शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

आरक्षणाशिवाय नोकरभरतीस विरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2020 01:13 IST

मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भात अंतिरिम स्थगितीच्या निर्णयामुळे नाशिक येथे आयोजित बैठकीत केंद्र आणि राज्य शासनाचा निषेध करण्यात आला आहे. मराठा आरक्षणाशिवाय शासकीय नोकरभरतीस विरोधही यावेळी करण्यात आला. सरकारने पुन्हा मोर्चे काढण्याची वाट बघू नये अन्यथा शांत मोर्चे आक्रमक झाल्यास केंद्र आणि राज्य सरकारच्या मंत्र्यांना रस्त्यावर फिरू देणार नाही, असा इशारा यावेळी देण्यात आला.

ठळक मुद्देमराठा समाजाची नाशिकमध्ये बैठक केंद्र शासनाचाही निषेध, आंदोलनाचा इशारा

नाशिक : मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भात अंतिरिम स्थगितीच्या निर्णयामुळे नाशिक येथे आयोजित बैठकीत केंद्र आणि राज्य शासनाचा निषेध करण्यात आला आहे. मराठा आरक्षणाशिवाय शासकीय नोकरभरतीस विरोधही यावेळी करण्यात आला. सरकारने पुन्हा मोर्चे काढण्याची वाट बघू नये अन्यथा शांत मोर्चे आक्रमक झाल्यास केंद्र आणि राज्य सरकारच्या मंत्र्यांना रस्त्यावर फिरू देणार नाही, असा इशारा यावेळी देण्यात आला.९ सप्टेंबर रोजी आरक्षणाबाबत देण्यात आलेल्या अंतिरिम स्थगितीच्या अनुषंगाने रविवारी (दि.१३) औरंगाबाद रोडवरील वरदलक्ष्मी लॉन्स येथे जिल्हा मराठा क्रांती मोर्चाची बैठक झाली. यावेळी आमदार देवयानी फरांदे, माजी आमदार नितीन भोसले, अव्दय हिरे, गणेश कदम, भाजपचे नेते सुुनील बागुल, तसेच समाजाचे समन्वयक करण गायकर, तुषार जगताप यांच्यासह अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.यावेळी मराठा समाज पुन्हा आक्रमक झाला तर केंद्र आणि राज्य सरकारातील मंत्री बाहेर पडू शकणार नाही असा इशारा गायकर यांनी दिला. न्यायालयाच्या आदेशानंतर मुंबईत मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिकारी आणि समन्वयकांची बैठकीत झालेल्या निर्णयांची माहिती मोर्चाचे राज्य समन्वयक तुषार जगताप देताना शैक्षणिक वर्षात मराठा विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये तसेच मराठा आरक्षणाशिवाय नोकरभरती करू नये यासंदर्भात राज्य शासनाची जबाबदारी राहील असे स्पष्ट केले. गणेश कदम यांनी समाज आक्रमक झाल्यास त्याला सरकारच जबाबदार राहतील, असे सांगितले. यावेळी फरांदे, सुनील बागुल, अव्दय हिरे, नितीन भोसले, शरद तुंगार, माधवी पाटील, मयुरी पिंगळे, संदीप शितोळे, नीलेश मोरे, राजू देसले बंदी भागवत, चेतन शेलार, संजय सामोसे यांनी मनोगत व्यक्त केले.मराठा समाजाच्या समस्यांबाबत उपसमितीच्या बैठकांवर बहिष्कार टाकण्याचा निर्णयदेखील करण्यात आला.या बैठकीस आशिष हिरे, संतोष मालोडे, ज्ञानेश्वर थोरात, शरद तुंगार, संदीप शितोळे, किरण पणकार, नीलेश शेलार, चेतन शेलार, सचिन पवार, प्रशांत औटे, आकाश जगताप, राजेश मोरे, सचिन शिंदे, माधवी पाटील, पूजा धुमाळ, मयुरी पिंगळे, तुषार भोसले, हेमंत मोरे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.फरांदे यांच्या विधानाला आक्षेपया बैठकीत आमदार देवयानी फरांदे यांनी आपल्या पक्षाच्या सरकारच्या काळात समाजासाठीच्या आरक्षणास काही उपस्थित युवकांनी आक्षेप घेतल्याने काहीसा गोंधळ उडाला. यावेळी करण गायकर व जगताप यांनी युवकांना शांत केले. तसेच फरांदे यांनी भाषण थांबविले. कार्यक्रमाच्या शेवटी पुन्हा फरांदे यांनी भाषण करताना समाजाच्या मागण्यांना पाठिंबा दिला.आजपासून आमदार, खासदारांना निवेदने देणारमराठा समाजाच्या मागण्यांसाठी सोमवारपासून (दि.१४) नाशिक जिल्ह्यातील सर्व आमदार आणि खासदारांना या मागण्यांचे निवेदन देण्याचे ठरविण्यात आले. त्यानंतर या आमदार-खासदारांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री तसेच उपसमितीच्या अध्यक्षांना आणि आपापल्या पक्षाच्या अध्यक्षांना पत्र लिहावे. जे अशाप्रकारे पत्र लिहिणार नाहीत त्यांच्याविरोधात आंदोलन करून मतदारसंघात फिरू दिले जाणार नाही, असा इशारा यावेळी देण्यात आला.आरोग्य नियमांचे पालननाशिकमध्ये झालेल्या या बैठकीत फिजिकल डिस्टन्सिंंगसह आरोग्य नियमांचेकाटेकोर पालन करण्यात आले होते तसेच भविष्यात आॅनलाइन मिटिंगद्वारे समाजबांधवांशी चर्चा करून जागृती करण्याचे ठरविण्यात आले. मराठा आरक्षणाबाबत न्यायालयाच्या आदेशानंतर काही ओबीसी नेत्यांनी पेढे वाटल्याची केवळ अफवा होती. ओबींसींचे नेते छगन भुजबळ यांनीदेखील तशी माहिती दिली असल्याने त्यांच्यासंदर्भातील राज्यस्तरीय आंदोलन करण्याचा निर्णय मागे घेण्यात आल्याचे यावेळी सांगण्यात आले.

टॅग्स :NashikनाशिकMaratha Kranti Morchaमराठा क्रांती मोर्चाMaratha Reservationमराठा आरक्षण