शहरं
Join us  
Trending Stories
1
‘जीव वाचवण्यासाठी आम्ही…’मृत गनबोटेंच्या पत्नीने शरद पवारांना सांगितला अंगावर काटा आणणारा अनुभव
2
'ज्याने माझ्या भावाला मारलं, मला त्याचं शीर हवंय', लेफ्टनंट विनय नरवालांच्या बहिणीचा मुख्यमंत्र्यांसमोर आक्रोश
3
कलमा म्हणजे काय? जो दहशवाद्यांसमोर पढल्याने पहलगाममध्ये वाचले एका हिंदू प्राध्यापकाचे प्राण
4
आत्महत्येपूर्वी डॉ. वळसंगकरांनी केला मृत्यूपत्रात बदल; २० टक्के हिस्सा कुणाला दिला?
5
मोठी बातमी! पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये तिसरी चकमक; एक जवान शहीद  
6
ED: सहारा प्रकरणात ईडीची मोठी कारवाई, १५०० कोटींपेक्षा अधिकची नवी संपत्ती जप्त; प्रकरण काय?
7
पाकिस्तान रात्रभर दहशतीत! भारत कोणत्याही क्षणी घुसू शकतो; १८ लढाऊ विमाने एलओसीवर...
8
सचिन तेंडुलकर झाला ५२ वर्षांचा! मास्टर ब्लास्टरचे 'हे' ५ रेकॉर्ड तोडणे जवळपास अशक्य
9
Pahalgam Terror Attack : बांदीपोरामध्ये लष्कर-ए-तोयबाच्या ४ दहशतवाद्यांना अटक, पूंछ-अनंतनाग आणि उधमपूरमध्ये चकमक सुरू
10
४८ तासांत पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्याचे आदेश; सीमा हैदरचं आता काय होणार?
11
Success Story: 'आपली आजी', वय वर्ष ७४, यू-ट्युबद्वारे महिन्याला ६ लाखांची कमाई; मराठमोळ्या आजींचा कसा आहे प्रवास?
12
आधी सिंधू करार थांबवला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
13
पहलगाम व्हॅलीचे नाव 'हिंदू व्हॅली' करा! मराठी अभिनेत्याचा सरकारला सल्ला, म्हणाला- "श्रीनगरला भारताची उपराजधानी घोषित करा"
14
FIITJEE चे मालक डीके गोयल यांच्याविरोधात ईडीची कारवाई, १० ठिकाणांवर छापेमारी
15
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यामुळे २१,००० कोटी पणाला, काश्मीरच्या अर्थव्यवस्थेची मोठी हानी, देशाला होणार हे १० तोटे 
16
पहलगाम दहशतवादी हल्ला : मृत जगदाळेंच्या कुटुंबीयांनी शरद पवारांना सांगितली आपबिती; संसदेत मुद्दा उचलण्याची केली मागणी
17
Stock Market Today: ७ दिवसांच्या तेजीनंतर शेअर बाजार सुस्तावला, Sensex मध्ये १४० अंकांची घसरण; Tata Consumer, Eternal, ONGC टॉप लूझर्स
18
सिंधू पाणी करार थांबवल्याने पाकिस्तानच्या तोंडचं पाणी पळालं; उपपंतप्रधान तावातावाने म्हणाले...
19
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
20
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई

ऐन पावसाळ्यात निफाडचे राजकारण तापले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2021 01:12 IST

सायखेडा : शिवसेना पक्षाचे शिवसंपर्क अभियान, राष्ट्रवादी काँग्रेसची युवा संवाद यात्रा तर भाजप प्रवेशानंतर यतीन कदम यांच्या सुरू असलेल्या तळागाळातील गाठीभेटी यामुळे निफाड तालुक्यातील राजकारण ऐन पावसाळ्यात तापले आहे. सोशल मीडियावर विविध कार्यक्रमांच्या पोस्टने धुमाकूळ घातला असल्याने तीन वर्षे अगोदरच निवडणुकांची तयारी सुरू झाल्याचे दिसून येत आहे.

ठळक मुद्देसायखेडा : पक्षीय कार्यक्रमाच्या निमित्ताने निवडणुकांची मोर्चे बांधणी

सायखेडा : शिवसेना पक्षाचे शिवसंपर्क अभियान, राष्ट्रवादी काँग्रेसची युवा संवाद यात्रा तर भाजप प्रवेशानंतर यतीन कदम यांच्या सुरू असलेल्या तळागाळातील गाठीभेटी यामुळे निफाड तालुक्यातील राजकारण ऐन पावसाळ्यात तापले आहे. सोशल मीडियावर विविध कार्यक्रमांच्या पोस्टने धुमाकूळ घातला असल्याने तीन वर्षे अगोदरच निवडणुकांची तयारी सुरू झाल्याचे दिसून येत आहे.निफाडचेराजकारण हे नेहमीच जिल्ह्याच्या राजकारणात चर्चेत राहिले आहे. अनेक वर्षे गटा-गटात विस्तारलेले राजकारण अलीकडे पक्षीय राजकारणाच्या भोवती पिंगा घालत आहे. मोगल-बोरस्ते गट, मोगल-पवार गट असे अनेक वर्षे गटाचे राजकारण निफाड तालुक्यातील जनता अनुभवत आली आहे. मालोजीराव मोगल आणि माणिकराव बोरस्ते यांच्यानंतर मात्र काही वर्षांपासून बनकर-कदम यांच्या भोवती राजकारण फिरायला लागले. मंदाकिनी कदम यांच्या आठ वर्षे आमदारकीनंतर मात्र माजी आमदार अनिल कदम आणि विद्यमान आमदार दिलीप बनकर यांच्या गटात राजकारण सुरू झाले. काका-अण्णा यांच्यातील विळ्या भोपळ्याचे राजकारण सर्व तालुका जाणून आहे. दोन वेळा बनकर यांचा पराभव झाल्यानंतर विजयासाठी कंबर कसलेल्या बनकर यांचा वारू विधानसभेत पोहचला. महाविकास आघाडीचे सरकार राज्यात असले तरी तालुक्यातील जनतेला मात्र पारंपरिक विरोधकांची छबी वारंवार पहायला मिळते आहे.विविध विकास कामांच्या श्रेयवादावरून सोशल वॉर सातत्याने सुरू असते. कोणीच मागे हटायला तयार नसतो. आता मात्र शिवसेना पक्षाने शिवसंपर्क अभियान कार्यक्रमांतर्गत कार्यकत्यांशी संवाद साधून पक्ष संघटना बळकटीवर भर दिला आहे. माजी आमदार अनिल कदम यांनी तालुका पिंजून काढत कार्यकर्त्यांतील मरगळ झटकण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.आमदार दिलीप बनकर यांनी रासाका, ड्रायपोर्ट यासारखे महत्त्वाचे प्रश्न मार्गी लावत संपर्क वाढवला आहे. त्यात भर म्हणून राष्ट्रवादी युवक काँग्रेसने नुकतेच युवा संवाद कार्यक्रम हाती घेऊन काम गाव पातळीवर पक्ष संघटन मजबूत करण्याचे काम सुरु केले आहे. सहा गटात संवाद यात्रा निमित्ताने कार्यकर्ते जुळवत आहेत.तर भाजप पक्षात यतीन कदम यांनी नुकताच प्रवेश केला. त्यांनी गावागावात जाऊन कार्यकर्ते आणि माजी आमदार रावसाहेब व मंदाकिनी कदम यांचे विखुरलेले कार्यकर्ते गोळा करून पुन्हा एकदा गट निर्मिती करत असल्याचे प्रयत्न सुरू केले आहे.शिवसंपर्क अभियान, युवा संवाद कार्यक्रम आणि यतीन कदम यांच्या गाठीभेटी यामुळे निफाड तालुक्यातील राजकारण ऐन पावसाळ्यातदेखील तापले आहे 

टॅग्स :nifadनिफाडPoliticsराजकारण