शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद गंभीर धोका; संयुक्त राष्ट्रांच्या मंचावरुन पीएम नरेंद्र मोदींनी दिला इशारा
2
"शाळेचे संचालक अजूनही का सापडलेले नाहीत?", अक्षय शिंदे चकमकीत ठार झाल्यानंतर आदित्य ठाकरेंचा सवाल
3
"जगन मोहन रेड्डींचे मन शुद्ध असेल तर...", तिरुपती लाडू वादावरून पवण कल्याण यांचा निशाणा
4
Devendra Fadnavis on Badlapur Case Akshay Shinde Encounter: "पोलिसांवर गोळ्या चालवल्या तर..."; देवेंद्र फडणवीसांचे अक्षय शिंदे एन्काऊंटरवर रोखठोक मत
5
अक्षय शिंदे चकमक प्रकरणाची चौकशी व्हावी, नातलगांची मागणी 
6
बदलापूर अत्याचार प्रकरण: अक्षय शिंदे एन्काऊंटरवर नाना पटोले यांचे सरकारला ३ महत्त्वाचे प्रश्न
7
Sharad Pawar on Akshay Shinde Encounter: बदलापूर अत्याचार प्रकरण: अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरवर शरद पवारांचे ट्विट, काय म्हणाले?
8
"प्रकरण दडपण्यासाठी हे एन्काऊंटरचे फेक नॅरेटिव्ह", अक्षय शिंदे चकमकीत ठार झाल्यानंतर अनिल देशमुखांचा आरोप
9
"पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न आहे का?", बदलापूर प्रकरणातील आरोपी चकमकीत ठार, विजय वडेट्टीवारांचा सवाल
10
CM Eknath Shinde on Akshay Shinde Encounter: "ज्याने माणुसकीला काळीमा फासला..."; CM एकनाथ शिंदे अक्षयच्या एन्काऊंटरवर स्पष्टच बोलले
11
अक्षय शिंदे आणि पोलिसांची चकमक ठाण्यात नेमकी कुठे झाली? Inside Story
12
Badlapur Case Accused Akshay Shinde, Police Encounter: बदलापूर अत्याचार प्रकरण: आरोपी अक्षय शिंदे पोलीस चकमकीत ठार! पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी केला गोळीबार
13
बदलापूर प्रकरणातील आरोपी चकमकीत ठार! उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
14
अनिल अंबानी यांच्या मुलावर SEBI ची कारवाई; 'या' प्रकरणात ठोठावला कोट्यवधीचा दंड
15
"माझ्या पोराला पैसे देऊन मारून टाकलं", अक्षय शिंदेच्या आईचे गंभीर आरोप, दुपारीच घेतली होती भेट
16
भारतात मंकीपॉक्सचा रुग्ण आढळला, क्लेड १ बी व्हायरसची लागण, आरोग्य यंत्रणा सतर्क
17
'या' दिवसापासून भाजप राबवणार मेगा सदस्यत्व अभियान, एक कोटी लोकांना जोडण्याचे लक्ष्य
18
रोहित पवारांना राम शिंदेंचा धक्का! कर्जत-जामखेडमधील दोन नेते भाजपात
19
Video: बापरे! अजगराचा महिलेला विळखा, दोन तास मृत्यूशी झुंज, श्वास घेणेही कठीण; अखेर...
20
"लहान आणि मोठे हुड्डा यांच्यात लढाई सुरू आहे...", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल, कुमारी सैलजा यांच्यावरही निशाणा

हवा-पाणी शुद्धतेवर प्रश्नचिन्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2017 12:07 AM

नाशिक : महापालिकेचे मुख्यालय असलेल्या राजीव गांधी भवन परिसरातच हवेचा गुणवत्ता निर्देशांक सर्वसाधारण तर गतवर्षाच्या तुलनेत पाणी शुद्धतेच्या टक्केवारीत घट झाल्याचे निष्कर्ष नोंदविले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : महापालिकेचे मुख्यालय असलेल्या राजीव गांधी भवन परिसरातच हवेचा गुणवत्ता निर्देशांक सर्वसाधारण तर गतवर्षाच्या तुलनेत पाणी शुद्धतेच्या टक्केवारीत घट झाल्याचे निष्कर्ष मनपाच्याच आरोग्य व पर्यावरण विभागाने नोंदविले आहेत. याशिवाय, शहरातील ध्वनिप्रदूषणाच्या पातळीतही कमालीची वाढ झाल्याचे नोंदविण्यात आले आहे. महापालिकेच्या आरोग्य व पर्यावरण विभागाने वार्षिक पर्यावरण मापन अहवाल महासभेला सादर केला. त्यात, हवा, पाणी आणि ध्वनिप्रदूषणाच्या पातळीविषयी निष्कर्ष नोंदवितानाच काही उपाययोजनाही सुचविण्यात आल्या आहेत. हवा गुणवत्ता निर्देशांकाबाबत अहवालात चार पैकी दोन ठिकाणी चांगला तर दोन ठिकाणी सर्वसाधारण दर्जा देण्यात आला आहे. विशेष म्हणजे महापालिका मुख्यालय असलेल्या राजीव गांधी भवन परिसरात हवेचा गुणवत्ता निर्देशांक ४५.० असा सर्वसाधारण नोंदविण्यात आला आहे. सातपूर औद्योगिक वसाहतीतील व्हीआयपी कंपनी परिसरातही हवेचा गुणवत्ता निर्देशांक ४०.५० असा सर्वसाधारणच आहे. मात्र, उद्योग भवन, गोल्फ क्लबजवळील आरटीओ कॉलनी याठिकाणी निर्देशांक चांगला असल्याचे म्हटले आहे. हवेबरोबरच पाण्याच्या शुद्धतेविषयीही प्रश्नचिन्ह आहे.  सन २०१५ मध्ये १७ हजार ८८२ पाण्याचे नमुने तपासण्यात आले असता त्यातील १७ हजार ५१३ नमुने पिण्यायोग्य आढळून आले. टक्केवारीचे प्रमाण ९७.९४ होते. सन २०१६ मध्ये १० हजार १५८ नमुने तपासण्यात येऊन त्यातील ९९८७ नमुने पिण्यायोग्य आढळून आले. टक्केवारीचे प्रमाण ९७.३१ राहिले. मात्र, सन २०१६ मध्ये तपासणीसाठी पाणी नमुने घेण्याचे प्रमाण का घटले याबाबत प्रश्न उपस्थित होऊ शकतो. शहरातील ध्वनिप्रदूषणाच्या पातळीतही वाढ झाल्याचा निष्कर्ष नोंदविण्यात आला आहे. निवासी क्षेत्रात ध्वनी मर्यादा ५५ डेसिबलच्या आत असणे बंधनकारक आहे. मात्र, शहरात दिवसा ८७ डेसिबलपर्यंत तर रात्री ७० डेसिबलपर्यंत ध्वनी पातळीचे प्रमाण गेल्याचे अहवालात म्हटले आहे. बाजारपेठ परिसरातही ध्वनी पातळीच्या प्रमाणात वाढ झालेली आहे. सुचविण्यात आलेले उपाय अहवालात काही उपायही सुचविण्यात आले आहेत. त्यात प्रदूषण नियंत्रण मंडळाबरोबर समन्वय साधून शहरातील कारखाने व परिसरात हवा प्रदूषण नियंत्रण यंत्र बसवावे. ऋतुमानानुसार हवामानावर देखरेख ठेवणे व त्याच्या नोंदी घेणे, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अद्ययावत करणे, वृक्षारोपणावर भर देणे, सिग्नल्सवर प्रदूषण कमी करणारी यंत्रणा बसविणे, प्रक्रिया न केलेले सांडपाणी नदीपात्रात मिसळू न देणे, कारखान्यांमधून बाहेर पडणाऱ्या रासायनिक सांडपाण्यावर जागेवरच प्रक्रिया करणे, जलशुद्धीकरण प्रक्रियेत सुधारणा करणे, नदीपात्रातील निर्माल्य व घाण-कचरा टाकण्यास प्रतिबंध करणे, ध्वनिप्रदूषणाला आळा घालण्यासाठी प्रभावी योजना राबविणे आदी सूचनांचा समावेश आहे.