शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याच्या राजकारणात काय शिजतंय?; विधानसभेपूर्वीच महायुतीत मोठा भूकंप होण्याची शक्यता
2
मुख्यमंत्रिपदाबाबत बाळासाहेब थोरातांचं विधान; नाना पटोलेंच्या नावाला विरोध?
3
शरद पवार गटाच्या मतदारसंघावर दावा; विधानसभा निवडणुकीत वसंत मोरेंची होणार कोंडी?
4
IND vs BAN : मॅचनंतर बायकोनं टाकली 'गुगली'! प्रीतीनं अशी घेतली अश्विनची फिरकी (VIDEO)   
5
६ वर्षांच्या मुलीला माकडांनी बलात्काराची शिकार होण्यापासून वाचवले, जबरदस्ती करणाऱ्या इसमाला फटकावले
6
धक्कादायक! UPSC ची तयारी करणाऱ्या युवकाचा मृतदेह जंगलात सापडला, हत्या की आत्महत्या?
7
पडळकरांकडून सरकारविरोधातच आंदोलनाचं हत्यार; रास्ता रोकोसाठी धनगर समााजाला केलं महत्त्वाचं आवाहन 
8
रेखा झुनझुनवाला यांचे सुपरहिट स्टॉक्स, २०२४ मध्ये दिलाय ८९% परतावा; पाहा कोणते आहेत शेअर्स?
9
Maharashtra Assembly Elections : हरियाणा-काश्मीरनंतर आता महाराष्ट्र विधानसभेचे बिगुल वाजणार! निवडणूक आयोगाने तयारी केली सुरू
10
Maharashtra Politics : शिवसेना शिंदे गटात पक्षातंर्गत वाद?; भरत गोगावलेंच्या गौप्यस्फोटानं उडाली खळबळ
11
सिनेट निवडणुकीत चुरस; शिंदेगटाच्या युवासेनेचे 'अभाविप'शी फाटले; पाठिंबा काढला
12
Pitru Paksha 2024: आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी पितृपक्षातील अष्टमीला करा 'गजलक्ष्मी व्रत'!
13
महाविकास आघाडीत विदर्भ-मुंबईचा तिढा; मुंबईत उद्धवसेनेला २२, तर विदर्भात काँग्रेसला हव्या ४५ जागा
14
ATM Card वर मिळतो १० लाखांपर्यंतचा फ्री इन्शूरन्स; पाहा केव्हा घेता येतो या सुविधेचा लाभ?
15
रश्मी ठाकरे पुढच्या मुख्यमंत्री...! कलानगरात झळकले बॅनर्स, राजकीय वर्तुळात चर्चा
16
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: नोकरी व व्यापारात लाभ होतील; अचानक धन प्राप्ती होईल
17
चार हजार वर्षांपूर्वीच्या प्राचीन वस्तू अमेरिका भारताला देणार; पंतप्रधानांनी मानले आभार
18
अग्रलेख : पंतप्रधान पुन्हा आक्रमक; महायुतीची सत्ता टिकविण्यासाठी भाजप पुन्हा सरसावला
19
मराठा, ओबीसी आरक्षणावरून तणाव कायम; वडीगोद्रीत दोन्ही समाजांचे आंदोलक रस्त्यावर
20
सर्व्हे सांगतात, मविआला मुंबईत २२ जागा मिळणार

पावसाची पुन्हा हजेरी

By admin | Published: August 06, 2016 1:27 AM

पावसाची पुन्हा हजेरी

नाशिक : गुरुवारी दिवसभर विश्रांती घेतलेल्या पावसाने शुक्रवारी नाशिकसह जिल्ह्यातील ग्रामीण भागात दिवसभर आपली हजेरी कायम ठेवून पुन्हा एकदा जनजीवन विस्कळीत केले. येत्या चोवीस तासांत उत्तर महाराष्ट्रात पुन्हा अतिवृष्टी होण्याचा इशारा हवामान खात्याने दिल्यामुळे गंगापूरसह अन्य धरणांतून थांबविलेला विसर्ग पुन्हा सुरू करण्यात आल्याने नद्या, नाल्यांना पूर येण्याचा धोका निर्माण झाला आहे. सोमवार ते बुधवार असे सलग तीन दिवस झोडपून काढणाऱ्या पावसाने गुरुवारी विश्रांती घेतल्यामुळे मंगळवारच्या पुरात नुकसान झालेल्या पूरग्रस्तांना सावरण्यासाठी चांगलाच अवधी मिळाला. जनजीवन सुरळीत होत असतानाच शुक्रवारी सकाळपासून पुन्हा श्रावणसरींनी हजेरी लावली. सकाळीच पावसाने हजेरी लावल्यामुळे नोकरी, धंद्यासाठी बाहेर पडलेल्या नागरिकांची तारांबळ उडाली, तर मुलांनाही पावसापासून बचाव करीत शाळा गाठावी लागली. त्यानंतर दिवसभर पाऊस कायम राहिला. नाशिक शहरात शुक्रवारी सकाळी आठ ते पाच वाजेपर्यंत ३ मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आलेली असली तरी, पाच वाजेनंतर पावसाचा जोर चांगलाच वाढला, रात्री उशिरापर्यंत हा जोर कमी अधिक होता. जिल्ह्णातही पावसाने हजेरी कायम ठेवली. सकाळी आठ ते पाच वाजेपर्यंत १९२ मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली. त्यामुळे गुरुवारी रात्रीनंतर कमी करण्यात आलेला धरणातील विसर्ग पुन्हा सायंकाळी पाच वाजेनंतर पाटबंधारे खात्याने वाढविला. येत्या चोवीस तासात उत्तर मध्य महाराष्ट्रात पुन्हा अतिवृष्टीचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. धरणातील विसर्गपावसाचा जोर वाढल्यामुळे जिल्ह्णातील धरणांमधून पाण्याचा विसर्ग वाढविण्यात आला आहे. सकाळी दहा वाजेपर्यंत गंगापूर धरणातून गोदावरी नदीत १२९६ क्युसेक पाण्याचा विसर्ग केला जात होता; मात्र सायंकाळी पाच वाजेनंतर धरणक्षेत्रातील पावसाचा जोर पाहता तो ६१६९ क्युसेकने वाढविण्यात आला. जिल्ह्णातील अन्य धरणांतून सायंकाळी पाच वाजता करण्यात आलेला विसर्ग पुढील प्रमाणे-भावली-८७२, पालखेड-६००६, करंजवण-१०००, वाघाड-१७३०, पुणेगाव-५७३, दारणा-१५४१२, भावली-४८१, वालदेवी-१०५० क्युसेक पाणी सोडण्यात आले आहे. दक्षतेचे आदेशहवामान खात्याने दिलेल्या इशाऱ्यानुसार येत्या चोवीस तासांत उत्तर मध्य महाराष्ट्रात १२४ ते २४४ मिलीमीटर पाऊस होण्याची शक्यता वर्तविण्यात आल्याने जिल्ह्णातील धरणांमधून पाण्याचा विसर्ग वाढविण्यात येणार आहे. त्यामुळे नदी,नाल्याकाठच्या गावांना सावधानतेचे आदेश देण्यात आले आहेत.