शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
2
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
3
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
4
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
5
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
6
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
7
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
8
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
9
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
10
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
11
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
12
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
13
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
14
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
15
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
16
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
17
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
18
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
19
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
20
टी२० क्रिकेटमध्ये ऋषभ पंत अपयशी का ठरतोय? चेतेश्वर पुजाराने सांगितलं त्यामागचं कारण!

शिरवाडे वणीत कुसुमाग्रजांच्या स्मारकाची उपेक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2021 00:53 IST

शिरवाडे वणी : कविकुलगुरू कुसुमाग्रज तथा वि. वा. शिरवाडकर यांच्या प्रेरणादायी स्मारकाचे काम त्यांची मायभूमी असलेल्या शिरवाडे वणी गावात पूर्णत्वाला जाऊ शकलेले नाही. स्मारकाचे काम रखडल्याने गावकऱ्यांमध्ये उपेक्षेची भावना असून शासनाने स्मारक पूर्णत्वाला न्यावे, अशी मागणी होत आहे.

ठळक मुद्दे स्मारकाचे काम रखडल्याने गावकऱ्यांमध्ये उपेक्षेची भावना

दिलीप निफाडे

शिरवाडे वणी : कविकुलगुरू कुसुमाग्रज तथा वि. वा. शिरवाडकर यांच्या प्रेरणादायी स्मारकाचे काम त्यांची मायभूमी असलेल्या शिरवाडे वणी गावात पूर्णत्वाला जाऊ शकलेले नाही. स्मारकाचे काम रखडल्याने गावकऱ्यांमध्ये उपेक्षेची भावना असून शासनाने स्मारक पूर्णत्वाला न्यावे, अशी मागणी होत आहे.                  नाशिकपासून ४० किलोमीटर अंतरावर असलेले शिरवाडे वणी हे ४० वर्षांच्या मागील कालखंडात संपूर्ण महाराष्ट्रात चोरांचे शिरवाडे म्हणून प्रसिद्ध होते. मात्र, या गावाची ओळख कुसुमाग्रजांमुळे कुसुमाग्रजांचे शिरवाडे म्हणून बनली आहे. कुसुमाग्रजांचे त्यांच्या मायभूमीत स्मारक व्हावे यासाठी अशोक निफाडे यांनी स्मारकाची धुरा आपल्या खांद्यावर घेतली आणि शिरवाडे वणी ग्रामपंचायतीमार्फत नोव्हेंबर २००४ मध्ये पंचायत समितीमार्फत जिल्हा परिषदेकडे प्रस्ताव पाठविण्यात आला होता.              सातत्याने तीन वर्षे पाठपुरावा केल्यानंतर जिल्हा परिषदेमार्फत साडेबारा लाख रुपयांचा निधी कसाबसा पदरात पडला आणि त्या निधीतून सन २००७ मध्ये राष्ट्रीय महामार्गालगत स्वागत कमान व गावालगत स्मारक परिसराला संरक्षक भिंत तसेच पाण्याची टाकी, स्मारक परिसरात काँक्रिटीकरण आदी कामे करण्यात आली.                 राज्यसभेतील खा. बाळ आपटे यांच्या निधीतूनही १० लाख रुपये निधी उपलब्ध करून कुसुमाग्रज वाचनालयाचे काम पूर्ण करण्यात आले. मात्र, स्मारक परिसरातील स्वच्छतागृह, सांस्कृतिक सभागृह व अन्य कामे रखडलेली आहेत. त्यामुळे स्मारकाच्या उर्वरित कामांसाठी निधी उपलब्ध करून देण्याची मागणी गावकऱ्यांकडून होत आहे.केवळ आश्वासनांचा पाऊसपहिल्या टप्प्यातील कामे सुरू झाल्यानंतर गावात लोकप्रतिनिधींची मोठ्या प्रमाणावर वर्दळ सुरू झाली होती. निधी उपलब्ध करून देण्यासाठी स्थानिक, राजकीय पातळीवरील पुढारी व नेत्यांची अहमहमिका लागली होती. परंतु, स्मारक परिसरात विविध कार्यक्रमांच्या वेळी फक्त आश्वासनांचा पाऊस पडला. आता नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीतील नवनिर्वाचित सदस्यांनी सदर काम पूर्णत्वास न्यावे, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.लोकहितवादी मंडळाकडे लक्षनाशिक येथे कुसुमाग्रजांनीच स्थापन केलेल्या लोकहितवादी मंडळाच्या वतीने ९४ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन भरविले जाणार आहे. या संमेलनासाठी कोट्यवधी रुपयाचा निधी संकलित होणार आहे. शासनानेही ५० लाख रुपये अनुदान दिले आहे. लोकहितवादी मंडळाने कुसुमाग्रजांच्या स्मारकासाठी संमेलनाच्या माध्यमातून काही प्रमाणात निधी उपलब्ध करून द्यावा व स्मारक पूर्णत्वासाठी प्रयत्न करावे, अशी मागणीही पुढे येत आहे.फोटो- २९ शिरवाडे वणी

टॅग्स :Kusumagrajकुसुमाग्रजnifadनिफाड