शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

येवल्यात ६ ओबीसी नगरसेवकांची अडचण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2021 04:10 IST

डिसेंबर २०१६मध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत येवला नगरपालिकेच्या १२ प्रभागांतून २४ सदस्य निवडून आलेले आहेत. यात ओबीसी आरक्षित जागेवर निवडून ...

डिसेंबर २०१६मध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत येवला नगरपालिकेच्या १२ प्रभागांतून २४ सदस्य निवडून आलेले आहेत. यात ओबीसी आरक्षित जागेवर निवडून आलेल्या शफिक शेख, तेहसीन शेख, साबीया मोमीन, अमजद शेख, नीता परदेशी, प्रवीण बनकर या सदस्यांना आता डिसेंबर २०२१ मध्ये होणाऱ्या निवडणुकीत सर्वसाधारण जागेचा पर्याय शोधावा लागणार आहे.

-----------------------------------------------------------

त्र्यंबकेश्वरीत पाच नगरसेवकांना धक्का

त्र्यंबक : येथील नगर परिषदेत ओबीसीसाठी २७ टक्क्यांच्या प्रमाणात पाच जागा आरक्षित होत्या. या जागांवर गेल्या निवडणुकीत स्वप्निल शेलार, शितल उगले, त्रिवेणी तुंगार, दीपक गिते आणि शिल्पा रामायणे हे उमेदवार निवडून आले होते. आता सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी आरक्षण रद्दचा निर्णय दिल्याने या नगरसेवकांसह इच्छुकांना अन्य सर्वसाधारण जागांचा पर्याय शोधावा लागणार आहे. दरम्यान, ओबीसी राखीव जागेवर निवडून आलेले नगरसेवक स्वप्नील शेलार यांनी सांगितले, ओबीसी आरक्षण रद्दचा निर्णय हा अन्यायकारक आहे. याबाबत राज्य सरकारने मुदतीत फेरयाचिका दाखल करण्याची गरज आहे. सरकार काही हालचाल करत नसेल तर आम्ही जनहित याचिका दाखल करू, अन्यथा आंदोलनाचा पर्याय असल्याचेही शेलार यांनी म्हटले आहे.

----------------------------------------------

मनमाडला ८ जागांवरील आरक्षण रद्द

मनमाड : येथील नगरपालिकेच्या नोव्हेंबर २०१६ मध्ये झालेल्या निवडणुकीसाठी ३१ वाॅर्डमधून १५ प्रभाग तयार करण्यात आले होते. यामध्ये ओबीसी प्रवर्गासाठी एकूण ८ जागांचे आरक्षण ठेवण्यात आले होते. यातील चार जागा या ओबीसी महिला प्रवर्गासाठी राखीव ठेवण्यात आल्या होत्या. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतील ओबीसी आरक्षण रद्द करण्यात आले असल्याने त्याचे परिणाम येत्या नोव्हेंबर डिसेंबरमध्ये होणाऱ्या पालिका निवडणुकीत दिसून येणार आहेत.

मनमाड पालिकेमध्ये कविता कोटकर, तबस्सुम कुरेशी, यास्मिन शेख, किरण शिंदे या चार महिला नगरसेवक ओबीसी महिला प्रवर्गातून निवडून आल्या आहेत, तर गणेश धात्रक, कैलास पाटील, महेंद्र शिरसाठ, प्रवीण नाईक हे नगरसेवक ओबीसी प्रवर्गातून विजयी झाले आहेत. या सर्व मातब्बर नगरसेवकांना येत्या निवडणुकीत सर्वसाधारण जागेवर निवडणूक लढवावी लागणार आहे. दरम्यान, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतील ओबीसी आरक्षण रद्द करण्याचा निर्णय हा विशिष्ट घटकांवर अन्याय करणारा आहे. याबाबत पुनर्विचार होणे आवश्यक असल्याचे शिवसेना नगरसेवक गणेश धात्रक यांनी सांगितले.