शहरं
Join us  
Trending Stories
1
महाविकास आघाडी तुटण्याच्या दिशेने?; भास्कर जाधव कडाडले, काँग्रेसला करून दिली आठवण
2
जम्मू काश्मीरात दहशतवादी हल्ला; गांदरबल इथं गोळीबारात ३ मजूर ठार तर ५ जखमी
3
समाजवादी गणराज्य पक्ष काँग्रेसमध्ये विलीन; कपिल पाटील यांचा दिल्लीत पक्षप्रवेश
4
नाशिकमध्ये सीमा हिरेंच्या उमेदवारीला पक्षातच विरोध; महायुतीत बंडखोरीची शक्यता
5
"आमच्यात वाद नव्हताच..."; उमेदवारी न मिळालेल्या भाजपा आमदार अश्विनी जगपात यांचं विधान
6
१५ बैठका, ३४० तास चर्चा तरीही जागावाटप सुटेना; 'मातोश्री'तील बैठकीत काय घडलं?
7
पक्षफुटीनंतरही एकनिष्ठ राहिलेल्या आमदाराचा शरद पवारच करणार 'करेक्ट कार्यक्रम'?
8
कुटुंबवादामुळे तरुणांचे नुकसान; 1 लाख तरुणांना राजकारणात आणणार, PM मोदींची घोषणा
9
Video - मोबाईलवर बोलत रेल्वे ट्रॅक ओलांडत होता 'तो'; अचानक समोरून आली ट्रेन अन्...
10
कडक सॅल्यूट! पतीचा मृत्यू झाला पण 'तिने' हार नाही मानली; ई-रिक्षा चालवून भरतेय कुटुंबाचं पोट
11
दारुण पराभवानंतर BCCI चा मोठा निर्णय; उर्वरीत मालिकेसाठी स्टार खेळाडूला मिळाली संधी
12
नात्याला काळीमा! नातवाने त्रिशूळाने वार करून केली आजीची हत्या, शिवलिंगावर रक्ताचा अभिषेक
13
मुंबईतल्या 'या' १४ जागांवर भाजपाचे उमेदवार ठरले; ३ विद्यमान आमदार प्रतिक्षेत 
14
ज्योती मेटे यांचा शरद पवार गटात प्रवेश, विधानसभा निवडणूक लढवण्याबाबत म्हणाल्या...
15
महिलेशी मैत्री, हॉटेलमध्ये भेटायला बोलावलं अन्...; कसा पकडला गेला शार्प शूटर सुक्खा?
16
जास्तीत जास्त मुले जन्माला घाला, अन्यथा..; CM चंद्रबाबू नायडूंचे आवाहन, कारण काय?
17
महाराष्ट्रात हरयाणामध्ये झालेल्या त्या चुका काँग्रेस टाळणार, राहुल गांधी घेताहेत अशी खबरदारी
18
शेलार बंधू विधानसभेच्या रिंगणात; आशिष शेलारांसह त्यांच्या मोठ्या भावालाही भाजपची उमेदवारी
19
दिल्लीतील प्रदूषणाला उत्तर प्रदेश आणि हरयाणा सरकारवर जबाबदार; CM आतिशी यांचा आरोप
20
Ranji Rrophy: रिंकूची चौकार-षटकारांची 'बरसात'; बॅटिंगमध्ये Yuzvendra Chahal ही ठरला 'फर्स्ट क्लास'

नाशिकच्या गाड्या सुरळीत सुरू

By admin | Published: August 05, 2015 10:23 PM

रेल्वे अपघात : मध्य प्रदेशातील घटनेमुळे रेल्वेसेवा विस्कळीत

नाशिकच्या गाड्या सुरळीत सुरूनाशिकरोड : मध्य प्रदेशातील हरदा रेल्वेस्थानकाजवळ मंगळवारी मध्यरात्री कामायनी व जनता एक्स्प्रेस या रेल्वे गाड्यांना अपघात झाल्याने मध्य प्रदेशातून मुंबईकडे जाणाऱ्या चार गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. दरम्यान, या अपघाताचा नाशिकच्या गाड्यांवर कोणताही परिणाम झाला नसून भुसावळ-मुंबई मार्ग सुरळीत सुरू आहे. मात्र लांब पल्ल्याच्या गाड्या सुमारे चार तास विलंबाने धावत आहेत. मध्य प्रदेशातील हरदा रेल्वे स्थानकाच्या २० किलोमीटर अगोदर कालीमचक नदी रेल्वे पुलाचा काही भाग मंगळवारी मध्यरात्री मुसळधार पावसामुळे वाहून गेला होता. यामुळे मुंबई-वाराणसी-कामायनी एक्स्प्रेस ही मंगळवारी रात्री सव्वा बाराच्या सुमारास कालीमचक रेल्वे नदी पुलावरून जात असताना रेल्वे मार्ग उखडला. यामुळे पाच बोग्या या नदीत जाऊन पडल्या, तर काही डबे रेल्वे मार्गावरून घसरले. या अपघातानंतर काही वेळातच जबलपूर-मुंबई जनता एक्स्प्रेस ही पण त्याच ठिकाणी रेल्वे रुळावरून घसरून अपघातग्रस्त झाली. मध्यरात्री मुसळधार पावसामुळे मदतकार्यात मोठी अडचण निर्माण झाली होती. या अपघातामुळे भुसावळ ते इटारसी रेल्वेसेवा बुधवारीदेखील ठप्प झालेली होती.या अपघातामुळे बुधवारी सुटणारी जबलपूर-मुंबई गरीबरथ व हबीबगंज-एलटीटी व उद्या गुरुवारी सुटणारी मुंबई-जबलपूर गरीबरथ व एलटीटी-हबीबगंज या चार गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. तर मुंबईहून भुसावळमार्गे इटारसी जाणाऱ्या व येणाऱ्या सर्व लांब पल्ल्याच्या गाड्या या मुंबईवरून नाशिकरोड, भुसावळ, नागपूर मार्गे इटारसीहून पुढे जात व येत आहे. दरम्यान, नाशिकहून मुंबईकडे जाणाऱ्या पंचवटी, गोदावरी, तपोवन एक्स्प्रेस गाड्या सुरळीत सुरू आहेत. गेल्या तीन-चार महिन्यांपासून मध्य रेल्वेच्या मार्गावर वारंवार काही दुर्घटना घडत असल्याने रेल्वे प्रशासन व प्रवासी प्रचंड त्रस्त झाले आहेत. इटारसी येथील रूट रिले इंटरलॉकिंग पॅनलला लागलेली आग, मुंबई-ठाणे परिसरात झालेल्या मुसळधार पावसामुळे कोलमडलेली अ‍ॅटोमॅटीक सिग्नल यंत्रणा, इगतपुरी रेल्वेस्थानकात मालगाडीचे घसरलेले डबे अशा घटनांमुळे रेल्वे सेवेवर विपरीत परिणाम झाला होता. यामुळे अनेक रेल्वे काही दिवस रद्द ठेवून रेल्वे प्रशासनाला मोठ्या परिश्रमानंतर रेल्वेसेवा पूर्वपदावर आणता आली होती. आता पुन्हा मध्य प्रदेशातील हरदा रेल्वेस्थानकाजवळ झालेल्या अपघातामुळे रेल्वे प्रशासन हादरून गेले आहे. किमान दोन-तीन दिवस रेल्वेसेवा पूर्वपदावर आणण्यासाठी लागतील, असा अंदाज रेल्वेच्या सूत्रांनी व्यक्त केला आहे. (प्रतिनिधी)