शहरं
Join us  
Trending Stories
1
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
2
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
3
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
4
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
5
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
6
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
7
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
8
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
9
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
10
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
11
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
12
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
13
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
14
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
15
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
16
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
17
काश्मीरला जाण्यासाठी अनेक महिने पैसे साठवले; आनंद, स्वप्न पूर्ण करायला गेले अन् घात झाला 
18
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
19
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
20
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर

“नाशिक-मुंबई रस्त्याचे काम सुमार दर्जाचे”; छगन भुजबळ यांनी व्यक्त केली व्यथा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2024 08:58 IST

मुळातच पावसाळ्यानंतर म्हणजे ऑक्टोबर महिन्यात पूल, भुयारी मार्ग अशी कामे व्हायला हवी हाती ती झाली नाहीत. 

लोकमत न्यूज नेटवर्क, नाशिक : नाशिक - मुंबई महामार्गाची कामे अत्यंत संथगतीने सुरू असून, झिगझॅग चालावे लागते. अनेकदा खड्ड्यांमुळे ट्रेलर अडकतात. भिवंडी बायपासचे कामही सुमार दर्जाचे आहे. प्रवास करताना हाडे खिळखिळी होत आहेत. मलाही त्याचा त्रास झाला. मध्यंतरी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी या रस्त्यासाठी काही हजार कोटी रुपये खर्च करून रस्ता काँक्रिटीकरण करणार असल्याचे सांगितले हेाते ते काम नंतर करा, आधी खड्डे तर बुजवा, अशी व्यथा राज्याचे अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केली आहे.

नाशिकमध्ये शुक्रवारी प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी ही व्यथा मांडली. मुंबई-आग्रा महामार्ग अत्यंत जुना असून, त्यावर नाशिकची वाहतूक चालत नाही, तर आग्र्यापर्यंतची वाहतूक चालते. या महामार्गाच्या अवस्थेमुळे नाशिकचे नाव बदनाम होत असल्याचे सांगून भुजबळ म्हणाले की, मुळातच पावसाळ्यानंतर म्हणजे ऑक्टोबर महिन्यात पूल, भुयारी मार्ग अशी कामे व्हायला हवी हाती ती झाली नाहीत. 

आता रस्त्यावर खड्डे आहेत, रस्ते झिगझॅग आहेत तसेच रस्ते समतल न केल्याने चढ-उतार अधिक आहे. त्यामुळे वेळ खूप लागतो. इंधन लागते आणि हाडं खिळखिळी होतात, असे सांगून भुजबळ म्हणाले की, रस्ते विकास महामंडळाचे काम सर्वाधिक संथ आणि सुमार आहे. आता त्यात मंत्री दादा भुसे यांनी लक्ष घातले आहे. या मार्गाचे सहापदरीकरण करून रस्ते सिमेंट-काँक्रीटचे करण्याबाबत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी काही वर्षांपूर्वी घोषणा केली होती; मात्र सिमेंटचे रस्ते नंतर करा, आधी खड्डे बुजवा म्हणजे मुंबईला तीन-साडेतीन तासांत पोहोचलो तरी चालेल; परंतु दहा तास सध्या लागणारा वेळ नको आहे, असे ते म्हणाले. 

 

टॅग्स :Chhagan Bhujbalछगन भुजबळ