शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

बळीराजा मिरवणुकीद्वारे निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2017 00:22 IST

कर्जमाफीचे गाजर दाखवून राज्य सरकारने शेतकºयांची फसवणूक केली आहे. त्यामुळे फसवणुकीसह शेतकºयांच्या आत्महत्यांसाठीही सरकारला जबाबदार धरून राज्य सरकारवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी सुकाणू समितीने पोलीस आयुक्तांना दिलेल्या निवेदनाच्या माध्यमातून केली आहे. सरकारने केलेली कर्जमाफी फसवी असून, संपूर्ण कर्जमाफीसाठी राज्यभरातील विविध शेतकरी संघटना आजही आग्रही आहेत, अशी भूमिका घेत सुकाणू समितीने शहरात शुक्रवारी (दि.२०) बलीप्रतिपदेला गोल्फ क्लब ते अशोकस्तंभापर्यंत बळीराजा मिरणूक काढून सरकारविरोधी आंदोलन केले.

नाशिक : कर्जमाफीचे गाजर दाखवून राज्य सरकारने शेतकºयांची फसवणूक केली आहे. त्यामुळे फसवणुकीसह शेतकºयांच्या आत्महत्यांसाठीही सरकारला जबाबदार धरून राज्य सरकारवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी सुकाणू समितीने पोलीस आयुक्तांना दिलेल्या निवेदनाच्या माध्यमातून केली आहे. सरकारने केलेली कर्जमाफी फसवी असून, संपूर्ण कर्जमाफीसाठी राज्यभरातील विविध शेतकरी संघटना आजही आग्रही आहेत, अशी भूमिका घेत सुकाणू समितीने शहरात शुक्रवारी (दि.२०) बलीप्रतिपदेला गोल्फ क्लब ते अशोकस्तंभापर्यंत बळीराजा मिरणूक काढून सरकारविरोधी आंदोलन केले.  सरकारने केलेली कर्जमाफी फसवी आहे. संपूर्ण कर्जमाफीसाठी राज्यभरातील शेतकरी व वेगवेगळ्या शेतकरी संघटना आजही आग्रही आहोत, अशी भूमिका घेत सुकाणू समितीने शहरातून बळीराजा मिरवणूक काढली. सुकाणू समितीने सरकारवर कर्जमाफीचे गाजर दाखवून फसवणूक करण्याचा आरोप केला असून, सरकारवर गुन्हा दाखल करण्याची मागणी पोलीस आयुक्तांना दिलेल्या निवेदनाच्या माध्यमातून केली आहे.  सरकारने शेतकºयांना सरकट कर्जमाफीची घोषणा केली. परंतु, या प्रक्रियेतील जाचक अटींमुळे अनेक शेतकºयांना कर्जमाफीचा लाभ मिळणार नाही. सरकारच्या आकडेवारीनुसार राज्यभरात एक कोटी चार लाख शेतकरी आहेत. परंतु सरकारच्या जाचक अटींमुळे सुमारे ५८ लाख शेतकरी कर्जमाफीचे अर्जच करू शकलेले नाही, तर अर्ज करणाºया अनेक शेतकºयांनाही या प्रक्रियेतील जाचक अटींमुळे वगळले जाणार असल्याचे या निवेदनात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे  राज्यात कर्जमाफीची घोषणा होऊनही शेतकºयांच्या आत्महत्या सुरू आहे.  या आत्महत्यांना सरकारचे शेती विरोधी घोरण जबाबदार असून, अशा शेती व शेतकरी विरोधी धोरणातील अंमलबजावणी करणाºया सरकारवर शेतकºयांना आत्महत्येस प्रवृत्त करण्याचा गुन्हा दाखल करण्याची मागणी सुकाणू समितीने बळीराजा मिरवणुकीच्या माध्यमातून केली असून, या मागण्यांचे निवेदनही पोलीस आयुक्तांना दिले आहे. पोलीस प्रशासनातर्फे सरकारवाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सीताराम कोल्हे यांनी सुकाणू समितीचे निवेदन स्वीकारले. सुकाणू समितीने काढलेल्या या बळीराजाची मिरवणुकीत स्वाभिमानी शेतकरी संघटना, शरद जोशीप्रणीत शेतकरी संघटना, किसानसभा आदी विविध संघटनांच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसह शहर परिसरातील शेतकºयांनी सहभाग घेत आंदोलन करून राज्य सरकारचा निषेध केला.