शहरं
Join us  
Trending Stories
1
राजकारणात भूकंप होणार? "अजित पवार महायुतीतून बाहेर पडतील"; बच्चू कडू यांचं मोठं वक्तव्य
2
आम्ही दिल्लीला जातो ते महाराष्ट्राच्या विकासासाठी; विरोधकांच्या टीकेवर CM शिंदेंचा पलटवार
3
पेजर आणि वॉकीटॉकी स्फोटाने हिजबुल्लाचा पराभव, १५०० सैनिकांनी युद्धातून माघार घेतली
4
दिल्लीत कामगारांसाठी आनंदाची बातमी, आप सरकारने किमान वेतन वाढवले
5
पाकिस्तान क्रिकेटमध्ये वाद? शाहीन आफ्रिदीने सोडले मौन; मोठे विधान करत खेळाडूंना फटकारले
6
Mumbai Rain: मुंबईच्या पूर्व उपनगरात तुफान पाऊस; भांडूप, मुलुंडमध्ये रस्त्याला आलं नदीचं रुप!
7
शेतकऱ्यांना मिळणार नवरात्रीला गिफ्ट, 'या' तारखेला PM Kisan योजनेचे पैसे जमा होणार!
8
"मला मुख्यमंत्री व्हायचं आहे, पण…’’ अजित पवार यांनी सांगितली नेमकी अडचण  
9
कोहली-रोहितला 'स्पेशल ट्रीटमेंट'? माजी क्रिकेटर थेट BCCI वर कडाडला
10
'आम्ही ओरिजनल म्हणणाऱ्यांना मागे सोडले'; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
11
Suraj Chavan : "घोडा नवऱ्याला घेऊन पळून गेला..."; सूरजने सांगितला वरातीमधला गमतीदार किस्सा
12
नरेंद्र मोदींना पुन्हा माफी मागावी लागेल; कंगना रणौतच्या वक्तव्यावरुन राहुल गांधींची टीका
13
मनू भाकरचे नेटकऱ्यांना जोरदार प्रत्युत्तर; त्या घटनेवरुन ट्रोल करणाऱ्यांना सांगितला देशहिताचा विचार
14
ख्रिस गेल पुन्हा एकदा मैदानात; शिखर धवनच्या नेतृत्वात खेळणार, भारतात जल्लोषात स्वागत
15
'लाडकी बहीण' योजनेत ६ 'लाडक्या भावां'चे अर्ज; 'असा' लागला शोध, कठोर कारवाई होणार
16
धक्कादायक! एचडीएफसी बँकेत महिला कर्मचाऱ्याचा संशयास्पद मृत्यू; नेमकं प्रकरण काय?
17
Akshay Shinde Encounter News अक्षय शिंदे एन्काउंटरप्रकरणी कोर्टाने पोलिसांना विचारले हे १० प्रश्न; न्यायाधीशांना ५०० राउंड फायर केल्याचा अनुभव
18
“२ महिने राहिले, राज्यात सरकार बदलल्याशिवाय आता स्वस्थ बसणार नाही”; शरद पवारांचा निर्धार
19
क्रूरतेचा कळस! सहावीतील मुलाला शिक्षकाने काठी फेकून मारली, विद्यार्थ्याची दृष्टी गेली
20
'शरद पवार दैवत'ने अजित पवारांचं वाढवलं टेन्शन, सुप्रीम कोर्टात पोहोचलं प्रकरण

लोकहिताचे निर्णय घेण्याची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2017 12:41 AM

नाशिक : सरकारने लोकप्रिय विधाने करू नये. जनतेला सक्षम आरोग्यसेवा पुरविण्यासाठी पूरक असलेले लोकहित साधणारे निर्णय घेऊन प्रभावी अंमलबजावणी करण्यावर भर द्यावा आणि कोलमडलेली आरोग्यव्यवस्था बळकट करावी

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : सरकारने लोकप्रिय विधाने करू नये. जनतेला सक्षम आरोग्यसेवा पुरविण्यासाठी पूरक असलेले लोकहित साधणारे निर्णय घेऊन प्रभावी अंमलबजावणी करण्यावर भर द्यावा आणि कोलमडलेली आरोग्यव्यवस्था बळकट करावी, असे मत इंडियन मेडिकल असोसिएशनचे (आयएमए) राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. रवि वानखेडकर यांनी व्यक्त केले.आयएमएच्या नाशिक शाखेच्या वतीने आयोजित दोन दिवसीय राज्यस्तरीय ‘जेरिकॉन-२०१७’ परिषदेचे उद्घाटन शनिवारी (दि.२२) करण्यात आले याप्रसंगी वानखेडकर बोलत होते. व्यासपीठावर राज्याध्यक्ष डॉ. अशोक तांबे, शहराध्यक्ष डॉ. मंगेश थेटे, डॉ. हेमंत सोननीस, डॉ. किशोर भंडारी, डॉ. किरण शिंदे, डॉ. आवेश पलोड, डॉ. राजेंद्र कुलकर्णी, डॉ. राजश्री पाटील आदी पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी वानखेडकर यांनी वैद्यकीय क्षेत्राबाबत सरकारकडून आखल्या जाणाऱ्या विविध धोरणांवर टीका केली, तसेच आरोग्यसेवेवर शेजारील गरीब राष्ट्रांपेक्षाही कमी खर्च भारताकडून होत असल्याची खंतही व्यक्त केली. यावेळी ते म्हणाले, सरकारने राज्य वैद्यक परिषद समितीच्या निवडणुका होऊन दहा महिने लोटले तरी अद्याप समिती गठित केली नाही हे दुर्दैव; मात्र सरकारला हे गरजेचे वाटत नाही तर लोकप्रिय विधाने करून वैद्यकशास्त्राच्या बाबतीत जनतेचा रोष कसा वाढेल, यामध्ये जास्त रस वाटतो असा आरोप वानखेडकर यांनी यावेळी केला. सरकारने धोरण ठरविताना दुटप्पीपणा थांबवावा, असे यावेळी आवाहन केले. या परिषदेसाठी राज्यभरातून सुमारे दीड हजाराहून अधिक डॉक्टर दाखल झाले आहे. आरोग्य विषयक विविध विषयांवर चर्चासत्रे पार पडणार आहेत.क्रॉसपॅथीला विरोध कायम‘आयएमए’ने नेहमीच क्रॉसपॅथीला विरोध दर्शविला आहे. राज्याची ९० टक्के आरोग्यसेवा खासगी असून, केवळ १० टक्के सरकारी आहे. डॉक्टरांची शासनाने भरती करावी आणि राज्याची आरोग्यसेवा सक्षम करण्याचा प्रयत्न करावा. आपल्या शैक्षणिक पात्रता व गुणवत्तेनुसारच डॉक्टरांनी रुग्णांना आरोग्यसेवा पुरवावी, असे आवाहन राज्याध्यक्ष डॉ. अशोक तांबे यांनी केले.