शहरं
Join us  
Trending Stories
1
Mamata Banerjee : "बंगालमध्ये पुरामुळे विध्वंस, अनेक जिल्हे बुडाले"; ममता बॅनर्जींनी मोदींना लिहिलं पत्र, मागितली मदत
2
सर्वोच्च न्यायालयाचे यूट्यूब चॅनल हॅक, सगळे व्हिडीओ गायब, काय दिसतंय?
3
FSSAI चौकशी करणार, दोषींवर कारवाई होणार; तिरुपती लाडू वादावर आरोग्यमंत्र्यांची प्रतिक्रिया
4
शाळा-कॉलेजात टॉपर, १३ गोल्ड मेडल; सरकारी अधिकारी होण्यासाठी नाकारली परदेशातील नोकरी
5
'...तर आज काश्मीर पाकिस्तानचा भाग असता', मेहबुबा मुफ्ती यांच्या वक्तव्याने नवा वाद
6
एकीकडे सुरक्षेची चिंता, तर दुसरीकडे दुबईत शॉपिंग करताना दिसला सलमान खान; Video व्हायरल
7
'कुछ कुछ होता है' मधील शाहरुखची लेक 'अंजली' आता दिसते अशी, फोटो पाहून तुम्हीही व्हाल थक्क
8
"त्यांच्या तोंडांनाही टाळं लागलंय", PM मोदींनी महाविकास आघाडीवर चढवला हल्ला
9
Haryana Election : "आम्हाला संधी मिळाली तर अधिकारी...", काँग्रेस उमेदवार विनेश फोगाटचा मोठा दावा
10
PAN कार्डासाठी ऑनलाइन अर्ज कसा कराल? अवघ्या काही दिवसांत घरपोच मिळेल
11
दिल्लीतील सहा मंदिरांवर वक्फ बोर्डाने ठोकला दावा, अल्पसंख्याक आयोगाच्या अहवालातून समोर आली माहिती  
12
कसे तयार केले जातात तिरुपतीचे लाडू? 300 वर्षांत 6 वेळा बदलली रेसिपी, वर्षाला होते 500 कोटींची कमाई!
13
पितृपक्ष: तुळस ठरेल भाग्यकारक, ‘हे’ उपाय करा; शुभ-लाभ मिळवा, पितरांसह होईल लक्ष्मी कृपा!
14
मराठा तेवढाच मिळवावा, ओबीसी संपवावा असं मुख्यमंत्र्यांचं धोरण; लक्ष्मण हाकेंचा आरोप
15
पितृपक्षात संकष्टी चतुर्थी: ‘असे’ करा व्रत, गणपती होईल प्रसन्न; पाहा, चंद्रोदय वेळ, मान्यता
16
कोण आहेत न्यायाधीश श्रीशानंद? ज्यांनी मुस्लीम परिसराचा उल्लेख केला पाकिस्तान
17
"माझा तरुण मुलगा गेला, आरोपीला जामीन मिळाला, हा कोणता कायदा?"; आईने फोडला टाहो
18
अब तक ४००! फिरकीच्या बालेकिल्ल्यात बुमराहचा कल्ला; ३ विकेट्स घेताच गाठला मैलाचा पल्ला
19
घडलं असं काही की डिलिव्हरी बॉयने आयुष्यच संपवले; 'सुसाईड नोट'मुळे फुटली वाचा
20
पितृपक्ष: कालसर्प योगाचे चंद्राला ग्रहण, ८ राशींना शुभ काळ; पद-पैसा वाढ, अपार सुख-समृद्धी!

पावसाने कोट्यवधींना धुतले

By admin | Published: August 05, 2016 1:17 AM

पुराचा फटका : फर्निचर, विक्रीच्या वस्तू भिजल्या; आठ फुटांपर्यंत दुकानांमध्ये पाणी

नाशिक : गेल्या मंगळवारी आलेल्या महापुराचे पाणी सराफ बाजार, भांडी बाजार, कापड बाजारात शिरल्याने संपूर्ण बाजारपेठेला पुराचा वेढा पडला होता. सराफी व्यावसायिकांच्या जवळपास तीनशेहून अधिक दुकानांसह भांडी-कापड बाजारातील सर्व दुकाने पाण्याखाली गेली होती. या पुराचा फटका बाजारपेठेला मोठ्या प्रमाणावर बसला असून, कोट्यवधीचे नुकसान झाल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.सराफी व्यावसायिकांच्या दुकानांमध्ये सुमारे आठ फुटापर्यंत पाणी साचल्याने सर्व फर्निचर, सीसीटीव्ही कॅमेरे, संगणक, वायरिंग, पीओपी, बल्ब, मांडण्या, खुर्च्यांची दुर्दशा झाली आहे. पाण्यामध्ये सर्व दुकाने बुडाल्यामुळे संपूर्ण बाजारपेठच कोलमडून पडली आहे. बुधवारी सकाळपासून तर गुरुवारपर्यंत (दि.४) बहुसंख्य विक्रेत्यांकडून दुकानांची आवरासावर सुरू होती. बाजारपेठेतील व्यवसाय पूर्वपदावर येण्यासाठी सुमारे एक आठवड्याचा कालावधी लागणार असल्याचा अंदाज व्यावसायिकांनी वर्तविला आहे. कापड व भांडी विक्रेत्यांचे सर्वाधिक नुकसान झाले आहे. चिखलाने दुकानांमधील संपूर्ण माल माखला आहे. त्यामुळे कापडाची विक्री करणेही अवघड होत असल्याचे विक्रेत्यांचे म्हणणे आहे. तसेच भांडी बाजारात विक्रेते मागील दोन दिवसांपासून चिखलाने भरलेली भांडी धूत पुन्हा चकाकी देण्याचा प्रयत्न करताना दिसून आले; मात्र भांड्यांचे नावीन्य हरपल्याने निम्म्या किमतीत विक्री क रण्यास गुरुवारी दुपारनंतर विक्रेत्यांनी सुरुवात केली.२००८च्या तुलनेने यावर्षी महापुराच्या पाण्याने खूप नुकसान झाले नाही. कारण आपत्ती व्यवस्थापनाकडून पुराच्या अगोदरच संपूर्ण बाजारपेठांमध्ये सतर्कतेचा इशारा देत विक्रीच्या वस्तू व अन्य साहित्य सुरक्षितस्थळी हलविण्याची सूचना देण्यात आली होती. त्यामुळे गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग वाढेपर्यंत जे व्यापारी मंगळवारी शहरात होते त्यांनी तत्काळ विक्री मालाचे स्थलांतर केले; मात्र फर्निचर व अन्य वस्तू हलविणे बहुसंख्य विक्रेत्यांना शक्य झाले नाही आणि जे व्यापारी मंगळवारच्या सुटीमुळे बाहेरगावी गेलेले होते त्यांना पुराचा अधिक फटका बसला. (प्रतिनिधी)