शहरं
Join us  
Trending Stories
1
धक्कादायक! नांदेडमध्ये पाण्यातून दोनशेहून अधिक जणांना विषबाधा, ६ जण गंभीर
2
नसराल्लाह मारला गेला? हिजबुल्लाहच्या मुख्यालयावर इस्रायलचा मोठा हल्ला
3
"मला क्लीन चिट मिळाल्यामुळेच चांदीवाल आयोगाचा अहवाल दडवला", अनिल देशमुखांचा शिंदे सरकारवर आरोप
4
सरकारची मोठी कारवाई, Aadhaar आणि PAN Card चा डेटा लीक करणाऱ्या ३ वेबसाइट्स ब्लॉक! 
5
Ujjain Mahakal Temple Wall Collapse: उज्जैनच्या महाकाल मंदिराजवळ मोठी दुर्घटना! मुसळधार पावसाने भिंत कोसळली, दोघांचा मृत्यू
6
'त्या' दोन अल्पवयीन मुलींवर आणखी ७ जणांनी अत्याचार केल्याचे उघड!
7
शून्य मोजून थकाल; भारतात लॉन्च झाली Rolls-Royce ची सर्वात महागडी कार, किंमत तब्बल...
8
Rohit Sharma Team India, IND vs BAN 2nd Test: "रोहित शर्माला ही आकडेवारी दाखवा..."; माजी मुंबईकर क्रिकेटर संतापला
9
भारताने कलम 370 लागू करावी; संयुक्त राष्ट्राच्या मंचावर शाहबाज शरीफ यांनी गरळ ओकली
10
"दलित समाजाचा मुख्यमंत्री व्हावा", कुमारी सैलजा यांचा पुन्हा मुख्यमंत्रीपदावर दावा
11
सेक्स रॅकेट चालविणाऱ्या दलाल महिलेला ठाणे येथून अटक; तीन पिडित तरुणींची सुटका
12
Giriraj Singh : केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह यांना जीवे मारण्याची धमकी, पाकिस्तानातून आला व्हॉट्सॲप कॉल
13
An Se-young Shocking Revelations, Paris Olympics 2024: "मला त्यांनी अंतर्वस्त्रे धुवायला लावली"; ऑलिम्पिक गोल्ड मेडलिस्ट खेळाडूचा आरोप
14
"ती म्हणाली मला तुझ्यासोबत वेळ घालवायचाय", युवीने सांगितला अभिनेत्रीसोबतचा किस्सा अन् मोठा खुलासा
15
"PM ज्याच्यावर घोटाळ्याचा आरोप करतात, त्याला DCM बनवतात", केजरीवाल यांचा सभागृहातून हल्लाबोल
16
मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्याविरोधात एफआयआर दाखल, MUDA प्रकरणात पोलिसांची कारवाई! 
17
ना तिकीट, ना रिझर्व्हेशन, भारतामधील एकमेव ट्रेन, जिच्यामधून करता येतो मोफत प्रवास
18
महाराष्ट्रात हजारो जणांना ३०० कोटींचा गंडा घातला, मथुरेत साधूच्या वेशात लपला, अखेर पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
19
काँग्रेसच्या १३ बंडखोर नेत्यांवर कारवाई, ६ वर्षांसाठी पक्षातून हकालपट्टी!
20
Ranbir Kapoor : वयाच्या अवघ्या १४ व्या वर्षी रणबीर कपूरने कामाला केली सुरुवात; आईला दिला पहिला पगार

वॉटर पार्कला धरणातून पाणी देण्यास विरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2019 4:39 PM

शेतकरी एकवटले : अंजेनेरी येथे बैठकीत निर्धार

ठळक मुद्दे एकाही नवीन शेतक-यांना पाणी उचलण्यासाठी परवानगी दिली जात नसताना खाजगी व्यवसायास १० टक्के एवढ्या मोठ्या प्रमाणात पाणी वापराची परवानगी दिली गेल्याने शेतक-यांनी संताप व्यक्त केला.

त्र्यंबकेश्वर : यंदा दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर गावकऱ्यांना टंचाई काळात पिण्याच्या पाण्यासह सिंचनासाठी नितांत आवश्यकता असतांनाही तालुक्याच्या पूर्व भागात असलेल्या एकमेव अंजनेरी प्रकल्पातून जवळच असलेल्या वॉटर पार्कसाठी पाणी आरक्षित करण्यात आल्याचा आरोप करत स्थानिक शेतक-यांनी धरणातून पाणी देण्यास तिव्र विरोध दर्शविला आहे.परिसरातील शेकडो शेतक-यांनी अंजेनेरी येथे बैठक घेत या पाणीवाटपास विरोध दर्शविला आहे. बैठकीत खाजगी व्यवसायास पाणी देण्यास तीव्र विरोध करत हक्काचे पाणी न देण्याचा निर्धार शेतक-यांनी केला. यावेळी ज्येष्ठ नेते मधुकर लांडे, सरपंच राजू बदादे, गोविंद चव्हाण, राजाराम चव्हाण, धोंडीराम चव्हाण, नामदेव चव्हाण, गणेश चव्हाण, चंदू चव्हाण, अंबादास चव्हाण, कचरु निंबेकर, अशोक चव्हाण, गोटीराम करंडे, मुरलीधर महाले, दिलीप शिंदे, निवृत्ती चव्हाण आदी उपस्थित होते. तालुक्यातील पूर्व भागास एकमेव असलेल्या अंजेनेरी धरणावर अनेक गावातील शेतीसह पिण्याचे पाणी अवलंबून आहे. पाच वर्षा पूर्वीच येथील धरणावर शेतक-यांची पाणी सोसायटी सुरु झाली असून त्यानंतर एकाही नवीन शेतक-यांना पाणी उचलण्यासाठी परवानगी दिली जात नसताना खाजगी व्यवसायास १० टक्के एवढ्या मोठ्या प्रमाणात पाणी वापराची परवानगी दिली गेल्याने शेतक-यांनी संताप व्यक्त केला.रितसर शासनाची परवानगी अंजेनेरी प्रकल्पातून पिण्यासाठी १५टक्के, औद्योगिकसाठी १० टक्के तर सिंचनासाठी ७५ टक्के पाणी आरक्षित आहे. त्यानुसार, औद्योगिक वापरासाठी असलेल्या आरक्षणातून शुभम वॉटर वर्ल्ड योजनेला ०.००५४७५ दलघमी इतकेच पाणी आरक्षित झालेले आहे आणि ते रितसर शासनाची परवानगी घेऊन झालेले आहे. इतरही योजनांसाठी औद्योगिक आरक्षणातील पाणी मिळू शकते. परंतु, केवळ राजकीय हेतूने वॉटर पार्कसाठीच्या पाण्याला विरोध केला जात आहे. काही शेतक-यांकडून तर सिंचनासाठी पाणी न वापरता नर्सरीला पाणी विक्री केले जात आहे.- शशिकांत जाधव, संचालक, शुभम वॉटर पार्क

टॅग्स :Nashikनाशिकdam tourismधरण पर्यटन