शहरं
Join us  
Trending Stories
1
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
2
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
3
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
4
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
5
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
6
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
7
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
8
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
9
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
10
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
11
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
12
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
13
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
14
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
15
टी२० क्रिकेटमध्ये ऋषभ पंत अपयशी का ठरतोय? चेतेश्वर पुजाराने सांगितलं त्यामागचं कारण!
16
आयपीएल २०२५ मध्ये हेनरिक क्लासेनं मारला सर्वात लांब षटकार, पाहा टॉप १० खेळाडूंची यादी
17
'ओयो'विरोधात तक्रार करणारा रिसॉर्ट मालकच आला अडचणीत; अग्रवाल यांच्यावर दाखल झाला होतो गुन्हा
18
...तोपर्यंत तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांचा पगार जप्त करा, हायकोर्टाचे आदेश, कारण काय? 
19
पहलगाम हल्ल्यातील जखमींसाठी मुकेश अंबानींची मोठी घोषणा; म्हणाले 'दहशतवाद हा मानवतेचा शत्रू..'
20
शिमला कराराने सुटलेले भारत-पाकिस्तानमधील वाद; आता पाक देतोय रद्द करण्याची धमकी...

नाशिक जिल्ह्यात पिण्याच्या पाण्यासाठी दीड लाख लोकांचा संघर्ष; ६३ टँकरची धावाधाव

By अझहर शेख | Updated: June 22, 2023 18:43 IST

पाऊस लांबल्यामुळे वेगाने टंचाईग्रस्त गावे, वाड्यांची आकडे वाढू लागले आहेत.

नाशिक : पाऊस लांबल्यामुळे वेगाने टंचाईग्रस्त गावे, वाड्यांची आकडे वाढू लागले आहेत. आठवडाभरात तहानलेल्या गावांचा आकडा ७१वरून ८२वर पोहचला आहे. जिल्ह्यात १ लाख ३३ हजार ८२ लोकांना पिण्याच्या पाण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. मान्सूनने लवकर सलामी न दिल्यास हा आकडा अधिक गंभीर रूप धारण करण्याची श्यक्यता आहे. यामुळे आता जिल्हा प्रशासन व जिल्हा परिषदेची चिंता अधिक वाढली आहे.

जून महिन्याचा अखेरचा आठवडा सुरू झाला असला तरी अद्याप पावसाने जोरदार हजेरी लावलेली नाही. यामुळे जिल्ह्यात पाणीटंचाईची धग आता वेगाने वाढू लागली आहे. वरुणराजाची कृपादृष्टी होत नसल्यामुळे जिल्ह्यातील ८२ गावांची तहान टँकरद्वारे भागविण्याचा प्रयत्न केला जात आहे. हा आकडा वाढण्याची श्यक्यता लक्षात घेत जिल्हाधिकाऱ्यांनी पर्यायी वाढीव जलस्त्रोतांचा शोध घेण्याचे आदेश यंत्रणेला दिले आहे.

तहानलेली गावे, वाडीवस्त्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. वेगाने वाढणारे टंचाईग्रस्त गावे, वाडीवस्ती यामुळे आता प्रशासनासमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे.

६३ टँकर १७३ फेऱ्या

नाशिक जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये एकुण ६३ टँकर रस्त्यावर धावत आहेत. या टँकरच्या एकुण १७३ फेऱ्या सध्या सुरू असून टंचाईग्रस्त गावे, वाड्यांवरील लोकांची तहान भागविली जात आहे. वेगाने टँकरची संख्या व फेऱ्या वाढविण्याची गरज भासू लागली आहे. बुधवारी टँकरच्या फेऱ्या १६५ होत्या; मात्र गुरूवारी (दि.२२) हा आकडा १७३वर पोहचला. सर्वाधिक २२ टँकर येवला तालुक्यात सुरू आहे.