शहरं
Join us  
Trending Stories
1
Agniveer: "शहीदाच्या कुटुंबाला पैसे मिळत नाहीत"! राहुल गांधींच्या दाव्यावर काय म्हणाले अग्निवीर अक्षय गवते यांचे वडील?
2
देवदर्शनाचा मोफत प्रवास नडला २१ जण जखमी; खेड तालुक्यातील एका भावी आमदाराची राजकीय वारी
3
'पंतप्रधान नरेद्र मोदी यांना अयोध्येतून निवडणूक लढवायची होती, पण...'; राहुल गांधींचा लोकसभेत मोठा गौप्यस्फोट?
4
VIDEO : राहुल गांधी यांनी भगवान शिव शंकरांचा फोटो दाखवताच कॅमेरा फिरला! काँग्रेस म्हणाली, बघा 'जादू'!
5
UPSC प्रीलिम्स 2024 परीक्षेचा निकाल जाहीर; मेन्सची तारीख पाहा...
6
पंकजा मुंडेंना विधानपरिषदेची उमेदवारी जाहीर; देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
7
कोकण विभाग पदवीधर मतदारसंघात निरंजन डावखरे 1 लाख 719 मते मिळवून विजयी
8
मेधा पाटकरांना 5 महिने कारावास अन् 10 लाखांचा दंड, 23 वर्षे जुन्या प्रकरणात शिक्षा
9
विधानपरिषदेत शिवीगाळ! अंबादास दानवे आणि प्रसाद लाड यांच्यात हमरीतुमरी; माझ्यावर बोट केलं, तर....
10
विधान परिषद निवडणुकीसाठी काँग्रेसकडून प्रज्ञा सातव यांना उमेदवारी 
11
पंकजा मुंडेंना विधान परिषदेची उमेदवारी; मनोज जरांगेंची स्पष्ट शब्दांत प्रतिक्रिया, म्हणाले...
12
'सिंचन घोटाळ्यातील आरोपी भाजपसोबत', AAP खासदाराच्या टीकेवर प्रफुल्ल पटेलांचा पलटवार
13
राजस्थानमध्ये भीषण अपघात! बोलेरो-ट्रकची धडक; ९ जणांचा मृत्यू
14
“गर्व है कि हम हिंदू हैं!”; राहुल गांधी यांच्या विधानावरुन योगी आदित्यनाथ यांचे प्रत्युत्तर
15
“उद्धव ठाकरेंच्या काळात महाराष्ट्र उद्ध्वस्त झाला, २ वर्षांत FDIमध्ये अव्वल”: उदय सामंत 
16
"मला गप्प बसवायला गेले अन् भाजपच्या ६३ खासदारांना जनतेने कायमस्वरुपी बसवलं", महुआ मोईत्रांचा हल्लाबोल
17
"माझा भाऊ कधीच हिंदूंचा अपमान करू शकत नाही’’, राहुल गांधींच्या बचावासाठी प्रियंका गांधी सरसावल्या  
18
'लिहून देतो, तुमचा गुजरातमध्ये पराभव करणार...', लोकसभेतून राहुल गांधींचे BJP ला थेट आव्हान
19
“खऱ्या अर्थाने वंचित, दलितांना न्याय देण्याचे काम भाजपा करते”; अमित गोरखेंची प्रतिक्रिया
20
Maharashtra Vidhan Parishad Election 2024 विधान परिषद निवडणुकीसाठी भाजपाकडून उमेदवार जाहीर, पंकजा मुंडेंसह या पाच जणांना संधी

नाशकात ऐतिहासिक महाबोधी वृक्षाचे राेपण, हजारो उपासकांच्या उपस्थितीत सोहळा

By suyog.joshi | Published: October 24, 2023 4:49 PM

ढोल ताशांच्या गजरात वाजत गाजत पालखीत मिरवणूक काढल्यानंतर त्रिरश्मी लेणीच्या पायथ्याशी असलेल्या बुद्ध स्मारकात विजयादशमीदिनी महाबोधीवृक्षाचे रोपण मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले.

नाशिक -  ढोल ताशांच्या गजरात वाजत गाजत पालखीत मिरवणूक काढल्यानंतर त्रिरश्मी लेणीच्या पायथ्याशी असलेल्या बुद्ध स्मारकात विजयादशमीदिनी महाबोधीवृक्षाचे रोपण मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले. हा क्षण ‘याची देही याची डोळा’ अनुभवण्यासाठी राज्यासह जिल्ह्यातील हजारो बुद्ध उपासक तसेच देश-विदेशातील भिख्खू उपस्थित होते. विजयादशमी अर्थात मंगळवार, दि. २४ रोजी पांडवलेणीजवळ त्रिरश्मी लेणीच्या पायथ्याशी झालेल्या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे श्रीलंका येथील बोधीवृक्षाचे प्रमुख हेमरत्न नायक थेरो यांच्या हस्ते या ऐतिहासिक महाबोधीवृक्षाचे रोपण करण्यात आले. व्यासपीठावर स्वागताध्यक्ष अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार, पालकमंत्री दादा भुसे, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, श्रीलंकेचे सांस्कृतिक मंत्री विदूर विक्रम नायक, श्रीलंकेतील भिक्खू नाराणपणावे, भिक्खू पोंचाय, भदंत खेमधम्मो महस्थवीर यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी बोलताना भुजबळ म्हणाले, राज्य शासनाने १८ कोटींचा तातडीने निधी देत या कामात सिंहाचा वाटा उचलला. हा बोधीवृक्ष श्रीलंकेतून आणला असून ही एक प्रकारे महाराष्ट्रासाठी मोठी भेट आहे. ज्या वृक्षाखाली बुद्धांना ज्ञान प्राप्त झाले, त्याच झाडाचे नाशिकमध्ये रोपण होत आहे, ही कौतुकाची बाब आहे. विदूर विक्रम नायक म्हणाले, या देशात फक्त एकच भाषा आहे, ती आहे हद्याच. प्रत्येकाने एकमेकांशी प्रेमानेच वागले पाहिजे. एकमेकातील कटूता दूर व्हायला हवी. ऐतिहासिक बोधी वृक्ष म्हणजे हा मानवतेचा संदेश देणाो असून बुद्धांपासून खूप काही शिकण्यासारखे आहे, त्याचे प्रत्येकाने अवलोकन करणे गरजेचे आहे.मंत्रोच्चारात कार्यक्रमबौद्ध भिखू महासंघाच्यावतीने बुद्ध उपासना व मंत्रोच्चारात महाबोधी वृक्षाचे रोपण करण्यात आले. यावेळी उपस्थित भिखूंनी या झाडाला माती अर्पण केली. त्यानंतर इतर मान्यवरांनी झाडाला पाणी घातले. कार्यक्रमानिमित्त तयार करण्यात आलेल्या कोनशिलेचे अनावरण, ध्वजारोहण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.मुख्यमंत्र्यांचा ऑनलाईन संदेशकार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित राहू शकले नाही. परंतु त्यांनी ऑनलाईन व्हिडिओद्वारे उपासकांना संदेश दिला. भगवान बुद्धांचा शांतीचा संदेश प्रत्येक नागरिकापर्यत पाेहोचविण्याची गरज आहे. महाराष्ट्र हे समता, बंधुता, शांतता पाळणारी, मुल्ये जाेपासणारे राज्य आहे. यानिमित्ताने आपण सर्वांनी शांतीची उजळणी करण्याचा सल्ला शिंदे यांनी दिला.

टॅग्स :Nashikनाशिक