शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी सिंधू करार थांबवला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
2
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यामुळे २१,००० कोटी पणाला, काश्मीरच्या अर्थव्यवस्थेची मोठी हानी, देशाला होणार हे १० तोटे 
3
पहलगाम दहशतवादी हल्ला : मृत जगदाळेंच्या कुटुंबीयांनी शरद पवारांना सांगितली आपबिती; संसदेत मुद्दा उचलण्याची केली मागणी
4
भाच्यासोबतच अनैतिक संबंध अन् पतीची हत्या, दोन तुकडे करून मृतदेह ट्रॉली बॅगमध्ये टाकला; पण...
5
Stock Market Today: ७ दिवसांच्या तेजीनंतर शेअर बाजार सुस्तावला, Sensex मध्ये १४० अंकांची घसरण; Tata Consumer, Eternal, ONGC टॉप लूझर्स
6
सिंधू पाणी करार थांबवल्याने पाकिस्तानचं टेन्शन वाढलं! भारताला जोरदार प्रत्युत्तर देण्याच्या तयारीत
7
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
8
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई
9
"गेल्या महिन्यात काश्मीरला जायचा विचार करत होतो...", पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर प्रसाद खांडेकरची पोस्ट
10
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
11
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
12
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
13
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
14
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
15
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
16
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
17
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
18
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
19
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
20
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा

ओझर टाऊनशिप वसाहतीत जाणाऱ्यांचीअडवणुक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2020 17:47 IST

ओझर : येथील एचएएल प्रशासनाकडून ( सेक्युरिटी ) टाऊनशीप वसाहतीमध्ये जाणाऱ्या नागरिकांची एचएएल प्रवेशद्वारावर अडवणुक केली जात आहे, त्यामुळे पोलीसठाणे, पोस्ट ऑफिस, एसबीआय सह विविध बँका, गॅस वितरक आदी ठिकाणी जातांना ग्राहकांची गैरसोय होत आहे.

ठळक मुद्देस्टेट बँक अन‌् पोलिस स्टेशनला जाण्यासाठी नागरिकांना रोखले

ओझर : येथील एचएएल प्रशासनाकडून ( सेक्युरिटी ) टाऊनशीप वसाहतीमध्ये जाणाऱ्या नागरिकांची एचएएल प्रवेशद्वारावर अडवणुक केली जात आहे, त्यामुळे पोलीसठाणे, पोस्ट ऑफिस, एसबीआय सह विविध बँका, गॅस वितरक आदी ठिकाणी जातांना ग्राहकांची गैरसोय होत आहे.

अत्यावश्यक सेवांसाठी वेगळा मार्ग करून द्यावा अशी मागणी वाढत आहे. आधिच दिपक शिरसाठच्या प्रकरणामुळे सुरक्षेच्या दृस्टीने मरिमाता गेट महामार्गावरील गावाकडील व कोकणगांवच्या बाजूचे गेट बंद आहेत. त्यामुळे सुकेणे दिक्षीकडे जाणाऱ्या दहा गावांचा वाहनधारकांसह शेतीमाल वाहून बाजारात नेण्यासाठी अडचण निर्माण झाली आहे. आता नागरिकांची कोंडी झाली आहे.ओझरटाऊनशीप मधील कोरोना रुग्णांचा आकडा सद्या वाढत आहे. याच गोष्टींवर आळा घालण्यासाठी सदर पद्धतीचे अवलंबन करत आहे. तसेच ज्यांच्याकडे काही ठोस कारण आहे आणि संबंधित कामाशी गरजेचे कागदपत्रे आहेत, अशा नागरिकांना आम्हीं आत मध्ये प्रवेश देत आहोत, असे एचएएल ह्यूमन रिलेशन अधिकारी अनिल वैद्य यांनी सांगितले.असे असले तरी यामध्ये सामान्य नागरिकांना मात्र नाहक मनस्ताप सहन करावा लागत असून त्यांचा वेळ देखील वाया जात आहे.ओझरमधील टाऊनशीप वसाहत भागात स्टेट बँक ऑफ इंडिया, पंजाब नॅशनल, आयसीआयसीआय बँक अशा राष्ट्रीयकृत बँक, पोलीस स्टेशन, शाळा, कॉलेज, पोस्ट ऑफिस, गॅस एजन्सी, इन्शुरन्स ऑफिस असे अनेक कार्यालय आहेत. ही सर्व कार्यालये अत्यावश्यक सेवेत आहेत, या कार्यालयात जाण्यासाठी ओझर पासून ५ -६ किलोमीटर ओझर गावातून जावे लागते,सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन असल्याने बस सेवा, रिक्षा व अन्य प्रवासी वाहने बंद असल्याने नागरिकांना स्वतः चे वाहन घेऊन जावे लागते. यामध्ये जेष्ठ नागरिक व महिलांची खरी अडचण होते. या भागात शाळा, कॉलेज असल्याने विद्यार्थ्यांना जायचे असल्यास त्यांची ही अडवणूक होत आहे, मात्र तेथील मैदानात विविध खेळ चालू असतात .त्यामुळे विद्यार्थ्यांबरोबरच शाळा कॉलेजचे देखील नुकसान होत आहे. या बाबतीत जि. प. सदस्य यतीन कदम यांनी एचएएल प्रशासनाशी बैठक घेऊन तोडगा काढला जाईल असे सांगितले. नागरिकांना अत्यावश्यक सेवेचा लाभ घेण्यासाठी जास्त वेळ न घेता त्यांना जाऊ द्यावे अशी मागणी स्थानिक नागरीकांकडून केली जात आहे. 

टॅग्स :Ozarओझरroad safetyरस्ते सुरक्षा