शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

Padma Award : अदनान सामींचा पद्मश्री पुरस्काराने सन्मान, नवाब मलिकांचं खोचक ट्विट

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2021 17:27 IST

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याहस्ते आज राजधानी दिल्ली येथे पद्म पुरस्कारांचे वितरण झाले. राजभवनात शानदार सोहळ्यात विविध क्षेत्रातील योगदानाबद्दल मानकरी महोदयांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला

ठळक मुद्दे सामी यांनी पुरस्कार स्विकारल्यानंतरही मलिक यांनी सामी आणि केंद्र सरकारला खोचक टोला लगावला आहे

नवी दिल्ली - गायक अदनान सामी यांना पद्मश्री पुरस्कार घोषित झाल्यानंतर वाद निर्माण झाला होता. त्यावेळी, मनसेपाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसनेही त्यांना पद्मश्री पुरस्कार देण्यास विरोध केला. पाकिस्तानमधून कोण इथं येऊन जय मोदी हा नारा देत असेल तर त्याला देशाचं नागरिकत्व दिलं जातं अन् पद्मश्री पुरस्कार मिळतो हे स्पष्ट उदाहरण आहे, असे राष्ट्रवादीचे नेते मंत्री नवाब मलिक यांनी म्हटलं होतं. आता, पुन्हा एकदा नवाब मलिक यांनी अदनान सामी आणि केंद्र सरकारवर टीका केलीय.  

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याहस्ते आज राजधानी दिल्ली येथे पद्म पुरस्कारांचे वितरण झाले. राजभवनात शानदार सोहळ्यात विविध क्षेत्रातील योगदानाबद्दल मानकरी महोदयांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यामध्ये, बॉलिवूड, कला, क्रीडा, साहित्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांचा समावेश आहे. गायक अदनाना सामी यांनीही राष्ट्रपतींच्याहस्ते हा पुरस्कार स्विकारला. मात्र, अदनाना सामी यांनी पुरस्कार स्विकारताच मंत्री नवाब मलिक यांनी पुन्हा एकदा त्यांच्यावर निशाणा साधला आहे.  अदनान सामीला पुरस्कार देणं हा देशातील जनतेचा अपमान आहे, अशी टीका नवाब मलिकांनी पुरस्कार जाहीर झाल्यानंतर केली होती. आता, सामी यांनी पुरस्कार स्विकारल्यानंतरही मलिक यांनी सामी आणि केंद्र सरकारला खोचक टोला लगावला आहे. जे आमच्यासोबत आहेत, त्यांना आम्ही नागरिकताही देऊ आणि पद्मश्रीही. मग, ते पाकिस्तानचे का असेनात. अदनाना सामी यांना पद्मश्री मिळाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन... असे खोचक ट्विट नवाब मलिक यांनी केले आहे.   दरम्यान, कला क्षेत्रातून ज्येष्ठ पार्श्वगायक सुरेश वाडकर यांच्यासह गायक अदनान सामीलादेखील पद्मश्री पुरस्कार जाहीर करण्यात आला. 

मनसेनंही व्यक्त केली होती नाराजी

मनसे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी ट्विट करून पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या या निर्णयाबद्दल नाराजी व्यक्त केली होती. सुरेश वाडकर यांना पद्मश्री मिळाल्याचा आनंद साजरा करतोय, तोच आनंदावर थोडं विरजण पडलं ते अदनान सामीला दिलेल्या पद्मश्रीमुळे असं अमेय खोपकर यांनी म्हटलं होतं. याशिवाय, 2015 मध्ये म्हणजे मोदींच्याच काळात त्याला भारतीय नागरिकत्व मिळालं आणि लगेच चार वर्षात त्याला पद्मश्रीही बहाल केला. त्याला एवढं लिफ्ट करण्याचं कारण काय? असा प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केला होता. 

टॅग्स :nawab malikनवाब मलिकNCPराष्ट्रवादी काँग्रेसpadma shri awardsपद्मश्री पुरस्कारAdnan samiअदनान सामी