शहरं
Join us  
Trending Stories
1
"खोलीत क्षेपणास्त्रे, गॅरेजमध्ये रॉकेट ठेवणाऱ्यांकडून...", हवाई हल्ल्यादरम्यान नेतन्याहू यांचा लेबनॉनला संदेश
2
भाजपच्या 'इलेक्शन मोड'साठी अमित शाहांची दहा सूत्री 'ब्ल्यू प्रिंट'!
3
'लाडक्या बहिणी' कमळाला मत देतील, म्हणून हा जुगाड; भाजप आमदाराचा व्हिडीओ वडेट्टीवारांकडून पोस्ट!
4
...अन् बलात्कारी, मर्डरर अमरसिंग ठाकूरचे एन्काऊंटर थोडक्यात हुकले!
5
राहुल गांधींचा पासपोर्ट रद्द करा... भाजप खासदाराचे लोकसभा अध्यक्षांना पत्र 
6
अंगावर डिझेल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न, घरकुलाच्या जागेच्या मोजणीवरून वाद
7
अक्षय शिंदेच्या एन्काउंटरची सीआयडी व न्यायालयीन चौकशी केली जाणार 
8
माजी पोलीस महासंचालक म्हणाले, तर हे एन्काऊंटरच घडले नसते!
9
सर्वसामान्यांचे ₹ 1.8 लाख कोटी लुटणाऱ्यांची नावे उघड करा; राहुल गांधींचा SEBI वर हल्लाबोल
10
रशिया-युक्रेन युद्ध संपणार का? PM मोदी आणि झेलेन्स्कींची तीन महिन्यांत तिसऱ्यांदा भेट...
11
"मग नंतर तो कधी शिकणार?"; यशस्वी जैस्वालबद्दल पाकिस्तानी माजी क्रिकेटरचं रोखठोक मत
12
बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा मृतदेह अखेर नातेवाईक घेणार ताब्यात
13
"...तर विरोधकांचाही 'त्या' एन्काउंटरला पाठिंबा असेल"; नाना पटोलेंनी शिंदे सरकारला दिलं चॅलेंज
14
निवडणुकीदरम्यान मतभेद बाजूला ठेवा, गटबाजी खपवून घेणार नाही, अमित शाहांनी टोचले कान
15
Gayatri Shingne : राजेंद्र शिंगणेंविरोधात पवारांचा उमेदवार ठरला? गायत्री शिंगणे लढवणार विधानसभा!
16
राज्यातील विविध तीर्थक्षेत्र विकासांच्या ३०५ कोटी रुपयांच्या आराखड्यांना मंजुरी
17
६ लाख मोबाईल फोन बंद, ६५ हजार URLs ब्लॉक... सायबर फ्रॉड रोखण्यासाठी सरकारची मोठी कारवाई
18
जयंत पाटलांचं अजित पवारांना नवं चॅलेंज; "मोदींकडून एवढं काम करून घेतलं, तर..."
19
जोगेश्वरी पूर्व विधानसभा मतदारसंघावरून शिवसेना शिंदे गट आणि भाजपात रस्सीखेच
20
"आम्हा तिघांनाही CM व्हायचंय, पण निर्णय हायकमांडचा", रणदीप सुरजेवालांनी केले मोठे वक्तव्य

येवल्यात पालखेडचे पाणी पेटले

By admin | Published: December 22, 2016 12:39 AM

चार अत्यवस्थ : तीन दिवसानंतरही अधिकारी उपोषणस्थळी फिरकले नाही

येवला : तालुक्याच्या पूर्व भागातील वितरिका क्रमांक ४६ ते ५२ या आठमाही करण्यासाठी व चालू आवर्तनातून पिण्यासाठी बंधारे भरून देण्यासाठी लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांनी सुरू केलेल्या उपोषणाच्या तिसऱ्या दिवशी पालखेडचे पाणी येवला तालुक्यात चांगलेच पेटले आहे. उपोषणकर्त्यांची स्थानिक प्रशासनाने साधी चौकशीही केलेली नाही. उपोषणस्थळी कोणीही शासकीय अधिकारी फिरकलेले नाहीत. दरम्यान, ७२ तास उलटल्यानंतर काही उपोषणकर्त्यांची प्रकृती ढासळली आहे. ज्येष्ठ नागरिक भगवान भागवत (६७), तसेच भास्कर भागवत (६५) आणि संदीप लभडे (३५) यांना अत्यवस्थ वाटू लागल्याने शहरातील ग्रामीण रु ग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पाणीप्रश्नावर लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांनी यापूर्वी अनेक आंदोलने, रास्ता रोको केलेले आहेत. कित्येक जण कुटुंबातील महिलांसह नाशिक येथील मध्यवर्ती कारागृहात जाऊन आलेले आहेत. तरीही अद्याप प्रश्न प्रलंबित असून, शासनाच्या उदासीनतेमुळे शेतकऱ्यांच्या संतापाचा कडेलोट झाला आहे. दरम्यान, आज उपोषणस्थळी शिवसेना नेते संभाजी पवार, जिल्हा सहकार चळवळीचे नेते अंबादास बनकर, शेतकरी संघटना नेते संतू पा. झांबरे, कुणाल दराडे यांच्यासह तालुक्यातील मान्यवरांनी भेट देऊन उपोषणास पाठिंबा व्यक्त केला. जलसंपदाचे साचेबंद उत्तर पालखेड धरणसमूहाचे मुख्य कार्यकारी अभियंता राजेंद्र शिंपी यांनी या उपोषणाबाबत नेहमीचेच साचेबंद उत्तर दिले आहे. धरणांमध्ये गाळ साठला असून, साठवण क्षमता कमी झाली आहे. मृत साठाही कमी झाला आहे. कालव्याची वहन क्षमता फक्त ३० टक्के आहे. म्हणजे एकूण पाण्याचा ७० टक्के वहनव्यय होतो. पण या वहनव्ययावर पालखेड प्रशासनाने आजवर काय केले हे मात्र सांगितले नाही. तसेच पालखेड कालवा प्रशासनाच्या संवेदना बोथट झाल्या असून, पाण्याचा शेतकऱ्यांच्या हितासाठी वापर होतो की व्यापार होतो, अशी चर्चा आता रंगू लागली आहे. कारण, उर्ध्व भागातील अनेक पाणी वापर संस्थांनी पाणी घेतलेले नाही. मग, आवर्तनाचे पाणी नेमके जाते कुठे, याचा ताळेबंद अधिकाऱ्यांनी द्यावा, अशीही मागणी आंदोलक करीत आहेत. (वार्ताहर) येवला तालुक्याच्या पूर्व भागातील वितरिका क्र मांक ४६ ते ५२ ला पालखेडच्या चालू आवर्तनातून पिण्यासाठी बंधारे भरून देण्यासाठी लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांचे उपोषण तिसऱ्या दिवशीही सुरूच आहे.