली होती; मात्र नंतर ती मागे पडली. कॉँग्रेसने गावठाणातील शाहू खैरे यांना उमेदवारी दिली, मात्र त्यांनी ती मागे घेतल्यामुळे मतदारसंघातील पश्चिम भागातील उमेदवारी देण्यात आली. भाजपच्या उमेदवार देवयानी फरांदे त्याच भागातील आहेत. तर दुसरीकडे नितीन भोसले गावठाण भागातील आहेत. पश्चिम भागातील उमेदवारांचादेखील गावठाणावर विशेष भर असून, हा भाग कोणाला साथ देतो हेदेखील महत्त्वाचे आहे.विधानसभा मतदारसंघांच्या पुनर्रचनेत २००९ मध्ये नाशिक मध्य या मतदारसंघाची निर्मिती करण्यात आली. जुने नाशिक गावठाण आगार टाकळीपासून हा मतदारसंघ सुरू होतो आणि थेट कॉलेजरोड, गंगापूररोडच्या दुसºया टोकापर्यंंत यात समावेश आहे.२००९ मध्ये विधानसभा निवडणुकीत आघाडी विरुद्ध युती आणि मनसे अशी तिरंगी लढत झाली. मनसेच्या वसंत गिते यांना उमेदवारी दिली व त्यांनी बाजी मारली होती. परप्रांतिय-मराठी वाद आणि रोजगार हे त्यावेळी राज ठाकरे यांनी उपस्थित केलेले मुद्दे प्रभावी ठरले होते.२०१४ च्या निवडणुकीत युती आणि आघाडी तसेच मनसेने स्वतंत्र निवडणुका लढविल्या. त्यावेळी मोदी लाटेत भाजपाने बाजी मारली. आताही काश्मीरमधील ३७० कलम हटविणे आणि तिहेरी तलाक हे मुद्दे तारतील, अशी भाजपला अपेक्षा आहे.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019nashik-central-acनाशिक मध्यBJPभाजपाcongressकाँग्रेस