शहरं
Join us  
Trending Stories
1
'कोल्हापूरच्या नेत्याला आम्ही राजे म्हणणार नाही', लक्ष्मण हाकेंचे संभाजीराजेंवर आरोप; रात्री काय घडलं सगळंच सांगितलं
2
खळबळजनक दावा! देवेंद्र फडणवीस- उद्धव ठाकरेंची 'मातोश्री'वर गुप्त भेट; दिल्लीतही बैठक?
3
अभिनेता गोविंदाच्या पायाला लागली गोळी, स्वत:च्याच बंदुकीतून झालं मिसफायर; रुग्णालयात दाखल
4
शेतकऱ्यांनो, शेतीपंपाचे कसलेच वीजबिल भरू नका; अजित पवार यांचा शेतकऱ्यांना ‘अर्थ’पूर्ण सल्ला
5
भाजपचे उमेदवार कोण? तिकीट देण्यासाठी नवा प्रयोग, पक्षाचे पदाधिकारी लिफाफ्यात नावे देणार
6
अमित शाह आज पुन्हा महाराष्ट्रात; मुंबई, ठाणे, पालघरच्या मतदारसंघाचा घेणार आढावा
7
"गरबा खेळण्यासाठी गोमूत्र प्यायला देऊन प्रवेश द्यावा", भाजपा नेत्याचा सल्ला
8
गेट वेल सून! सुपरस्टार रजनीकांत रुग्णालयात दाखल, समोर आलं मोठं कारण
9
Laxman Hake News : 'मला जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला', लक्ष्मण हाकेंचा आरोप; रात्री नेमकं काय घडलं?
10
"सरकारी सबसिडीच्या भरवशावर राहू नका"; गडकरींच्या विधानावरुन देवेंद्र फडणवीसांचे स्पष्टीकरण
11
ईडीच्या एफआयआरनंतर सिद्धरामय्या यांची पत्नी भूखंड परत करण्यास तयार; एमयूडीएला लिहिले पत्र
12
इस्रायली सैन्य रातोरात लेबनॉनमध्ये घुसले; हजारो रणगाडे, हिजबुल्लाहच्या ठिकाणांना केले लक्ष्य
13
LPG Cylinder Price : नवरात्रीपूर्वीच झटका, एलपीजी सिलिंडर महागला; पाहा दिल्ली ते मुंबईचे नवे दर
14
सोनम वांगचुकसह १३० आंदोलक पोलिसांच्या ताब्यात; राहुल गांधी म्हणाले, "तुमचा अहंकार..."
15
महाराष्ट्राचे सहा आमदार पाचवी पास, फक्त १०वी शिकलेले ४४; पहा मतदारांनी निवडलेल्या नेत्यांचे शिक्षण...
16
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: शारीरिक आरोग्य उत्तम, वर्तनावर संयम ठेवावा लागेल
17
राजकारणापासून किमान देवाला तरी लांब ठेवा हो! सर्वाेच्च न्यायालयाचे तिरुपती लाडू भेसळीवर प्रश्नचिन्ह
18
कुणबी प्रमाणपत्रे मिळणे आणखी सोपे; शिंदे समितीचा दुसरा, तिसरा अहवाल सरकारने स्वीकारला
19
देशी गाय आता ‘राज्यमाता-गोमाता’; मंत्रिमंडळाचा निर्णय : लगेच आदेशही जारी
20
‘किल्लारी’च्या दिवशीच भूकंपाने हादरले मेळघाट; अमरावती, अकोला जिल्ह्यात धक्के; भिंतीला तडे; नागरिकांना झाले धस्स

नोटा काढणाऱ्यांच्या बोटाला शाई

By admin | Published: November 18, 2016 12:28 AM

रांगा कायम : आजपासून दोन हजारच मिळणार असल्याने नागरिक हवालदिल

नाशिक : पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटाबंदीच्या निर्णयामुळे गुरुवारी (दि. १७)देखील शहरातील बँकांमध्ये पैसे बदलण्यासाठी आणि खात्यातून पैसे काढण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होती. विशेष म्हणजे गर्दी टाळण्यासाठी सरकारच्या निर्देशानुसार टपाल कार्यालयात गुरुवारपासून नागरिकांच्या बोटाला शाई लावण्यास प्रारंभ झाला. दिवसभरात जिल्ह्यातील टपाल कार्यालयातून एक कोटी रुपयांचे वितरण करण्यात आले. दुसरीकडे शुक्रवारपासून बॅँकेत दोन हजार रुपये मिळणार असल्याच्या बातमीमुळे गुरुवारी बॅँक आणि टपाल कार्यालयात रांगा अधिकच वाढल्या.चलनातून बाद करण्यात आलेल्या पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा बदलण्यासाठी नागरिकांची होणारी गर्दी बघता सरकारने बोटावर शाई लावण्याचा निर्णय जाहीर केला असला तरी शहरातील बँकांंमध्ये मात्र नागरिकांच्या बोटाला शाई लावण्यात आली नाही, परंतु पोस्टाच्या मुख्यालयात चलन बदलण्यासाठी आलेल्या नागरिकांच्या उजव्या हाताच्या बोटाला शाई लावण्यात येत होती. शहरातील बँकांमध्ये अजून ही शाईच दाखल झालेली नसल्याचे बँक शाखा अधिकाऱ्यांनी सांगितले.बँकांमध्ये जशी चलन बदलण्यासाठी गर्दी होती तशीच गर्दी एटीएम केंद्रांबाहेरही बघायला मिळत होती. एक हजार आणि पाचशे रुपयांच्या नोटा चलनातून बाद झाल्याने एटीएमच्या कार्यक्षमतेवरही परिणाम झाला आहे. एटीएम मशीनमध्ये केवळ शंभर रुपयांचाच भरणा केला जात असल्याने मशीनमधल्या नोटा लवकर संपून ग्राहकांच्या पदरी निराशा पडत आहे. शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या स्टेट बँक आॅफ इंडियाच्या शाखेत सकाळपासूनच दिवसभर मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. कॅश डिपॉझिट मशीन (सीडीएम)मधून आपल्या खात्यावर पैसे जमा करता येत असले तरी याठिकाणीही मोठ्या रांगा लागल्या होत्या. स्टेट बँक आॅफ इंडियाच्या शाखा वगळता इतर राष्ट्रीयीकृत, नागरी तसेच खासगी बँकांमधील गर्दी दुपारी ओसरली होती.लग्नसराई जवळ आल्याने अनेक नागरिकांना लग्नाची खरेदी करायची होती, परंतु नोटा बंदीच्या निर्णयामुळे अनेकांची लग्ने खोळंबलेली असताना गुरुवारी दिल्ली येथे केंद्रीय अर्थसचिव शशिकांत दास यांनी पत्रकार परिषदेत ज्यांच्या घरी लग्नकार्य आहे त्यांना आता बँक खात्यातून अडीच लाख रुपये काढता येणार असल्याची महत्त्वपूर्ण घोषणा केली असून, या निर्णयाची अंमलबजावणी शुक्रवार (दि. १८) पासून करण्यात येणार आहे. त्यामुळे ग्राहकांना दिलासा मिळणार असला तरी आता साधारण नागरिकांना आपल्या खात्यातून केवळ दोन हजार रुपये मिळणार असल्याने चलन टंचाई वाढण्याची शक्यता आहे. त्याचा परिणाम बाजारपेठेवर होणार असून, आर्थिक उलाढाल ठप्प होण्याची भिती व्यावसायिक आणि नागरिक व्यक्त करीत आहेत. एकीकडे प्रेसमध्ये नोटांची छपाई वाढविण्यात आली असून, दररोजच नोटा रिझर्व्ह बॅँकेकडे पोहचत असताना मर्यादा घटविण्याचे कारण काय? असा प्रश्न सर्वसामान्य नागरिक करीत आहेत.नोटा बदलण्यासाठी टपाल कार्यालयात आलेल्या ग्राहकाच्या बोटावर अशी शाई लावण्यात आली.