शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वसामान्यांचे ₹ 1.8 लाख कोटी लुटणाऱ्यांची नावे उघड करा; राहुल गांधींचा SEBI वर हल्लाबोल
2
'लाडक्या बहिणी' कमळाला मत देतील, म्हणून हा जुगाड; भाजप आमदाराचा व्हिडीओ वडेट्टीवारांकडून पोस्ट!
3
राहुल गांधींचा पासपोर्ट रद्द करा... भाजप खासदाराचे लोकसभा अध्यक्षांना पत्र 
4
रशिया-युक्रेन युद्ध संपणार का? PM मोदी आणि झेलेन्स्कींची तीन महिन्यांत तिसऱ्यांदा भेट...
5
बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा मृतदेह अखेर नातेवाईक घेणार ताब्यात
6
"...तर विरोधकांचाही 'त्या' एन्काउंटरला पाठिंबा असेल"; नाना पटोलेंनी शिंदे सरकारला दिलं चॅलेंज
7
"मग नंतर तो कधी शिकणार?"; यशस्वी जैस्वालबद्दल पाकिस्तानी माजी क्रिकेटरचं रोखठोक मत
8
निवडणुकीदरम्यान मतभेद बाजूला ठेवा, गटबाजी खपवून घेणार नाही, अमित शाहांनी टोचले कान
9
Gayatri Shingne : राजेंद्र शिंगणेंविरोधात पवारांचा उमेदवार ठरला? गायत्री शिंगणे लढवणार विधानसभा!
10
राज्यातील विविध तीर्थक्षेत्र विकासांच्या ३०५ कोटी रुपयांच्या आराखड्यांना मंजुरी
11
६ लाख मोबाईल फोन बंद, ६५ हजार URLs ब्लॉक... सायबर फ्रॉड रोखण्यासाठी सरकारची मोठी कारवाई
12
जयंत पाटलांचं अजित पवारांना नवं चॅलेंज; "मोदींकडून एवढं काम करून घेतलं, तर..."
13
जोगेश्वरी पूर्व विधानसभा मतदारसंघावरून शिवसेना शिंदे गट आणि भाजपात रस्सीखेच
14
राहुल गांधी यांच्याविरोधात तामिळनाडुतील 30 पोलिस ठाण्यात तक्रारी; कारण काय?
15
ऑडिशनमध्ये १०० वेळा रिजेक्ट झाला 'हा' स्टारकिड; डिप्रेशनचाही केला सामना, म्हणाला...
16
"अक्षय शिंदेला गोळ्या घालून मारणं फारच सहज झालं, त्याला...", उदयनराजेंची संतप्त प्रतिक्रिया
17
"आता मी एकालाही जिवंत सोडणार नाही", अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरपूर्वी काय घडलं?
18
Harini Amarasuriya : हरिणी अमरसूर्या बनल्या श्रीलंकेच्या नव्या पंतप्रधान, या पदावर विराजमान होणाऱ्या देशातील दुसऱ्या महिला
19
IND vs BAN : दुसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी पोलिसांची मोठी कारवाई; 'त्या' २० जणांवर FIR दाखल
20
"आम्हा तिघांनाही CM व्हायचंय, पण निर्णय हायकमांडचा", रणदीप सुरजेवालांनी केले मोठे वक्तव्य

श्री बळी महाराज मंदिरात प्राणप्रतिष्ठा

By admin | Published: December 15, 2015 12:27 AM

सोहळा : हजारो भाविकांनी घेतला महाप्रसादाचा लाभ

नाशिक : मुंबई-आग्रा महामार्गावरील नूतन श्री बळी महाराज मंदिरात आज भक्तिभावात प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडला. यानिमित्त हजारो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. दोन दिवसांपासून सुरू असलेल्या सोहळ्याचा या कार्यक्रमाने आज समारोप झाला. संत जनार्दनस्वामी यांचे शिष्य स्वामी माधवगिरी महाराज यांच्या हस्ते सकाळी यज्ञाची पूर्णाहुती, मूर्ती प्राणप्रतिष्ठा,कलशारोहण, ध्वजारोहण आदि धार्मिक कार्यक्रम पार पडले. त्यानंतर माधवगिरी महाराजांनी बळी महाराजांविषयीच्या आख्यायिका आपल्या प्रवचनातून सांगितल्या. मान्यवरांच्या हस्ते महाआरती करण्यात आली व उपस्थित भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. यावेळी माजी खासदार प्रतापदादा सोनवणे, नगरसेवक उद्धव निमसे, रुची कुंभारकर, सुनील बागुल, विनायक पांडे, सुनीता निमसे, शिवाजी निमसे आदिंसह मान्यवरांची उपस्थिती होती. वेदमूर्ती अमोल जोशी यांनी पौरोहित्य केले. श्री बळीमहाराज अमर मित्रमंडळाच्या वतीने या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बाळू शिंदे, सुनील सूर्यवंशी, विलास सूर्यवंशी, संजय सूर्यवंशी, राजेंद्र खैरे, प्रकाश सूर्यवंशी, योगेश सोनवणे आदिंसह मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते. मुंबई-आग्रा महामार्गाच्या चौपदरीकरणामुळे जुने बळी मंदिर रस्त्याच्या मध्यभागी आले होते. त्यामुळे सदर मंदिर रस्त्याच्या कडेला स्थलांतरित करावे, अशी मागणी होती. त्यानुसार नूतन मंदिर उभारण्यात आले असून, आज विधिवत प्राणप्रतिष्ठा पार पडली. (प्रतिनिधी)