शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
3
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
4
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
5
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
6
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
7
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
8
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
9
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
10
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
11
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
12
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
13
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
14
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
15
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
16
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
17
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
18
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
19
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
20
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!

राहू-केतूचे शुक्लकाष्ठ संपणार, राजकीय बदल अन् कोरोनापासून भयमुक्ती

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2022 11:45 IST

ज्योतिषाचार्यांचे मत : राजकीय बदल अन् कोरोनापासून भयमुक्ती

नाशिक : गेल्या दोन वर्षांपासून कोरोना विषाणूजन्य साथीने ग्रासलेल्या जगाला एप्रिल महिना दिलासादायक आनंदवार्ता घेऊन येणार आहे. एप्रिल महिन्यात ९ ग्रहांचे राशी परिवर्तन होणार असून, त्यामुळे वेगवेगळ्या क्षेत्रात सकारात्मक बदलांचे संकेत ज्योतिष तज्ज्ञांनी दिले आहेत. 

अनेकांच्या आयुष्यातील राहू-केतुचे शुक्लकाष्ठ संपणार असून राजकारणातही आमूलाग्र बदल अपेक्षित आहेत. विशेषत: ७ एप्रिल रोजी मंगळ बदलत असल्याने शनि व मंगळाची कोंडी सुटणार असून अनुकूल परिस्थिती निर्माण होणार असल्याचे मत नाशिक येथील ज्योतिषाचार्य पंडित अतुलशास्त्री भगरे गुरुजी यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले आहे. एप्रिल २०२२ मध्ये एक नव्हे तर ९ ग्रहांचे राशी परिवर्तन होणार आहे. ही एक अद्भुत खगोलीय घटना मानली जात असून त्याविषयी ज्याेतिषतज्ज्ञांनी चांगल्या परिणामांचे संकेत दिले आहेत. याबाबत अतुलशास्त्री भगरे गुरुजी यांनी सांगितले, राहू हा १६ मार्च रोजीच बदलला आहे. राहू व केतू हे एकाचवेळी बदलत असतात. तर रवी, बुध, शुक्र हे दर महिन्याला बदलतात. आता एप्रिल महिन्यात मंगळ व गुरू या ग्रहांचे राशी परिवर्तन होत असून त्यामुळे अनेक सकारात्मक बदल पाहावयास मिळणार आहेत. ७ एप्रिल रोजी मंगळ ग्रह बदलणार आहे तर गुरू हा कुंभ राशीतून मीन राशीत प्रवेश करणार आहे. तेव्हा खऱ्या अर्थाने बदल पाहावयास मिळणार आहेत. शनि व मंगळ हे दोन शत्रू आहेत. त्यांची कोंडी सुटणार आहे. त्यामुळे वैयक्तिक मानवी जीवनापासून राजकीय, सामाजिक, आर्थिक, कृषि, शैक्षणिक क्षेत्रात अनुकूल स्थिती बघायला मिळणार आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याPoliticsराजकारण