शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझा दौरा रद्द करणारा जन्माला यायचाय", अजित पवारांनी आपल्याच नेत्याला झापले
2
अजित पवारांमुळे मंत्रिपदे गेली, आता किमान १०-१२ जागा हव्यात; मित्रपक्षाने महायुतीच्या जागावाटपात टाकला खडा
3
"त्या माणसाने आमच्या तोंडावर दरवाजा बंद केला", सुप्रिया सुळेंनी सांगितला वाईट अनुभव
4
हरियाणा विधानसभा निवडणुकीत कास्टिंग काऊच? काँग्रेसच्या महिला नेत्याच्या आरोपाने खळबळ
5
या गावातील प्रत्येकाकडे स्वतःचे विमान; साखर-चहा पत्ती आणण्यासाठी विमानाचा वापर, कारण...
6
श्रीलंका: दिसानायकेंना राष्ट्रपती पदाने दिली तात्पुरती हुलकावणी; दुसऱ्या राऊंडची मतमोजणी सुरु
7
"मुलाच्या फीससाठी लोकांसमोर हात पसरावे लागले", मनीष सिसोदियांनी सांगितला 'तो' प्रसंग
8
कामगिरी सुधारण्यासाठी पाकिस्तानची वेगळी 'रणनीती', पाकिस्तान क्रिकेट बोर्ड लागले कामाला
9
सावधान! ऑफिस असो किंवा वर्क फ्रॉम होम; सतत खुर्चीवर बसणं खतरनाक, 'या' आजारांचा धोका
10
चंद्राबाबू नायडूंनी TTD वर केलेले आरोप बिनबुडाचे, त्यांच्यावर कारवाई व्हावी, जगनमोहन रेड्डींचं PM मोदींना पत्र 
11
Mamata Banerjee : "पश्चिम बंगालमधील पूर मानवनिर्मित, DVC ने न सांगता सोडलं पाणी"; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप
12
इराणच्या कोळसा खाणीत गॅस गळतीनंतर भीषण स्फोट; ५१ जणांचा मृत्यू
13
भारताला अमेरिका देणार 31 किलर ड्रोन्स; नरेंद्र मोदी आणि जो बायडेन यांच्यात 'डील डन'
14
सत्ता कुणाचीही येऊ देत, रामदास आठवलेंची जागा पक्की आहे- नितीन गडकरी
15
'यूपीआय'मध्ये मार्केटमध्ये PhonePe सुसाट! Google Pay, Paytm किती मागे?
16
video: दोन लाख रुपये देऊन बिहारचा तरुण बनला 'IPS' अधिकारी; पाहून पोलीसही चक्रावले...
17
"आम्ही कुणालाही सोडणार नाही!’’, तिरुपती लाडू भेसळीप्रकरणी आंध्र प्रदेश सरकार आक्रमक   
18
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोनाचा 'हा' नवा व्हेरिएंट किती खतरनाक, भारताला कितपत धोका?
19
"तुम्हाला दुःख झाले नाही का? देशाला सांगा", केजरीवालांचे मोहन भागवतांना पाच सवाल
20
IND vs BAN : "मला कोणी गिफ्ट दिलं नाही...", 'सामनावीर' अश्विनची मिश्किल प्रतिक्रिया, संघाला जिंकवलं

वावी ते श्रीक्षेत्र मढी पदयात्रेची तयारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 01, 2018 12:20 AM

रंगपंचमीच्या दिवशी श्रीक्षेत्र मढी (अहमदनगर) येथे भरणाºया श्री कानिफनाथ महाराज यांच्या यात्रोत्सवात सहभागी होण्यासाठी सिन्नर तालुक्यातील वावी येथून पायी दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवारी (दि.२) नाथभक्त मढीच्या दिशेने प्रस्थान करणार असून, यानिमित्त तयारी करण्यात येत आहे.

वावी : रंगपंचमीच्या दिवशी श्रीक्षेत्र मढी (अहमदनगर) येथे भरणाºया श्री कानिफनाथ महाराज यांच्या यात्रोत्सवात सहभागी होण्यासाठी सिन्नर तालुक्यातील वावी येथून पायी दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवारी (दि.२) नाथभक्त मढीच्या दिशेने प्रस्थान करणार असून, यानिमित्त तयारी करण्यात येत आहे.  वावी गावचे आराध्य दैवत असलेल्या कानिफनाथ महाराजांची श्रीक्षेत्र मढी येथे रंगपंचमीच्या दिवशी मोठी यात्रा भरते. रंगपंचमीच्या यात्रोत्सवात सहभागी होण्यासाठी दरवर्षी धूलिवंदन ते रंगपंचमी या काळात वावी येथून पदयात्रेचे आयोजन करण्यात येते. सुमारे ७०० नाथभक्त पायी दिंंडीने श्रीक्षेत्र मढी (ता. पाथर्डी) येथे जातात. येत्या शुक्रवारी निघणाºया पदयात्रेची तयारी सुरू असून, यात्रोत्सवात सहभागी होणारा रथ सजविण्यात आला आहे. पदयात्रेसाठी युवकांमध्ये विशेष उत्साह दिसून येत आहे. पापमोचनी एकादशी (दि. १३ ) ते फाल्गुन चतुदर्शी (दि. १६) पर्यंत भाविकांना समाधीचे दर्शन घेता येणार आहे.सुमारे ४५ वर्षांपासून परंपरेने चालत आलेल्या रंगपंचमी सोहळ्याच्या पदयात्रेत गेल्या १५ वर्षांपासून भाविकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. लोणी, कोल्हार, सोनई, शनिशिंंगणापूर, टाकळीमियाँ, मिरी, तिसगाव मार्गे जाणाºया पदयात्रेत भक्त दररोज ४० किलोमीटर अंतर पायी चालतात. पदयात्रेसोबत पिण्याच्या पाण्याचा टँकर, ट्रॅक्टर, टेम्पो आदी वाहने असतात.  गुरुवारी (दि. १) सकाळी ९ वाजता कोपरगाव आश्रमाचे प. पू. रमेशगिरी महाराज यांच्या हस्ते रथ, ध्वज व पालखीचे पूजन करण्यात येणार असून, सायंकाळी ६ वाजता कानिफनाथ महाराज रथाची गावातून सवाद्य मिरवणूक काढण्यात येणार आहे. शुक्रवारी (दि. २) सकाळी रथाचे मढीच्या दिशेने प्रस्थान होईल.  रंगपंचमीच्या दिवशी श्रीक्षेत्र मढी येथे भरणाºया यात्रेला महाराष्टÑातून लाखो भाविक हजेरी लावतात. यात्रोत्सवात वावीच्या काठीला विशेष मान असतो. वाजत गाजत मिरवणूक काढून काठीला कळसाचे दर्शन घडवले जाते. वावी पदयात्रा समितीने मढी येथे मुक्कामासाठी जागा विकत घेतली असून, या ठिकाणी पायी जाणारे नाथभक्त विसावतात. पदयात्रा काळात तिसगाव, सोनई, टाकळीमिया आदी गावांसह गावोगावी रथाचे पूजन करण्यात येऊन गावातून रथाची सवाद्य मिरवणूक काढण्यात येते. प्रत्येक गावातील गावकरी जल्लोषात स्वागत करतात. पदयात्रेनिमित्त वावी गावात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. पदयात्रेत जास्तीत जास्त भाविकांनी सहभागी होण्याचे आवाहन पदयात्रा संयोजक श्री कानिफनाथ मित्रमंडळ व ग्रामस्थांनी केले आहे.यावर्षी समाधीमंदिर चार दिवस खुलेभटक्यांची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाºया श्रीक्षेत्र मढी येथील यात्रोत्सव होळी ते गुढीपाडवा असा पंधरा दिवस असतो. रंगपंचमी व गुढीपाडवा या दोन दिवशी मोठी यात्रा भरते. यापूर्वी केवळ गुढीपाडव्याच्या दिवशी भाविकांना गाभाºयात जाऊन समाधीचे दर्शन घेता येत होते. त्यामुळे मोठी गर्दी होत असे. भाविकांना समाधीचे थेट दर्शन घेता यावे यासाठी समाधी मंदिर चार दिवस खुले ठेवण्याचा निर्णय संस्थानने घेतला आहे. 

टॅग्स :Nashikनाशिक