शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी सिंधू करार थांबवला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
2
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यामुळे २१,००० कोटी पणाला, काश्मीरच्या अर्थव्यवस्थेची मोठी हानी, देशाला होणार हे १० तोटे 
3
पहलगाम दहशतवादी हल्ला : मृत जगदाळेंच्या कुटुंबीयांनी शरद पवारांना सांगितली आपबिती; संसदेत मुद्दा उचलण्याची केली मागणी
4
भाच्यासोबतच अनैतिक संबंध अन् पतीची हत्या, दोन तुकडे करून मृतदेह ट्रॉली बॅगमध्ये टाकला; पण...
5
Stock Market Today: ७ दिवसांच्या तेजीनंतर शेअर बाजार सुस्तावला, Sensex मध्ये १४० अंकांची घसरण; Tata Consumer, Eternal, ONGC टॉप लूझर्स
6
सिंधू पाणी करार थांबवल्याने पाकिस्तानचं टेन्शन वाढलं! भारताला जोरदार प्रत्युत्तर देण्याच्या तयारीत
7
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
8
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई
9
"गेल्या महिन्यात काश्मीरला जायचा विचार करत होतो...", पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर प्रसाद खांडेकरची पोस्ट
10
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
11
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
12
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
13
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
14
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
15
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
16
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
17
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
18
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
19
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
20
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा

निमाणी बसस्थानकाकडे एसटी प्रशासनाचे दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2019 00:23 IST

पावसाळ्यात निमाणी बसस्थानकात पावसाचे पाणी साचून मोठ्या प्रमाणात खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. एसटी प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याने खड्ड्यांचे चित्र  आजही ‘जैसे थे’ आहे.

पंचवटी : पावसाळ्यात निमाणी बसस्थानकात पावसाचे पाणी साचून मोठ्या प्रमाणात खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. एसटी प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याने खड्ड्यांचे चित्र  आजही ‘जैसे थे’ आहे. निमाणी बसस्थानकातील खड्डे आणि रस्त्याच्या झालेल्या दुरवस्थेमुळे प्रवाशांची गैरसोय तर होतेच शिवाय एसटी बसेसचे नुकसान होत असल्याने एसटी प्रशासनाने तत्काळ दखल घेऊन खड्डे बुजवावे, अशी मागणी प्रवासी वर्गाने केली आहे.बसस्थानकातील रस्त्याची झालेली दुरवस्था लक्षात घेऊन प्रशासनाने तत्काळ दखल घ्यावी, अशी मागणी करून त्याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे एसटी प्रशासनाच्या भोंगळ कारभाराचे दर्शन घडते.पावसाळा सुरू होण्याच्या अगोदरपासून बसस्थानकात खड्ड्यांचे साम्राज्य पसरलेले आहे. खड्ड्यांमुळे बसस्थानकात येणाऱ्या प्रवाशांना तसेच बसचालकांना खडतर मार्गाचा त्रास सहन करावा लागत आहे. बसचालकांना बसस्थानकात बस नेताना तसेच बाहेर काढताना तारेवरची कसरत करावी लागते. एसटी प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने निमाणी बसस्थानकातील रस्त्यावरची खडी उखडली आहे.

टॅग्स :state transportएसटीNashikनाशिक