शहरं
Join us  
Trending Stories
1
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
2
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
3
काय आहे शिमला करार? पाकिस्तान देतोय रद्द करण्याची धमकी; सोप्या भाषेत समजून घ्या...
4
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
5
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
6
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
7
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
8
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
9
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
10
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
11
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
12
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
13
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
14
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
15
टी२० क्रिकेटमध्ये ऋषभ पंत अपयशी का ठरतोय? चेतेश्वर पुजाराने सांगितलं त्यामागचं कारण!
16
आयपीएल २०२५ मध्ये हेनरिक क्लासेनं मारला सर्वात लांब षटकार, पाहा टॉप १० खेळाडूंची यादी
17
नववर्षातील पहिला शुक्र प्रदोष: व्रताचरण करा, सुख-सौख्य मिळवा; महादेव भरभराट करतील
18
'ओयो'विरोधात तक्रार करणारा रिसॉर्ट मालकच आला अडचणीत; अग्रवाल यांच्यावर दाखल झाला होतो गुन्हा
19
...तोपर्यंत तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांचा पगार जप्त करा, हायकोर्टाचे आदेश, कारण काय? 
20
पहलगाम हल्ल्यातील जखमींसाठी मुकेश अंबानींची मोठी घोषणा; म्हणाले 'दहशतवाद हा मानवतेचा शत्रू..'

महाबळेश्वरपेक्षा नाशिक जास्त ‘कुल सिटी’; २४ तासांत पारा थेट ९.८ अंशावर

By अझहर शेख | Updated: January 16, 2024 16:14 IST

भारतीय हवामान खात्याकडून या आठवड्यात राज्यात थंडीची तीव्रता वाढणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.

नाशिक : शीत लहरींचा वेग वाढल्यामुळे उत्तर महाराष्ट्र गारठला असून नाशिक, जळगाव या जिल्ह्यांत थंडीचा कडाका वाढला आहे. महाबळेश्वरपेक्षा नाशिक हे सर्वाधिक ‘कुल सिटी’ असल्याचा अनुभव सध्या नाशिककरांना दोन दिवसांपासून येत आहे. गेल्या २४ तासांत किमान तापमान मंगळवारी (दि.१६) सकाळी थेट ९.८ अंश सेल्सिअसपर्यंत खाली घसरले. या हंगामातील ही सर्वाधिक नीचांकी नोंद ठरली.

भारतीय हवामान खात्याकडून या आठवड्यात राज्यात थंडीची तीव्रता वाढणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे. यानुसार रविवारी रात्रीपासूनच थंडी नागरिकांना जाणवू लागली होती. रात्री थंड वारे वेगाने वाहू लागल्याने सोमवारी किमान तापमान थेट ११.१ अंश तर मंगळवारी यापेक्षाही खाली तापमान आले. या हंगामात पहिल्यांदाच किमान तापमान दहा अंशांपेक्षा कमी नोंदविले गेले. थंडीचा कडाका वाढताच नागरिकांकडून पुन्हा उबदार कपड्यांच्या वापरावर भर दिला जाऊ लागला आहे, तसेच सकाळी व संध्याकाळी गोदाकाठावर व शहराजवळच्या खेड्यांत, तसेच शहरी भागातील गावठाण परिसरातही शेकोट्यांचा आधार रहिवासी घेतानाचे चित्र पाहावयास मिळत आहे.

महाबळेश्वरचे किमान तापमान १४.७ अंश इतके नोंदविले गेले असून त्या तुलनेत नाशिकचा पारा खूपच खाली घसरला आहे. यामुळे उबदार कपड्यांना आता शहरात पुन्हा मागणी वाढू लागली आहे. आठवडाभरापूर्वी थंडी पूर्ण गायब झाल्याचा अनुभव नागरिक घेत होते. आता मात्र थंडी चांगलीच जाणवू लागली आहे. या हंगामात डिसेंबरपासून आतापर्यंत थंडीचा फारसा कडाका नाशिककरांना जाणवला नव्हता. आठवडाभरापूर्वी ढगाळ हवामानासह किमान तापमानही १७.७ अंशांपर्यंत वाढलेले होते. या आठवड्यापासून वातावरणाच्या स्थितीमध्ये अचानक वेगाने बदल होत असून, किमान तापमानाचा पारा घसरू लागला आहे. कमाल तापमानातही ३ अंशांनी घसरण झाली आहे.

मागील पाच दिवसांचे किमान तापमान असे...(अंश सेल्सिअसमध्ये)१२ जानेवारी- १७.४१३ जानेवारी- १५.७

१४ जानेवारी- १५.४१५ जानेवारी- ११.१

१६ जानेवारी- ९.८

टॅग्स :Nashikनाशिक