शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद गंभीर धोका; संयुक्त राष्ट्रांच्या मंचावरुन पीएम नरेंद्र मोदींनी दिला इशारा
2
"शाळेचे संचालक अजूनही का सापडलेले नाहीत?", अक्षय शिंदे चकमकीत ठार झाल्यानंतर आदित्य ठाकरेंचा सवाल
3
"जगन मोहन रेड्डींचे मन शुद्ध असेल तर...", तिरुपती लाडू वादावरून पवण कल्याण यांचा निशाणा
4
Devendra Fadnavis on Badlapur Case Akshay Shinde Encounter: "पोलिसांवर गोळ्या चालवल्या तर..."; देवेंद्र फडणवीसांचे अक्षय शिंदे एन्काऊंटरवर रोखठोक मत
5
अक्षय शिंदे चकमक प्रकरणाची चौकशी व्हावी, नातलगांची मागणी 
6
बदलापूर अत्याचार प्रकरण: अक्षय शिंदे एन्काऊंटरवर नाना पटोले यांचे सरकारला ३ महत्त्वाचे प्रश्न
7
Sharad Pawar on Akshay Shinde Encounter: बदलापूर अत्याचार प्रकरण: अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरवर शरद पवारांचे ट्विट, काय म्हणाले?
8
"प्रकरण दडपण्यासाठी हे एन्काऊंटरचे फेक नॅरेटिव्ह", अक्षय शिंदे चकमकीत ठार झाल्यानंतर अनिल देशमुखांचा आरोप
9
"पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न आहे का?", बदलापूर प्रकरणातील आरोपी चकमकीत ठार, विजय वडेट्टीवारांचा सवाल
10
CM Eknath Shinde on Akshay Shinde Encounter: "ज्याने माणुसकीला काळीमा फासला..."; CM एकनाथ शिंदे अक्षयच्या एन्काऊंटरवर स्पष्टच बोलले
11
अक्षय शिंदे आणि पोलिसांची चकमक ठाण्यात नेमकी कुठे झाली? Inside Story
12
Badlapur Case Accused Akshay Shinde, Police Encounter: बदलापूर अत्याचार प्रकरण: आरोपी अक्षय शिंदे पोलीस चकमकीत ठार! पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी केला गोळीबार
13
बदलापूर प्रकरणातील आरोपी चकमकीत ठार! उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
14
अनिल अंबानी यांच्या मुलावर SEBI ची कारवाई; 'या' प्रकरणात ठोठावला कोट्यवधीचा दंड
15
"माझ्या पोराला पैसे देऊन मारून टाकलं", अक्षय शिंदेच्या आईचे गंभीर आरोप, दुपारीच घेतली होती भेट
16
भारतात मंकीपॉक्सचा रुग्ण आढळला, क्लेड १ बी व्हायरसची लागण, आरोग्य यंत्रणा सतर्क
17
'या' दिवसापासून भाजप राबवणार मेगा सदस्यत्व अभियान, एक कोटी लोकांना जोडण्याचे लक्ष्य
18
रोहित पवारांना राम शिंदेंचा धक्का! कर्जत-जामखेडमधील दोन नेते भाजपात
19
Video: बापरे! अजगराचा महिलेला विळखा, दोन तास मृत्यूशी झुंज, श्वास घेणेही कठीण; अखेर...
20
"लहान आणि मोठे हुड्डा यांच्यात लढाई सुरू आहे...", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल, कुमारी सैलजा यांच्यावरही निशाणा

दोन वर्षांमध्ये पूर्ण होईल परभणीचा बाह्य वळण रस्ता

By admin | Published: December 15, 2015 11:39 PM

परभणी : कल्याण-निर्मल या राष्ट्रीय महामार्गाला परभणी शहरात बाह्य वळण रस्ता मंजूर झाला असून, त्याचा राजपत्रातही समावेश झाला आहे़

परभणी : कल्याण-निर्मल या राष्ट्रीय महामार्गाला परभणी शहरात बाह्य वळण रस्ता मंजूर झाला असून, त्याचा राजपत्रातही समावेश झाला आहे़ कामाला योग्य गती मिळाल्यास दोन वर्षांमध्ये हे काम पूर्ण होऊ शकते, अशी माहिती जिल्हाधिकारी राहुल रंजन महिवाल यांनी दिली़ शहराच्या विकासाचा घटक असलेल्या बाह्य वळण रस्त्याचे काम मागील काही वर्षांपासून रखडले होते़ या रस्त्याच्या प्रश्नावर शासकीय स्तरावरही एकत्रित माहिती उपलब्ध नसल्याने परभणी शहरातील पत्रकारांनी या प्रश्नी पुढाकार घेतला़ जिल्हाधिकारी राहुल महिवाल यांची भेट घेऊन रस्त्याच्या प्रश्नावर एकत्रित माहिती घेऊन बाह्य वळण रस्त्याच्या कामाला गती देण्याच्या उद्देशाने प्रयत्न सुरू केले़ त्याचाच एक भाग म्हणून बाह्य वळण रस्त्याच्याशी संदर्भात सर्व यंत्रणांचे अधिकारी आणि पत्रकारांची संयुक्त बैठक दोन दिवसांपूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली़ या बैठकीत जिल्हाधिकारी राहुल महिवाल यांनी रस्त्या संदर्भात माहिती दिली़ ते म्हणाले, बाह्य वळण रस्त्याचे सर्वेक्षण भारतीय राजपत्रात प्रसिद्ध झाले आहे़ त्यामुळे आता या कामाला गती मिळणार आहे़ रस्त्यासाठी भुसंपादन हा महत्त्वाचा प्रश्न असून, भुसंपादनासाठी ३५० कोटी रुपयांची तरतूदही उपलब्ध आहे़ राजपत्रात समावेश झाल्याने जिल्हा प्रशासनातील भूसंपादन विभाग आणि राष्ट्रीय महामार्गाचे अधिकारी यांच्याकडून संयुक्त मोजणी केली जाणार असून, मोजणीनंतर प्रत्यक्षात भुसंपादनाच्या कामाला प्रारंभ होईल़ भुसंपादन कामासाठी योग्य गती राखली तर आगामी दोन वर्षांमध्ये बाह्य वळण रस्त्याचे काम पूर्ण होईल, असा आशावादही त्यांनी व्यक्त केला़ या बैठकीस जिल्हाधिकारी राहुल महिवाल यांच्यासह राष्ट्रीय महामार्गाचे उपअभियंता कर्णेवार, जिल्हा भूसंपादन अधिकारी एस़एच़ मावची, पत्रकार अशोक कुटे, सुरेश जंपनगिरे, धनाजी चव्हाण, विशाल माने, प्रभु दिपके, अनिल दाभाडकर, विनोद कापसीकर, बंडू बनसोडे, सुमन उफाडे, आबासाहेब कड, मुंदडा आदींची उपस्थिती होती़ दरम्यान, राष्ट्रीय महामार्गाला परभणी शहरापासून बाह्य वळण रस्ता झाल्यानंतर शहराच्या विस्तारीकरणाचे आणि विकासाचे मार्ग मोकळे होणार आहेत़ त्यामुळेच पत्रकारांनी हा प्रश्न उचलून धरला आहे़ (प्रतिनिधी)