शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रकाश आंबेडकरांनी विधानसभेसाठी दहा उमेदवारांची केली घोषणा; दुसऱ्या यादीत कोणाची नावे?
2
अनपेक्षित निकालाचे विश्लेषण करत आहोत, हरयाणातील पराभवावर राहुल गांधींची पहिली प्रतिक्रिया
3
हरयाणातील गोहानाच्या जिलेबीची 'तारीफ' राहुल गांधींना महागात पडली! काय म्हणाला दुकानदार?
4
वकिलांकडून भाजपच्या आमदाराला पोलिसांसमोरच मारहाण; अर्बन बँक निवडणुकीतला प्रकार
5
मुंबईतील हिंदी बहुल १२ मतदारसंघात परप्रांतीय उमेदवाराला प्राधान्य द्या; मविआला पत्र
6
"काँग्रेसच जिंकणार असं दाखवलं जात होतं...", हरयाणा निवडणुकीवर द ग्रेट खलीची प्रतिक्रिया
7
बापरे! होणारा नवरा सतत करायचा कॉल; मुलीने ब्लॉक करताच 'त्याने' केलं असं काही...
8
गुरु-शुक्र समसप्तक योग: ७ राशींना दसरा शुभ, मालामाल व्हाल; दिवाळीला धनलक्ष्मी प्रसन्न होईल!
9
5 लाखातून उभे केले 7000 कोटींचे साम्राज्य! Phanindra Sama चे स्टार्टअप काय?
10
भारतासाठी 'करो वा मरो'चा सामना; 'कॅप्टन' हरमनप्रीत आज खेळणार? स्मृती मंधानाने दिली अपडेट
11
जम्मू-काश्मीरमध्ये मुफ्तींच्या पक्षाचं अस्तित्व धोक्यात! गेल्या निवडणुकीपर्यंत होता सर्वात मोठा पक्ष, पण आता...
12
सुप्रिया सुळेंच्या कारमधून चेहरा लपवून जाणारा 'तो' नेता अजित पवार गटाचा?; नाव समोर
13
बाहेरुन स्पा सेंटर पण...! जिल्हाधिकाऱ्यांनी अचानक छापा टाकला; मुलांसह ५ मुली ताब्यात, Video Viral
14
SIP मध्ये मिळतात असे ७ फीचर्स जे दुसऱ्या स्कीम्समध्ये मिळत नाहीत, गुंतवणूकीपूर्वी जाणून घ्या
15
हरयाणा निकालानंतर मविआत भूकंप?; संजय राऊत- नाना पटोले यांच्यात शाब्दिक 'वॉर'
16
काँग्रेस दिल्लीत एकटी पडणार, आप 'हात' सोडणार; विधानसभा निवडणुकीबद्दल मोठं विधान
17
Kolkata Doctor Case : फक्त २९ मिनिटं... आरोपीच्या जीन्स, शूजवर ट्रेनी डॉक्टरचं रक्त; CBI च्या आरोपपत्रात मोठा खुलासा
18
कॉलर पडकली अन् थप्पड लगावली, पोलिसांसमोरच भाजपा आमदाराला मारहाण, कारण काय?
19
PAK vs ENG : एकच नंबर! जो रुट इंग्लंडचा नवा 'हिरो', कसोटी क्रिकेटमध्ये केली ऐतिहासिक कामगिरी
20
हरयाणात मोठा विजय मिळवूनही भाजपला कसा बसला धक्का? विधानसभा अध्यक्षांसह १० पैकी ८ मंत्र्यांचा पराभव

पोषण आहार चवीची ‘खिचडी’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 06, 2018 1:02 AM

शालेय पोषण आहार बनविणे, वितरित करणे आणि तपासणीबाबत शालेय शिक्षण विभागाकडून आजवर अनेक निर्णय घेण्यात आले आणि काही बदलण्यातही आले. पोषण आहारातील हा प्रयोग अजूनही सुरूच असून, आता पोषण आहाराची चव तपासण्याच्या जबाबदारीतून मुख्याध्यापकांना वगळण्यात आले आहे.

नाशिक : शालेय पोषण आहार बनविणे, वितरित करणे आणि तपासणीबाबत शालेय शिक्षण विभागाकडून आजवर अनेक निर्णय घेण्यात आले आणि काही बदलण्यातही आले. पोषण आहारातील हा प्रयोग अजूनही सुरूच असून, आता पोषण आहाराची चव तपासण्याच्या जबाबदारीतून मुख्याध्यापकांना वगळण्यात आले आहे. शासनाच्या या निर्णयामुळे आहारावरील नियंत्रण कमी होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. विशेष म्हणजे चव तपासण्यासाठीची यंत्रणा अस्तित्वात असली तरी या यंत्रणेकडून खरोखरच आहाराची तपासणी होते का? हाही मोठा प्रश्नच आहे.  शालेय विद्यार्थ्यांना सकस पोषण आहार मिळावा यासाठी शासनाने नियमावली तयार केलेली आहे. या नियमावलीनुसार शालेय विद्यार्थ्यांना सकस आहार दिला जातो की नाही हे तपासण्याची जबाबदारी शाळापातळीवर निश्चित असताना यातून आता मुख्याध्यापकांना वगळण्यात आल्याने पोषण आहाराचा दर्जा तपासण्याबाबत काहीशी शिथिलता निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मुख्याध्यापकांवरील कामाचा ताण पाहता त्यांना या जबाबदारीतून मुक्त करून त्यांच्यावरील भार हलका करण्यात आलेला आहे.शालेय पोषण आहार योजना राबविताना मुलांना देण्यात येणाऱ्या पोषण आहाराची चव मुख्याध्यापकांनादेखील घ्यावी लागत होती. आहाराची प्रथमस्तरावर चव आहार तयार करणारा स्वयंपाकी, दुसºया स्तरावर शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य, तर शेवटी तिसºया स्तरावर मुख्याध्यापक यांच्यावर चव घेण्याची जबाबदारी होती. परंतु मुख्याध्यापकांवरील अन्य कामाचा ताण पाहता खिचडीची चव घेण्याच्या जबाबदारीतून मुख्याध्यापकांना वगळण्यात यावे, अशी मागणी सातत्याने केली जात होती. अनेक वर्षांपासून याबाबत शासनदरबारी मुख्याध्यापकांचा प्रयत्न सुरू होता.  आता काही अटींमध्ये शासनाने शिथिलता आणली असून मुख्याध्यापकांना दिलासा देण्यात आला आहे. चव चाखण्यासाठी तीन स्तरावर होणारी सक्ती आता कमी करण्यात आलेली आहे. आहाराची चव आता शाळा व्यवस्थापन समिती सदस्य, शाळांचे मुख्याध्यापक किंवा योजनेशी शिक्षक यापैकी केवळ एकानेच चव घ्यावी, असे आदेश शासनाकडून प्राप्त झाले आहेत. शासनाच्या या निर्णयामुळे मुख्याध्यापकांवरील सक्ती कमी झाली आहे.तपासणी शाळास्तरावरच अवलंबूनअस्तित्वात असलेली यंत्रणा आणि नवी यंत्रणा खरोखरच पोषण आहाराची चव घेते का? हा संशोधनाचा विषय आहे. पोषण आहाराची चव खरोखरच तपासली जाते की नाही याची तपासणी न होता केवळ ‘चव नोंद’ वहीच तपासली जाते, असे आजवरचे चित्र राहिले आहे.

टॅग्स :Schoolशाळाfoodअन्नStudentविद्यार्थीNashikनाशिक