शहरं
Join us  
Trending Stories
1
जरांगेंच्या तालावर मुख्यमंत्री नाचतात; ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाकेंची बोचरी टीका
2
"काशीचा प्रसाद मिळाला, तेव्हा माझ्या मनात तिरुपतीचा विचार आला", लाडू वादावर माजी राष्ट्रपतींनी व्यक्त केली चिंता
3
हिज्बुल्लाहची झोप उडवणाऱ्या कंपनीची CEO असणारी ही फिल्मी महिला आहे तरी कोण? 
4
पॅसेन्जरच्या जेवणात निघाला जिवंत उंदीर, कराव लागलं विमानाचं इमरजन्सी लॅन्डिंग; नेमकं काय घडलं?
5
मशिदीचे अतिक्रमित बांधकाम स्वतःहून काढण्यासाठी विश्वस्तांनी मागितली मुदत
6
तिरुपती बालाजींवर कुबेराचे ऋण; आजही भाविक फेडतात कर्ज! वाचा, लाडू प्रसादम अद्भूत गोष्टी
7
"राजानं प्रखर टीका सहन करुन चिंतन करायला हवं"; नितीन गडकरींचे मोठं वक्तव्य
8
३ महिन्यांपासून थंडावलेले डिफेन्स कंपन्यांचे स्टॉक्स; आता जोरदार तेजी; एकात लागलं अपर सर्किट
9
नवरी जोमात, नवरा कोमात! घरातून पळाली; बॉयफ्रेंडशी केलेल्या लग्नाचे पाठवले फोटो, पती म्हणतो...
10
पितृपक्षात महालक्ष्मी गजकेसरी योग: ९ राशींना वरदान काळ, सर्वोत्तम संधी; लाभच लाभ, शुभ होईल!
11
कुमारी सैलजा भाजपमध्ये सामील होणार? मनोहर लाल यांनी दिले संकेत; म्हणाले, "वेळ आल्यावर सर्व समजेल"
12
धारावीमध्ये तणाव! मशिदीचा बेकायदेशीर भाग पाडण्यासाठी गेलेल्या पथकाला रोखलं, गाडीची तोडफोड
13
डिविडेंड, व्याजाच्या पेमेंटवर SEBI चे नवे नियम; Mutual Funds साठीही गूड न्यूज
14
IND vs BAN : ...म्हणूनच जग बुमराहची कॉपी करतं; बांगलादेशच्या खेळाडूनं सांगितलं यशाचं कारण
15
भाजप मावळमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मदत करणार; सुनील शेळकेंचा गंभीर आरोप
16
जबरदस्त कमबॅक! शतकी तोरा दाखवत पंतनं केली MS धोनीच्या विक्रमाशी बरोबरी
17
"मंदिरांचं नियंत्रण हिंदू समाजाला मिळावं", तिरुपती लाडू प्रसादाच्या वादात विहिंपची मागणी
18
Sukesh Chandrasekhar : "बेबी गर्ल! कोणी इतकं सुंदर कसं असू शकतं..."; जॅकलिनशिवाय जगणं महाठग सुकेशसाठी अवघड
19
आधी वन हँड सिक्सर! मग चक्क बांगलादेशची फिल्डिंग सेट करताना दिसला पंत (VIDEO)
20
दहावी नापास अय्यूबचा लग्नाच्या नावाखाली ५० महिलांना गंडा; 'असा' अडकवायचा जाळ्यात

प्रदूषण टाळण्यासाठी लोकसहभाग अत्यंत महत्त्वाचा - अमर दुर्गुळे 

By suyog.joshi | Published: September 21, 2023 2:11 PM

प्रदूषण टाळण्यासाठी परिसरात निर्माण होणारा कचरा जाळू नये, असे आवाहन महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे नाशिकचे उपप्रादेशिक अधिकारी अमर दुर्गुळे यांनी ‘लोकमत’शी बोलताना केले.

नाशिक : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर प्रदूषण टाळण्यासाठी लोकसहभाग अत्यंत महत्त्वाचा आहे. या काळात नागरिकांनी निर्माल्य आपल्या जवळपासच्या कोणत्याही नदीपात्रात टाकू नये. महानगर पालिकेच्या निर्माल्य कुंडातच टाकावे. प्रदूषण टाळण्यासाठी परिसरात निर्माण होणारा कचरा जाळू नये, असे आवाहन महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे नाशिकचे उपप्रादेशिक अधिकारी अमर दुर्गुळे यांनी ‘लोकमत’शी बोलताना केले.

यावेळी दुर्गुळे म्हणाले, नाशिक शहरामधील हवेचे प्रदूषण शक्यतो करून धूलीकण वाढल्याने दिसून येते. यामध्ये रस्त्यांची झालेली दुरवस्था व मोठ्या प्रमाणात होणारी वाहतूक यामुळे धुळीचे कण पुन्हा पुन्हा हवेमध्ये तरंगत राहतात. तसेच, शहरामध्ये मोठ्या प्रमाणात होणारे बांधकाम, जुन्या वस्तू पाडणे यामधून निघालेला चिखल यांच्या वाहतुकीमुळे धूलीकण वाढण्याची शक्यता असते. 

शहरात होणारी वाहतूक कोंडी ती सुद्धा प्रदूषणात भर घालते. यावर उपाययोजना म्हणून रस्त्यांची नियमित दुरुस्ती, साफसफाई करणे आवश्यक आहे. तसेच वाहतूक कोंडी टाळणे व वाहतुकीचे सामान नेणारी नियमावली करून बंदिस्त वाहतूक करणे. वाहतूक योग्य नियंत्रण करणे आदी गोष्टी आवश्यक आहेत. नाशिक जिल्ह्यातील सातपूर व अंबड औद्योगिक परिसरामध्ये उद्योगामध्ये फरनेस ऑइल वापरणे बंदी आहे. 

त्यामुळे उद्योगाने हरित इंधन तसेच, एलपीजी, सीएनजी या इंधनाचा वापर करण्याबाबत पुढाकार घेतला असून, मोठ्या तसेच मध्यम दहा ते १२ उद्योगांनी त्यांच्या उद्योगामध्ये हरित इंधनाचा वापर सुरू केला आहे. तसेच सातपूर, अंबड परिसरामध्ये गॅस पाइपलाइन याद्वारे उद्योगांना, इंधनपुरवठा करण्यासाठी महानगर गॅस लिमिटेड यांनी पाइपलाइन केलेली आहे. तसेच सदर इंधनामुळे हवेचे प्रदूषण कमी होण्यास मदत होईल.

उद्योगांकडे स्वत:ची सांडपाणी प्रक्रियानाशिकमधील सातपूर, अंबड औद्योगिक वसाहतीमध्ये छोट्या व मध्यम उद्योगांकडे स्वत:ची सांडपाणी प्रक्रिया यंत्रणा असून, प्रक्रियाकृत सांडपाणी हे पुन्हा उद्योगामध्ये काही प्रमाणात वापरले जाते. तर काही उर्वरित पाणी हे बागांसाठी वापरले जाते. तसेच ११० उद्योगांनी त्यांच्या उद्योगातून निर्माण होणारे सांडपाण्यावर प्रक्रिया करून कचऱ्याचे पाणी हे पुन:श्च वापरून न वापरणे योग्य पाणी त्याचे बाष्पीभवन करून शून्य निकष प्रक्रिया केली जाते. परंतु औद्योगिक परिसरामध्ये निर्माण होणारे घरगुती सांडपाणी (टाॅयलेट व इतर वापर) याच्यावर प्रक्रिया करण्यासाठी तसेच ते वाहून नेण्यासाठी कोणतीही सयंत्रणा नसल्याने बऱ्याच वेळा ते घरगुती सांडपाणी हे व आजूबाजूचे सांडपाणी हे नाल्यातून नदीत मिसळते. त्यावर प्रक्रिया करणे आवश्यक असल्याचे दुर्गुळे यांनी सांगितले.

मनपाने सांडपाणी प्रक्रिया अद्ययावत करावेबराच वेळा जलमल वाहून नेणाऱ्या वाहिन्या या फुटल्यामुळे किंवा ओव्हर फ्लो झाल्यामुळे ते सांडपाणी नाल्यातून नदीत मिसळते. तसेच बऱ्याच घरगुती संकुलांचे सांडपाणी हे सांडपाणी वाहून नेणाऱ्या व्यवस्थेशी जोडले नसल्याने ते पाणी नदीत मिसळते. त्यावर मनपाने तत्काळ उपाययाेजना करणे गरजेचे आहे. तसेच महाराष्ट्र औद्योगिक विकास मंडळाने औद्यागिक सांडपाणी यंत्रणा (सीईटीपी) ही लवकरात लवकर उभारणी करणे आवश्यक आहे. सध्या अस्तित्वात असलेली महानगरपालिकेचे जुने सांडपाणी प्रक्रिया केंद्र (एसटीपी) अद्ययावत करणे आवश्यक आहे. जेणेकरून सांडपाण्यावर प्रक्रिया केल्यानंतर ते पाणी हे इतर दुय्यम वापरासाठी तसेच रस्ते सफाई किंवा दुय्यम औद्योगिक वापर किंवा बांधकाम व्यवसायामध्ये त्याचा पुन:श्च वापर करता येऊ शकतो, असेही ते शेवटी म्हणाले.

पर्यावरण जागृतीराज्य प्रदूषण नियंत्रण मंडळातर्फे स्वच्छ अभियानांतर्गत सायकल रॅली काढण्यात आली. त्यात राज्यभरातील सायकलपटूंनी सहभाग घेतला. त्यातून हवेत प्रदूषण होऊ नये म्हणून जनजागृती करण्यात आली. प्लास्टिकचा वापर कमी करावा, असा संदेश देण्यात आला. राज्यभरात सुमारे २० हजार कागदी पिशव्यांचे वाटप करण्यात आले. 

टॅग्स :Nashikनाशिक