शहरं
Join us  
Trending Stories
1
धनगर आरक्षणाचा जीआर निघाला तर ६५ आमदार राजीनामा देणार; महायुतीच्या आमदाराचा इशारा
2
४४ वर्षांनंतर काँग्रेसने जम्मू-काश्मीरच्या तरुणाला दिली जबाबदारी,उदय भानू चिब कोण आहेत?
3
आधी आक्रमक इशारा, नंतर हात जोडले; शरद पवारांच्या पक्षात गेलेल्या नेत्याबद्दल अजित पवार काय म्हणाले?
4
...तर अशांवर POCSO गुन्हा दाखल होणार; चाइल्ड पोर्नोग्राफीवर सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
5
उद्धव ठाकरे नाही, नाना पटोले मुख्यमंत्री होणार? दाव्यावर काँग्रेस नेत्यांच्या प्रतिक्रिया यायला लागल्या
6
मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि CM एकनाथ शिंदेंची भेट; 'वर्षा' बंगल्यावर अर्धा तास खलबतं
7
काँग्रेस नेत्या कुमारी शैलजा भाजपात जाणार? खट्टर यांच्या ऑफरवर दिलं स्पष्ट उत्तर...   
8
टायमिंगच्या नादात बसनं वेग पकडला; भीषण अपघातात ६ जण जागीच ठार
9
धमकी देणारा 'तो' आमदार कोण?; भरत गोगावलेंच्या गौप्यस्फोटावर संजय शिरसाट यांचा दावा
10
हमासचा नवा प्रमुख सिनवारही मारला गेला? इस्रायलने चौकशीला सुरुवात केली
11
Coldplay ची भारतात प्रचंड चर्चा! लाखो रुपयांची तिकिटं क्षणार्धात संपली; काय आहे या बँडचा इतिहास?
12
Dnyaneshwari Jayanti: माऊलींचा विश्वाला अमृत ठेवा; जगत् कल्याणाचे पसायदान देणारी ज्ञानेश्वरी
13
राज्याच्या राजकारणात काय शिजतंय?; विधानसभेपूर्वीच महायुतीत ठिणगी पडण्याची शक्यता
14
Tarot Card: सोमवार थोडा कंटाळवाणा, सप्ताह ठरणार आनंदाचा; वाचा टॅरो भविष्य!
15
Gold Rate Today : सप्टेंबरच्या अखेरच्या आठवड्यात सोन्याच्या दरात तेजी; पाहा २२ कॅरेट, २४ कॅरेट सोन्याची किंमत
16
WTC Points Table मध्ये आता लंकेचाही 'डंका'; न्यूझीलंडला दिला मोठा दणका!
17
ऐहिक वासना नष्ट होऊन सर्व सुखाची प्राप्ती करून देणारा ग्रंथ म्हणजे ज्ञानेश्वरी; एका वाचकाचा प्रासादिक अनुभव!
18
पितृपक्षात गुरुपुष्य योग: १० राशींना लॉटरी, अचानक धनलाभ; लक्ष्मी-कुबेर कृपा, मालामाल व्हाल!
19
मुख्यमंत्रिपदासाठी नाना पटोलेंचं नाव पुढे करणाऱ्या काँग्रेसच्या नेत्यांना संजय राऊतांचा टोला, म्हणाले...
20
शरद पवार गटाच्या मतदारसंघावर दावा; विधानसभा निवडणुकीत वसंत मोरेंची होणार कोंडी?

नववसाहतीत समस्या ‘जैसे थे’

By admin | Published: November 05, 2016 1:54 AM

ओमनगर, टकलेनगर : रस्त्यांची कामे अर्धवट स्थितीत

संदीप झिरवाळ पंचवटी

पूर्वीचा प्रभाग क्रमांक ३, १० आणि ११ असे तीन प्रभाग मिळून नवीन प्रभागरचनेत प्रभाग ३ची निर्मिती झाली आहे. गेल्या चार पंचवार्षिक निवडणुकीत मतदारांनी भाजपाला सर्वाधिक पसंती दिल्याने हा भाग भाजपाचा गड मानला जातो. गेल्या पंचवार्षिक निवडणुकीत याच प्रभागात भाजपा, राष्टÑवादी कॉँग्रेस तसेच मनसेच्या उमेदवारांना मतदारांनी कौल दिला होता. गणेशवाडीपासून सुरू झालेल्या प्रभागाची व्याप्ती थेट रासबिहारी शाळेच्या मागील बाजूपर्यंत असल्याने विद्यमान लोकप्रतिनिधींपुढे नवीन उमेदवारांचे आव्हान उभे ठाकणार आहे. जुन्या तीन प्रभागांचा एक प्रभाग झाला आहे. संपूर्ण हिंरावाडी, धात्रकफाटा, जुना आडगाव नाका, विजयनगर कॉलनी, जनार्दनस्वामीनगर, हिरावाडीरोड, त्रिमूर्तीनगर हा नवीन भाग जोडला गेला, तर आमदार बाळासाहेब सानप यांचा जुना प्रभाग क्रमांक ११चा जवळपास सर्वच भाग जोडण्यात आला आहे. प्रभागात आजही नवीन वसाहतीत रस्त्यांच्या समस्या आहेत. नागरी वसाहत झाली तरी रस्त्यांचे डांबरीकरण नाही, पिण्याच्या पाण्याच्या समस्येला तोंड द्यावे लागते, तर प्रभाग मोठा असल्याने घंटागाडीची समस्या भेडसावते. यापूर्वी द्विसदस्यीय -त्रिसदस्यीय प्रभागरचनेमुळे ठरावीक भागांकडेच लोकप्रतिनिधींनी लक्ष दिल्याचा आरोप मतदारांनी केला आहे. पूर्वीच्या प्रभाग ३ मधील तारवालानगर, लामखेडे मळा, तलाठी कॉलनी, तर प्रभाग १० मधील वेताळबाबा मंदिर, गजानन चौक, सेवाकुंज कॉलनी हा भाग पूर्णपणे वगळण्यात आला आहे. नवीन भागात जॉगिंंग ट्रॅक, व्यायामशाळा, सांस्कृतिक भवन, वाचनालय आदि सुविधा पुरविण्याची मागणी आहे. एका भागात भाजपाने गड राखला आहे, तर दुसºया भागात दरवेळेस नव्या चेहºयांना संधी मिळाली आहे. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत चुरस दिसून येणार आहे.