शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत भाजपाला मोठा धक्का! सम्राट महाडिक बंडखोरी करणार, उद्या उमेदवारी अर्ज दाखल करणार
2
'26/11 मुंबई हल्ल्यानंतर भारताने प्रत्युत्तर दिले नव्हते, पण आता...', एस जयशंकर स्पष्ट बोलले
3
"लाडकी बहिण म्हणायचं अन्..."; मुलीवर गुन्हा दाखल होताच बाळासाहेब थोरात यांची संतप्त प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले
4
'महाराष्ट्र आणि झारखंडमध्ये भाजपचे सरकार येणार', गृहमंत्री अमित शाहांचा दावा
5
अजित पवार विरुद्ध युगेंद्र पवार: बारामती विधानसभा कोणासाठी सोप्पी, आकडे काय सांगतात?
6
स्वरा भास्करच्या पतीला शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून विधानसभेचं तिकीट, अभिनेत्री ट्वीट करत म्हणाली...
7
इराण इस्रायलवर हल्ला करणार? सर्वोच्च नेते अली खामेनेई यांचं मोठं वक्तव्य, म्हणाले,...
8
शरद पवारांकडून मोहोळमध्ये अनपेक्षित धक्का; अनेकांना बाजूला सारत रमेश कदमांच्या मुलीला उमेदवारी!
9
Bandra Stampede: महाराष्ट्रातील ७ स्थानकातील गर्दी टाळण्यासाठी रेल्वे प्रशासनाने उचलले मोठे पाऊल
10
"ठाकरे गटाच्या पहिल्या यादीतील १७ उमेदवार आमचे नेते", देवेंद्र फडणवीस यांचा सूचक दावा
11
राष्ट्रवादी शरद पवार गटाची तिसरी यादी जाहीर; धनंजय मुंडेंविरोधात 'या' नेत्याला संधी...
12
नवाब मलिकांच्या मुलीविरोधात शरद पवारांची मोठी खेळी; अभिनेत्रीच्या पतीला दिली उमेदवारी
13
प्रियकरासोबत मिळून केली पतीची हत्या, मग पोलिसांत दिली बेपत्ता असल्याची तक्रार, पण असं फुटलं बिंग
14
निकालानंतर गरज पडली, तर पवारांची मदत घेणार की उद्धव ठाकरेंची?; फडणवीसांनी काय दिले उत्तर?
15
जिम ट्रेनरने केली महिलेची हत्या, 'दृष्यम' स्टाईलने थेट डीएमच्या निवास्थानाजवळ लपवला मृतदेह, असं फुटलं बिंग 
16
विधानसभा निवडणुकीत भाजपा किती जागा जिंकेल? आकड्याबाबत देवेंद्र फडणवीसांचं सूचक विधान
17
Vidhan Sabha Election : विधानसभा उमेदवारीचा अर्ज किती पानांचा असतो? खर्च किती येतो?; जाणून घ्या सर्व माहिती
18
BMW कारमधून आली अन् फ्लॉवर पॉट चोरून घेऊन गेली; महिलेचा कारनामा कॅमेऱ्यात कैद
19
बांगलादेशी हिंदूंचा जीव धोक्यात! "नोकरी सोडा अन्यथा...", कट्टरतावाद्यांकडून दिल्या जातायत धमक्या 
20
भाजप कोणत्या विद्यमान आमदारांची तिकिटं कापणार? देवेंद्र फडणवीसांचं पहिल्यांदाच भाष्य

जिल्ह्यात ३० दिवसांत बळींची संख्या १२ वरून १०२वर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2020 9:25 PM

नाशिक : जिल्ह्यात रुग्ण सापडण्याचे प्रमाण गत पंधरवड्यात चौपट झाले असून, महिनाभरात एकूण रुग्णसंख्या ५२१वरून १५३६ अशी सुमारे तिपटीने वाढली आहे. रुग्णसंख्येचा वेग गत महिन्याच्या सुरुवातीपासूनच खूप वाढला असून, दोन पंधरवड्यात त्यात दुपटीने वाढ झाली आहे. महिनाभराच्या प्रारंभी अवघा १२ असलेला बळींचा आकडा शतकी संख्या ओलांडून १०२वर पोहोचला आहे.

नाशिक : जिल्ह्यात रुग्ण सापडण्याचे प्रमाण गत पंधरवड्यात चौपट झाले असून, महिनाभरात एकूण रुग्णसंख्या ५२१वरून १५३६ अशी सुमारे तिपटीने वाढली आहे. रुग्णसंख्येचा वेग गत महिन्याच्या सुरुवातीपासूनच खूप वाढला असून, दोन पंधरवड्यात त्यात दुपटीने वाढ झाली आहे. महिनाभराच्या प्रारंभी अवघा १२ असलेला बळींचा आकडा शतकी संख्या ओलांडून १०२वर पोहोचला आहे.नाशकात चौथ्या टप्प्यापासूनच लॉकडाऊन संपुष्टात आल्याप्रमाणेच नागरिकांचे व्यवहार सुरू झाल्याने रुग्णसंख्येत प्रचंड वेगाने वाढ होण्यास प्रारंभ झाला आहे. त्यानंतर गत आठवड्यात लॉकडाऊन उठल्यानंतर तर जिल्ह्यातील नाशिक आणि मालेगाव या दोन्ही महापालिका क्षेत्रात बाधित रुग्ण आढळण्याचे प्रमाण तिप्पट झाले आहे.मृतांच्या आकड्याने जिल्ह्यात शंभरी ओलांडल्याने अधिकच घबराट निर्माण झाली आहे. सलग आठवडाभर ग्रामीणपेक्षा अधिक बाधित रुग्ण आढळून येण्याची नाशिकची वाटचाल मंगळवारी-देखील कायम राहिली. मंगळवारी आढळलेल्या ३२ रुग्णांपैकी तब्बल २७ रुग्ण हे नाशिक महानगरातील आहेत. शहरातील बाधित रुग्णसंख्या आढळण्याचे प्रमाण आठवडाभरात अधिक पटीने वाढले आहे.-----------------------------जिल्ह्यात सर्वेक्षण यंत्रणेचे प्रभावी काममे महिन्याच्या प्रारंभी बरे झालेल्या रुग्णांची संख्या अवघी १४ होती. त्यात दोन आठवड्यात लक्षणीय सुधारणा होऊन ती १४ मे रोजी ४५९वर पोहोचली, तर ३१ मेपर्यंत ८२६ आणि गत दहा दिवसात तर १०९३वर पोहोचली आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण नाशिक जिल्ह्यात अधिक असण्याचे कारण जिल्ह्यातील सर्वेक्षण यंत्रणेचे प्रभावी काम आहे. कोरोनाबाधित रुग्ण प्राथमिक अवस्थेत शोधून काढल्याने त्यांच्यापासून इतरांना होणारी बाधा टळते तसेच हे रुग्ण बरे होण्याची शक्यतादेखील खूप मोठ्या प्रमाणात वाढते.-----------------------महानगरात नियमांचा भंगजिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये सामान्य ग्रामस्थ सर्व नियमांचे पालन करीत असताना महानगरातील नागरिक मात्र महानगरातील प्रत्येक बाजारपेठेत गर्दी करताना दिसून येत आहेत. त्यामुळे कोरोनाच्या संसर्गाचा धोका अधिक वाढला आहे.------------------------मृत्युदरातील वाढ धोक्याची घंटानाशिक जिल्ह्यात १ मेपर्यंत १२ रुग्णांचा मृत्यू झाला होता. त्यात दोन आठवड्यात २१ने वाढ होऊन १४ मेदरम्यान मृतांचा आकडा ३३वर पोहोचला होता. त्यानंतरच्या आठवडाभरात १३ जणांचा बळी गेल्याने मृतांची संख्या ४६ झाली, तर २१ मेपासून ९ जून या २० दिवसांत मृतांची संख्या ४६वरून १०२वर म्हणजेच दुपटीहून अधिक वाढली असून, हे वाढते प्रमाण नाशिकसाठी धोक्याची घंटा मानली जात आहे. दरम्यान, महानगरातील बाधित रुग्णसंख्येच्या प्रमाणात वाढ होत असल्याने आरोग्य यंत्रणादेखील संभ्रमित झाली आहे.

टॅग्स :Nashikनाशिक