शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायली नागरिक अचानक भारत सोडून जाऊ लागले; पर्यटनाचे बुकिंग रद्द, विमाने फुल
2
"एकनाथ शिंदे दावोसमध्ये हॉटेलचं बिल न देताच..." जयंत पाटलांचा मुख्यमंत्र्यांना खोचक टोला
3
'सुप्रिया सुळेंना फुकटचं खायची सवय, १५०० दिले तर पवारांच्या...', भाजप आमदाराची टीका
4
Smart SIP Vs Regular SIP : स्मार्ट आणि रेग्युलर SIP मध्ये फरक काय, ५००० रुपयांतून २३ लाखांची होईल अधिक कमाई; कशी?
5
"सिंचन घोटाळा झाल्याचं पंतप्रधान मोदींनीच कबूल केलं"; पृथ्वीराज चव्हाणांनी अजित पवारांना पुन्हा डिवचलं
6
शाळेतून परतणाऱ्या मुलींची छेड काढणाऱ्यांचा 'हाफ एन्काऊंटर'; आरोपींचा पोलिसांवर गोळीबार
7
Suraj Chavan : १४ लाख अन् १० लाखांचा व्हाऊचर आणि..., बिग बॉस जिंकल्यानंतर सूरज चव्हाणला किती रुपये मिळाले?
8
'तो जिंकला अन् १ तासात गाणं तयार केलं', उत्कर्ष शिंदेने बनवलेलं सूरज चव्हाणवरचं धमाकेदार गाणं ऐकाच
9
अमेरिकेच्या अ‍ॅडवायझरीनंतर कराची विमानतळाबाहेर बॉम्बस्फोट; दोन परदेशी नागरिकांचा मृत्यू
10
छत्रपतींचे स्मारक कधी होणार? संभाजीराजेंचे टार्गेट भाजप; अरबी समुद्रात शिवस्मारक शोध आंदोलन
11
ओलाच्या सर्व्हिसवरून कुणाल कामरा-भाविश अग्रवाल भिडले; लोकांनी मालकाला आरसा दाखविला...
12
"शिवसेना वाढण्यासाठी हजारो शिवसैनिकांच्या हत्या"; रामदास कदमांचे वक्तव्य, म्हणाले "उद्धव ठाकरेंना याची..."
13
आजचे राशीभविष्य ७ ऑक्टोबर २०२४; धनलाभ होईल, येणारी बातमी...
14
“स्मारकाविरोधात कोर्टात जाणारे कोण तेही बघा”; देवेंद्र फडणवीसांचा संभाजीराजेंवर पलटवार
15
'त्या' सगळ्यांना पुन्हा पक्षात प्रवेश देणार: ठाकरे, शिंदेसेनेचे माजी नगरसेवक उद्धवसेनेत
16
“हिऱ्याच्या पोटी गारगोटी, मुलाशी का, बापाशी भिडा”; CM एकनाथ शिंदेंचे उद्धव ठाकरेंना आव्हान
17
“लोकसभेची गणिते वेगळी होती, मनसेबाबत महायुतीचे वरिष्ठ नेते निर्णय घेतील”: श्रीकांत शिंदे
18
मराठी अभिजात भाषा झाली तरी जल्लोष का नाही?: राज ठाकरे, पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या
19
चांगल्यांचा सन्मान अन् वाईटांना शिक्षा करीत नाही ते म्हणजे सरकार: नितीन गडकरी
20
चेंबूरमध्ये अग्नितांडव, दुकानातील रॉकेलच्या साठ्याचा भडका; एकाच कुटुंबातील ७ जणांचा मृत्यू

रांगांमुळे सामान्य नागरिकांचेच हाल : आदित्य ठाकरे

By admin | Published: November 16, 2016 12:39 AM

रांगांमुळे सामान्य नागरिकांचेच हाल : आदित्य ठाकरे

नाशिक : एका रात्रीतून नोटा बदलण्याचा निर्णय घेतल्याने लोकांना प्रचंड अडचणींचा सामना करावा लागत आहे. सामान्य नागरिकांचेच प्रचंड हाल होत असल्याची टीका युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव न घेता केली. नाशिक येथील विद्यार्थ्यांना टॅब वितरणासाठी आदित्य ठाकरे आले होते, त्यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते. विद्यार्थ्यांची दप्तरापासून सुटका करण्याचा प्रयत्न शिवसेनेचा असून, त्यासाठी मुंबई महापालिकांतर्गत तब्बल ४८० शाळांमधील १० हजार विद्यार्थ्यांना टॅबचे वितरण करण्यात आले आहे. मुंबईमध्ये व्हर्च्युअल क्लासरूम तयार करण्यात आले असून, वितरित करण्यात आलेल्या टॅबमध्ये इंग्रजी, मराठी, हिंदी, गुजराथी या भाषांतील पुस्तकांचा समावेश आहे. इंग्रजी, सेमी इंग्रजी आणि मराठी भाषांतील शाळांमध्ये वाटप करण्यात आलेल्या टॅबमध्ये नवनितच्या पुस्तकांचे स्कॅनिंग करून डिजिटल रूपात पुस्तके विद्यार्थ्यांच्या हाती देण्याचा आपला मानस असल्याचे त्यांनी सांगितले. राज्यातील सर्वच विद्यार्थ्यांना दप्तराच्या ओझ्यातून सुटका करण्यासाठी टॅबचे वितरण करण्यात यावे अशी मागणी मागील वर्षीच आपण शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्याकडे केली असून, त्यावर सरकारने निर्णय घेणे अद्याप बाकी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ५०० व १००० च्या नोटा चलनातून बाद करण्याच्या निर्णयामुळे सर्वसामान्य नागरिकांनाच मोठा त्रास सहन करावा लागत आहे. लोकांना अडचणी येत आहे. शिवसेनेची याबाबतची भूमिका उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केली आहे. अर्थमंत्री अरुण जेटली यांच्याकडे युटीलिटी पेमेंट पाठविण्याची मुदत ३० डिसेंबरपर्यंत वाढवून देण्याची मागणी शिवसेनेने केली आहे. यावेळी ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे, खासदार हेमंत गोडसे, जिल्हाप्रमुख विजय करंजकर, महानगरप्रमुख अजय बोरस्ते आदि उपस्थित होते. (प्रतिनिधी)