शहरं
Join us  
Trending Stories
1
रोहित पवारांना राम शिंदेंचा धक्का! कर्जत-जामखेडमधील दोन नेते भाजपात
2
'या' दिवसापासून भाजप राबवणार मेगा सदस्यत्व अभियान, एक कोटी लोकांना जोडण्याचे लक्ष्य
3
"लहान आणि मोठे हुड्डा यांच्यात लढाई सुरू आहे...", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल, कुमारी सैलजा यांच्यावरही निशाणा
4
“दिल्लीत मोदींचे सरकार तयार झाले नसते, ४०० पार सांगत होते पण...”; शरद पवारांचे सूचक विधान 
5
“शेतकऱ्यांमुळे नरेंद्र मोदी पंतप्रधान, पण सत्तेत येताच त्यांना उद्ध्वस्त करायचे धोरण”: नाना पटोले
6
अजिंक्य रहाणेनं CM शिंदेंसह अजित पवार अन् फडणवीसांचे मानले खास आभार; जाणून घ्या कारण
7
“जनतेचे प्रश्न सोडवण्यात भाजपा महायुती सरकार अपयशी, फक्त पैसा वसुली...”: रमेश चेन्नीथला
8
मनोज जरांगेंची मागणी योग्यच, आमचा त्यांना पाठिंबा, पण...; शरद पवारांनी स्पष्ट केली भूमिका
9
महाविकास आघाडीचे जागावाटप ठरले? काँग्रेस १०० जागा, तर ठाकरे शिवसेना, पवार गट एवढ्या जागा लढविणार
10
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी: दुधाच्या अनुदानात वाढ; मंत्रिमंडळ बैठकीत २३ मोठे निर्णय
11
'३४ वर्ष वाट पाहिली अन्..'; 'लापता लेडीज'ची ऑस्कर २०२५ मध्ये एन्ट्री होताच रवी किशन भावुक
12
Nicholas Pooran ला तोड नाही; कॅरेबियन गड्यानं सेट केला षटकारांचा 'महा-रेकॉर्ड'
13
Video : रस्त्यावरील खड्ड्याने केंद्रीय मंत्र्याचीच केली फजिती, शिवराज सिंह चौहानांचा व्हिडीओ व्हायरल
14
"...तर ईश्वर आम्हाला माफ करणार नाही", 'हिट अ‍ॅण्ड रन' घटनेवर उच्च न्यायालय काय म्हणाले?
15
“संभाजीराजेंना ओबीसींचा द्वेष, मतांच्या बेरजेसाठी मनोज जरांगेंना भेटले”; कुणी केली टीका?
16
देशातील रोजगार वाढले, जुलै 2024 मध्ये EPFO मध्ये जोडले गेले 19.94 लाख नवीन सदस्य
17
Rishabh Pant नं शेअर केली बांगलादेशची फिल्ड सेट करण्यामागची Untold Story
18
हरियाणात काय परिस्थिती? ९० जागांपैकी १६-१८ भाजपा जिंकणार? उरलेल्या आप की काँग्रेस...
19
गिरीश महाजनांविरोधात शरद पवारांचा उमेदवार ठरला! जयंत पाटलांकडून शिक्कामोर्तब
20
"आता सर्व काही शुद्ध झाले आहे…", तिरुपती मंदिरातील शुद्धीकरण विधींबाबत पुजाऱ्याचे भाष्य

पेठ तालुक्यात पुन्हा मुसळधार; रस्त्यांची चाळण, पुलांची दुरवस्था

By admin | Published: August 06, 2016 10:26 PM

पेठ तालुक्यात पुन्हा मुसळधार; रस्त्यांची चाळण, पुलांची दुरवस्था

 पेठ : एक दिवसाच्या विश्रांतीनंतर शुक्रवारपासून पावसाने परत आपले रौद्ररूप दाखवले असून, पेठ तालुक्याला झोडपून काढले आहे.दमणगंगा नदीला मोठ्या प्रमाणावर पूर आल्याने नदीकाठच्या गावांची वाताहात झाली असून, रस्त्यांची पूर्ण चाळण झाल्याने नागरिक त्रासले आहेत. नद्या-नाल्यांवरील फरशा व पूल वाहून गेल्याने ग्रामस्थांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. खडकी, उम्रद, बोंडारमाळ, खामशेत, गायधोंड, बिलकस, बोरपाडा, धानपाडा आदि नदीकाठच्या गावांचा संपर्क तुटला आहे. भुवन घाटात चार-पाच ठिकाणी दरडी कोसळल्याने वाहनधारक दगड माती बाजूला करत जीवघेणा प्रवास करत आहेत.भात शेती नष्ट४प्रचंड पावसाने उतारावरील नागली, वरई व खाचरातील भातशेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. खाचरात (आवणात) मोठ्या प्रमाणावर पाणी साचल्याने बांध फुटून शेती वाहून गेली तर बऱ्याच शेतांमध्ये पुराचे पाणी शिरल्याने भातपिके बुडाली आहेत. जुलै महिन्याच्या अखेरीस लावणी केलेली पिके वाहून गेल्याने शेतकरी हवालदिल झाला असून, रोपे संपल्याने दुबार लावणीही करू शकत नसल्याने मोठ्या आर्थिक संकटाला सामोरे जावे लागणार असण्याची चिन्हे दिसत आहेत.अधिकारी-कर्मचाऱ्यांनी मुख्यालयी थांबावे४दोन दिवसापासून तालुक्यात मुसळधार पावसाने थैमान घातले असून, आपत्कालीन परिस्थिती लक्षात घेता तालुक्यातील अधिकारी व कर्मचारी यांनी मुख्यालय सोडू नये, असे आदेश प्रशासनाकडून देण्यात आले असून, ग्रामसेवक, तलाठी यांनी परिस्थितीचा अहवाल कळविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. महसूल, कृषी व पंचायत समितीच्या माध्यमातून नुकसानीचे पंचनामे सुरु करण्यात आले आहेत.आंबेगणचा वळण बंधारा धोकेदायक४दिंडोरी तालुक्यातील गोळशी फाटानजीक बांधलेल्या वळण बंधाऱ्याचा पूर्वेकडील सांडवा बंद झाल्याने बांधावर पाण्याचा दाब वाढला असून, यामुळे पेठ तालुक्यातील शिंदे, आड भागाला पुराचा धोका निर्माण झाल्याची चर्चा असून, सतर्कता बाळगण्याचे आवाहन करण्यात आले आहे.