शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत ठाकरेंच्या युवासेनेचा जल्लोष; सिनेट निवडणुकीत पुन्हा एकदा १० पैकी १० विजयी
2
विधानसभा निवडणूक एकाच टप्प्यात घ्या; शिंदेसेना, अजित पवार गटाची मागणी
3
Today Daily Horoscope आजचे राशीभविष्य: विविध पातळ्यांवर यश, किर्ती व लाभासह धन प्राप्ती होईल
4
धक्कादायक! नांदेडमध्ये पाण्यातून दोनशेहून अधिक जणांना विषबाधा, ६ जण गंभीर
5
उद्धव युवासेनेचा अखेर सिनेटवर झेंडा; विद्यापीठाच्या निवडणुकीत अभाविपचा उडाला धुव्वा
6
अग्रलेख : फडणवीसांचा कबुलीनामा; अजित पवारांना सोबत घेतल्यानंतर ‘परिवार’ फारच अस्वस्थ
7
मतदारांची गैरसोय झाल्यास अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई; केंद्रीय निवडणूक आयोगाचा इशारा
8
बहिणींच्या पैशांवर नजर ठेवाल तर खबरदार...; फडणवीस यांचा विरोधकांना इशारा
9
मध्य रेल्वेवर उद्या ५ तासांचा मेगाब्लॉक; तिन्हा मार्गांवरील लोकल धावणार उशिरा
10
नसराल्लाह मारला गेला? हिजबुल्लाहच्या मुख्यालयावर इस्रायलचा मोठा हल्ला
11
महायुतीमधील वाद विकोपाला गेले तर बसेल फटका; मीरा-भाईंदर, ऐरोली, बेलापूर, ठाणे मतदारसंघात अंतर्गत धुसफूस
12
"मला क्लीन चिट मिळाल्यामुळेच चांदीवाल आयोगाचा अहवाल दडवला", अनिल देशमुखांचा शिंदे सरकारवर आरोप
13
सरकारची मोठी कारवाई, Aadhaar आणि PAN Card चा डेटा लीक करणाऱ्या ३ वेबसाइट्स ब्लॉक! 
14
ऋता आव्हाड यांच्यावर गुन्हा दाखल करा; व्हायरल व्हिडीओवरून परांजपे यांची मागणी
15
Ujjain Mahakal Temple Wall Collapse: उज्जैनच्या महाकाल मंदिराजवळ मोठी दुर्घटना! मुसळधार पावसाने भिंत कोसळली, दोघांचा मृत्यू
16
ठाणे, वसईत २० लाखांत घर; म्हाडाच्या कोकण मंडळाचा ‘धमाका’
17
'त्या' दोन अल्पवयीन मुलींवर आणखी ७ जणांनी अत्याचार केल्याचे उघड!
18
शून्य मोजून थकाल; भारतात लॉन्च झाली Rolls-Royce ची सर्वात महागडी कार, किंमत तब्बल...
19
उद्योगपती मंदाना यांची १७० कोटींची मालमत्ता जप्त; बँक ऑफ बडोदाची फसवणूक केल्याचा ठपका
20
भारताने कलम 370 लागू करावी; संयुक्त राष्ट्राच्या मंचावर शाहबाज शरीफ यांनी गरळ ओकली

द्यायला नाही चेक, शेतकरी नाही घेत !

By admin | Published: November 19, 2016 12:44 AM

आडते पेचात : शेतकऱ्यांनी घेतली जिल्हाधिकाऱ्यांची भेट; जिल्हाधिकारी मात्र हतबल

 नाशिक : बाजार समितीत दररोज हजारोच्या संख्येने शेतकरी शेतमाल घेऊन येतात, त्यांच्या मालाची रक्कम तीनशे ते आठशे रुपयांपर्यंत असते, इतक्या मोठ्या प्रमाणातील शेतकऱ्यांना देण्यासाठी बॅँका चेक देत नाहीत आणि कमी रक्कमेचे चेक घेण्यास शेतकरी तयार नाहीत अशा पेचात सापडलेल्या भाजीपाला आडत्यांनी शुक्रवारी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन आपले गाऱ्हाणे मांडले मात्र, जिल्हाधिकाऱ्यांनी हतबलता पलीकडे काहीच आश्वासन दिले नाही. केंद्र सरकारच्या हजार व पाचशे रुपयांच्या नोटबंदीचे थेट परिणाम शेतमाल विक्रीवर होऊ लागले आहेत. काही बाजार समित्यांनी व व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या मालाचा मोबदला थेट धनादेशाच्या माध्यमातून बॅँकेत जमा करण्यास सुरुवात केल्याने अन्नधान्य, कांदा अशा मोठ्या पिकांचे व्यवहार काही प्रमाणात सुरळीत होण्यास मदत झाली असली तरी, सर्वात मोठा फटका भाजीपाला उत्पादक शेतकरी, त्यांच्या मालाची हमी घेणारे आडते व खरेदीदार व्यापाऱ्यांना बसला आहे. गेल्या दहा दिवसांपासून व्यापाऱ्यांकडील रोख रक्कम म्हणजेच हजार, पाचशेच्या नोटा कवडीमोल झाल्याने शेतकऱ्यांनी त्या स्वीकारण्यास नकार दिला, त्याचप्रमाणे आडत्यांकडेही शेतकऱ्यांना त्यांच्या पट्टीचे पैसे रोख स्वरूपात देण्यासाठी शंभर, पन्नासच्या नोटा शिल्लक नाही. अशा परिस्थिती शेतकऱ्यांचा भाजीपाला शेतातच खराब होवून नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. दहा दिवसांत कोट्यवधींची उलाढाल ठप्प झाली असून, सरकारने शेतकऱ्यांना धनादेशाद्वारे पेमेंट करण्याच्या सूचना आडते व व्यापाऱ्यांना केल्या असल्या तरी, प्रत्यक्षात त्याची व्यावहारिकता तपासल्यास अनेक अडचणी उभ्या ठाकल्या आहेत. बॅँकांकडून व्यापारी असो वा आडते यांना पंचवीस ते पन्नास इतक्या संख्येचेच धनादेश बुक दिले जाते. मात्र शेतमाल घेऊन येणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या शेकडोच्या घरात असताना त्या तुलनेने बॅँका धनादेश देत नाहीत. दुसरीकडे शेतमालाचा लिलाव झाल्यानंतर शेतकऱ्यांना लगेचच पट्टी म्हणजेच मालाचे पैसे हवे असल्याने ते थांबायला तयार नाहीत अशा पेचात आडते सापडले आहेत. त्यावर तोडगा निघावा म्हणून शुक्रवारी नाशिक बाजार समितीतील आडत्यांनी जिल्हाधिकारी बालसुब्रह्मण्यम् राधाकृष्णन् यांची भेट घेऊन परिस्थिती कथन केली. आडते व व्यापाऱ्यांना त्यांच्या बॅँक खात्यातून अधिक रक्कम काढण्याची अनुमती मिळावी, अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली. जोपर्यंत व्यवहार सुरुळीत होत नाही तोपर्यंत ही मुभा मिळावी जेणे करून बाजार समितीतील व्यवहार सुरुळीत होतील व शेतकऱ्यांनाही त्यातून दिलासा मिळेल, अशी विनंती करण्यात आली.