शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद गंभीर धोका; संयुक्त राष्ट्रांच्या मंचावरुन पीएम नरेंद्र मोदींनी दिला इशारा
2
"शाळेचे संचालक अजूनही का सापडलेले नाहीत?", अक्षय शिंदे चकमकीत ठार झाल्यानंतर आदित्य ठाकरेंचा सवाल
3
"जगन मोहन रेड्डींचे मन शुद्ध असेल तर...", तिरुपती लाडू वादावरून पवण कल्याण यांचा निशाणा
4
Devendra Fadnavis on Badlapur Case Akshay Shinde Encounter: "पोलिसांवर गोळ्या चालवल्या तर..."; देवेंद्र फडणवीसांचे अक्षय शिंदे एन्काऊंटरवर रोखठोक मत
5
अक्षय शिंदे चकमक प्रकरणाची चौकशी व्हावी, नातलगांची मागणी 
6
बदलापूर अत्याचार प्रकरण: अक्षय शिंदे एन्काऊंटरवर नाना पटोले यांचे सरकारला ३ महत्त्वाचे प्रश्न
7
Sharad Pawar on Akshay Shinde Encounter: बदलापूर अत्याचार प्रकरण: अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरवर शरद पवारांचे ट्विट, काय म्हणाले?
8
"प्रकरण दडपण्यासाठी हे एन्काऊंटरचे फेक नॅरेटिव्ह", अक्षय शिंदे चकमकीत ठार झाल्यानंतर अनिल देशमुखांचा आरोप
9
"पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न आहे का?", बदलापूर प्रकरणातील आरोपी चकमकीत ठार, विजय वडेट्टीवारांचा सवाल
10
CM Eknath Shinde on Akshay Shinde Encounter: "ज्याने माणुसकीला काळीमा फासला..."; CM एकनाथ शिंदे अक्षयच्या एन्काऊंटरवर स्पष्टच बोलले
11
अक्षय शिंदे आणि पोलिसांची चकमक ठाण्यात नेमकी कुठे झाली? Inside Story
12
Badlapur Case Accused Akshay Shinde, Police Encounter: बदलापूर अत्याचार प्रकरण: आरोपी अक्षय शिंदे पोलीस चकमकीत ठार! पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी केला गोळीबार
13
बदलापूर प्रकरणातील आरोपी चकमकीत ठार! उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
14
अनिल अंबानी यांच्या मुलावर SEBI ची कारवाई; 'या' प्रकरणात ठोठावला कोट्यवधीचा दंड
15
"माझ्या पोराला पैसे देऊन मारून टाकलं", अक्षय शिंदेच्या आईचे गंभीर आरोप, दुपारीच घेतली होती भेट
16
भारतात मंकीपॉक्सचा रुग्ण आढळला, क्लेड १ बी व्हायरसची लागण, आरोग्य यंत्रणा सतर्क
17
'या' दिवसापासून भाजप राबवणार मेगा सदस्यत्व अभियान, एक कोटी लोकांना जोडण्याचे लक्ष्य
18
रोहित पवारांना राम शिंदेंचा धक्का! कर्जत-जामखेडमधील दोन नेते भाजपात
19
Video: बापरे! अजगराचा महिलेला विळखा, दोन तास मृत्यूशी झुंज, श्वास घेणेही कठीण; अखेर...
20
"लहान आणि मोठे हुड्डा यांच्यात लढाई सुरू आहे...", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल, कुमारी सैलजा यांच्यावरही निशाणा

‘ओतूर’ ओव्हरफ्लो

By admin | Published: August 06, 2016 10:48 PM

‘ओतूर’ ओव्हरफ्लो

ओतूर : कळवण तालुक्यातील ओतूर धरण गेल्या सामवारी पाण्याने पूर्णपणे भरले असून, ओव्हरफ्लो झाल्याने परिसरातील शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.आतूर परिसरातील वीस गावांना या धरणाच्या पाण्याचा फायदा होतो. या शेतकऱ्यांना वरदान ठरणाऱ्या धरणामध्ये यावर्षी ९७ दशलक्ष घनफूट पाण्याचा साठा झाला आहे. दररोज हजारो क्युसेस पाण्यचा विसर्ग होत असून, मार्कंडेय नदी दुथडी भरून वाहात आहे. परिसरातील काही शेतकऱ्यांच्या जमिनी अति पावसामुळे उपळल्या असून, शेतीतून पाणी वाहात आहे. त्यामुळे खरीपांचे काही प्रमाणात नुकसान होणार आहे. गेल्या रविवारी व सोमवारी पुनर्वसू नक्षत्राच्या शेवटच्या चरणात जोरदार पर्जन्यवृष्टी झाली आहे. आता आश्लेषा नक्षत्रानेही पावसाची हजेरी लावली आहे. गेल्या चार ते पाच वर्षात ओतूर धरणात एवढे पाणी आले नव्हते. नदीकाठच्या शेतकऱ्यांना प्रशसनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. सदर मार्कंडेय नदी पुढे कळवण खुर्द गावाजवळ बेहडी नदीस मिळते व पुढे त्या गिरणा नदीत विलीन होतात. पावसामुळे खरीप पिकांना जीवदान मिळाले आहे. परिसरातील विहिरी पाण्याने तुडुंब भरल्याने त्याचा खरीप पिकांना फायदा होणार आहे. या धरणामुळे शेतीच्या पाण्याचा व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला आहे. बऱ्याच शेतरक्यांच्या शेतात पूरपाणी घुसल्याने शेतीचे नुकसान झाले असून, पर्यायाने पिकांचे नुकसान झाले आहे. दोन तीन दिवस पडलेल्या मुसळधार पावसामुळे ओतूर धरणासह परिसरातील लहान मोठी पाझर तलावही पाण्याने भरली आहेत. या पावसामुळे आदिवासी व परिसरातील जनजीवन विस्कळीत झाले होते. यंदाच्या पावसाळ्यात प्रथमच ओतूर धरण भरल्याने व नदीला पहिला पूर आल्याने पाय रस्ते वाहून गेले आहेत. डोंगर उतारावरून माती वाहून आल्याने सर्व रस्ते चिखलमय झाले आहेत. काही रस्त्याच्या साईड पट्ट्या व मातीचा भराव वाहून गेला आहे. (वार्ताहर)नाशिक मनपाकडून नुकसानीचे पंचनामे सुरूनाशिक : गेल्या मंगळवारी (दि. २) शहरात पडलेल्या मुसळधार पावसामुळे तसेच गोदावरीला आलेल्या महापुरामुळे ठिकठिकाणी झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्यास शुक्रवारी सुरुवात झाली. दिवसभरात सुमारे २५० पंचनामे करण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली. जिल्हाधिकारी कार्यालय आणि महापालिका यांच्या वतीने घरांचे, दुकानांचे तसेच धान्य व इतर मालमत्ता यांच्या नुकसानीचे पंचनामे करण्यात येत आहे. त्यासाठी १० पथके तैनात करण्यात आली आहेत. शिवाजीवाडी येथे २१० पंचनामे तर नाशिक-पुणे महामार्गावरील आंबेडकरवाडी येथे ४० पंचनामे करण्यात आले. (प्रतिनिधी)