शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

रस्त्याच्या कामासाठी सार्वजनिक नळपाणीपुरवठा योजनेचे पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2019 17:42 IST

सिन्नर : तालुक्यातील दोडी बुद्रुक येथे ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात येत असलेल्या रस्त्याच्या कामासाठी चक्क सार्वजनिक नळ पाणी पुरवठा योजनेच्या पाण्याचा वापर केला जात असल्याची बाब उघडकीस आली आहे.

सिन्नर : तालुक्यातील दोडी बुद्रुक येथे ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात येत असलेल्या रस्त्याच्या कामासाठी चक्क सार्वजनिक नळ पाणी पुरवठा योजनेच्या पाण्याचा वापर केला जात असल्याची बाब उघडकीस आली आहे. दुष्काळी परिस्थिती असतानाही ग्रामपंचायत प्रशासन मनमानी कारभार करत असल्याचा आरोप करत गावातील ग्रामस्थांनी याबाबत पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी यांच्याकडे लेखी तक्रार करून चौकशी करण्याची मागणी निवेदनात केली आहे.गटविकास अधिकारी डॉ. लता गायकवाड यांची दोडी बुद्रुक येथील ग्रामस्थांनी भेट घेवून तक्रार केली आहे. मनेगावसह सोळा गाव नळपाणी पुरवठा योजनेतून गावाला पाणी पुरवठा केला जात आहे. योजनेचे पाणी गावातील सार्वजनिक विहिरीत सोडण्यात येते व त्यानतंर गावात वितरित केले जाते. दोडी ग्रामपंचायत मार्फत ग्रामनिधीतून सर्व्हीस रोड ते जलशुद्धीकरण शेडपर्यंत रस्त्याचे काम सुरु आहे. सदर कामावर संबंधित ठेकेदार मुरूम दाबण्यासाठी सार्वजनिक विहीरीतील पाण्याचा राजरोसपणे वापर केला जात असल्याने एकप्रकारे पिण्याच्या पाण्याची नासाडी होत असल्याची तक्रार निवेदनात करण्यात आली आहे. तालुक्यात व येथे दुष्काळी परिस्थिती असून माणसांचा व जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर असताना अशाप्रकारे पाण्याचा गैरवापर केला जात असल्याचेही निवेदनात म्हटले आहे. सदरचा टँकर हा सहा हजार लिटर क्षमतेचा असून असे पंधरा ते वीस टँकरच्या खेपा सदर कामासाठी वापरण्यात आल्या असल्याचा आरोप निवेदनात केला आहे.

टॅग्स :Waterपाणी