शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वसामान्यांचे ₹ 1.8 लाख कोटी लुटणाऱ्यांची नावे उघड करा; राहुल गांधींचा SEBI वर हल्लाबोल
2
राहुल गांधींचा पासपोर्ट रद्द करा... भाजप खासदाराचे लोकसभा अध्यक्षांना पत्र 
3
रशिया-युक्रेन युद्ध संपणार का? PM मोदी आणि झेलेन्स्कींची तीन महिन्यांत तिसऱ्यांदा भेट...
4
बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा मृतदेह अखेर नातेवाईक घेणार ताब्यात
5
"...तर विरोधकांचाही 'त्या' एन्काउंटरला पाठिंबा असेल"; नाना पटोलेंनी शिंदे सरकारला दिलं चॅलेंज
6
"मग नंतर तो कधी शिकणार?"; यशस्वी जैस्वालबद्दल पाकिस्तानी माजी क्रिकेटरचं रोखठोक मत
7
निवडणुकीदरम्यान मतभेद बाजूला ठेवा, गटबाजी खपवून घेणार नाही, अमित शाहांनी टोचले कान
8
Gayatri Shingne : राजेंद्र शिंगणेंविरोधात पवारांचा उमेदवार ठरला? गायत्री शिंगणे लढवणार विधानसभा!
9
राज्यातील विविध तीर्थक्षेत्र विकासांच्या ३०५ कोटी रुपयांच्या आराखड्यांना मंजुरी
10
६ लाख मोबाईल फोन बंद, ६५ हजार URLs ब्लॉक... सायबर फ्रॉड रोखण्यासाठी सरकारची मोठी कारवाई
11
जयंत पाटलांचं अजित पवारांना नवं चॅलेंज; "मोदींकडून एवढं काम करून घेतलं, तर..."
12
जोगेश्वरी पूर्व विधानसभा मतदारसंघावरून शिवसेना शिंदे गट आणि भाजपात रस्सीखेच
13
राहुल गांधी यांच्याविरोधात तामिळनाडुतील 30 पोलिस ठाण्यात तक्रारी; कारण काय?
14
ऑडिशनमध्ये १०० वेळा रिजेक्ट झाला 'हा' स्टारकिड; डिप्रेशनचाही केला सामना, म्हणाला...
15
"अक्षय शिंदेला गोळ्या घालून मारणं फारच सहज झालं, त्याला...", उदयनराजेंची संतप्त प्रतिक्रिया
16
"आता मी एकालाही जिवंत सोडणार नाही", अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरपूर्वी काय घडलं?
17
Harini Amarasuriya : हरिणी अमरसूर्या बनल्या श्रीलंकेच्या नव्या पंतप्रधान, या पदावर विराजमान होणाऱ्या देशातील दुसऱ्या महिला
18
दिंडोरीत 'आत्राम' पॅटर्न? अजित पवारांचं गोकूळ झिरवळांनी वाढवलं टेन्शन!
19
IND vs BAN : दुसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी पोलिसांची मोठी कारवाई; 'त्या' २० जणांवर FIR दाखल
20
"आम्हा तिघांनाही CM व्हायचंय, पण निर्णय हायकमांडचा", रणदीप सुरजेवालांनी केले मोठे वक्तव्य

महाबळेश्वरपेक्षा नाशिक जास्त ‘कुल सिटी’; २४ तासांत पारा थेट ९.८ अंशावर

By अझहर शेख | Published: January 16, 2024 4:14 PM

भारतीय हवामान खात्याकडून या आठवड्यात राज्यात थंडीची तीव्रता वाढणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.

नाशिक : शीत लहरींचा वेग वाढल्यामुळे उत्तर महाराष्ट्र गारठला असून नाशिक, जळगाव या जिल्ह्यांत थंडीचा कडाका वाढला आहे. महाबळेश्वरपेक्षा नाशिक हे सर्वाधिक ‘कुल सिटी’ असल्याचा अनुभव सध्या नाशिककरांना दोन दिवसांपासून येत आहे. गेल्या २४ तासांत किमान तापमान मंगळवारी (दि.१६) सकाळी थेट ९.८ अंश सेल्सिअसपर्यंत खाली घसरले. या हंगामातील ही सर्वाधिक नीचांकी नोंद ठरली.

भारतीय हवामान खात्याकडून या आठवड्यात राज्यात थंडीची तीव्रता वाढणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे. यानुसार रविवारी रात्रीपासूनच थंडी नागरिकांना जाणवू लागली होती. रात्री थंड वारे वेगाने वाहू लागल्याने सोमवारी किमान तापमान थेट ११.१ अंश तर मंगळवारी यापेक्षाही खाली तापमान आले. या हंगामात पहिल्यांदाच किमान तापमान दहा अंशांपेक्षा कमी नोंदविले गेले. थंडीचा कडाका वाढताच नागरिकांकडून पुन्हा उबदार कपड्यांच्या वापरावर भर दिला जाऊ लागला आहे, तसेच सकाळी व संध्याकाळी गोदाकाठावर व शहराजवळच्या खेड्यांत, तसेच शहरी भागातील गावठाण परिसरातही शेकोट्यांचा आधार रहिवासी घेतानाचे चित्र पाहावयास मिळत आहे.

महाबळेश्वरचे किमान तापमान १४.७ अंश इतके नोंदविले गेले असून त्या तुलनेत नाशिकचा पारा खूपच खाली घसरला आहे. यामुळे उबदार कपड्यांना आता शहरात पुन्हा मागणी वाढू लागली आहे. आठवडाभरापूर्वी थंडी पूर्ण गायब झाल्याचा अनुभव नागरिक घेत होते. आता मात्र थंडी चांगलीच जाणवू लागली आहे. या हंगामात डिसेंबरपासून आतापर्यंत थंडीचा फारसा कडाका नाशिककरांना जाणवला नव्हता. आठवडाभरापूर्वी ढगाळ हवामानासह किमान तापमानही १७.७ अंशांपर्यंत वाढलेले होते. या आठवड्यापासून वातावरणाच्या स्थितीमध्ये अचानक वेगाने बदल होत असून, किमान तापमानाचा पारा घसरू लागला आहे. कमाल तापमानातही ३ अंशांनी घसरण झाली आहे.

मागील पाच दिवसांचे किमान तापमान असे...(अंश सेल्सिअसमध्ये)१२ जानेवारी- १७.४१३ जानेवारी- १५.७

१४ जानेवारी- १५.४१५ जानेवारी- ११.१

१६ जानेवारी- ९.८

टॅग्स :Nashikनाशिक