शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

येवल्यात पाऊस मनसोक्त बरसला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2019 18:42 IST

मानोरी : येवला तालुक्यातील पश्चिम भागातील मानोरी, मुखेड फाटा, परिसरात दमदार पाऊस तर नेऊरगाव, निमगाव मढ आदी परिसरात अती मूसळधार पावसाने शनिवारी (दि.२२) रात्री अकरा वाजेच्या सुमारास विजांच्या गडगडाटासह मान्सूनच्या पहिल्याच पावसाने धडाकेबाज आगमन करत बळीराजाला मोठा दिलासा दिला.

ठळक मुद्दे तीन तासांत तालक्यात ५४ मिलिमीटर पावसाची नोंदमानोरी परिसरात अजून एका दमदार पावसाची प्रतीक्षा

मानोरी : येवला तालुक्यातील पश्चिम भागातील मानोरी, मुखेड फाटा, परिसरात दमदार पाऊस तर नेऊरगाव, निमगाव मढ आदी परिसरात अती मूसळधार पावसाने शनिवारी (दि.२२) रात्री अकरा वाजेच्या सुमारास विजांच्या गडगडाटासह मान्सूनच्या पहिल्याच पावसाने धडाकेबाज आगमन करत बळीराजाला मोठा दिलासा दिला.गेल्या सहा ते सात महिन्यापासून दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या येवला तालुक्यातील पश्चिम भागात कुणी पाणी देत का पाणी म्हणण्याची वेळ शेतकरी वर्गावर ओढवली होती. निमगाव मढ परिसरात हजारो क्विंटल कांदा पावसाने खराब झाला तर पिकांचे, भाजीपाल्याचे मोठे नुकसान झाले असून निमगाव मढ, ब्राम्हणगाव परिसरात पावसाने रस्ता देखील या अचानक आलेल्या जोरदार पावसामुळे खचला आहे. दोन ते तीन तास चाललेल्या या पावसाने नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यात सर्वाधिक ५४ मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली.गत पंधरा दिवसापूर्वी येवला तालुक्यात मान्सून पूर्व अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला होता. आण ियाच अवकाळी पावसामुळे खरीप हंगामातील पिकांच्या मशागतीला शेतकऱ्यांनी सुरु वात केली होती. त्यानंतर पंधरा दिवस उन्हाचा पारा वाढला होता दिवसरात्र केवळ जोराचा वारा सुटत होतापाऊस येतो की नाही याची मोठी भीती व्यक्त केली जात होती. त्यामुळे या पंधरा दिवसात शेतकरी वर्गाला गत वर्षीच्या आठवणी ताज्या होत यंदाही खरीप हंगामातील पिकांची लागवड उशिरा करावी लागणार की काय अशी चर्चा सर्वत्र रंगू लागली होती.शनिवारी झालेला पाऊस जोराचा होता खरा, पण त्याचे पाणी वावरात न थांबता मोठ्या प्रमाणात वाहून गेले असल्याने जमिनीत समाधानकारक ओलावा निर्माण न झाल्याने खरीप हंगामातील पिकांची लागवड करावी की नाही अशी द्विधा मानोरी परिसरातील शेतकºयांना लागली आहे.रस्त्याच्याकडेला असलेल्या नाल्यामध्ये पावसाचे पाणी तुडुंब भरून वाहत होता तर गोई नदीतील मोठे खड्डे पावसाच्या पाण्याने तुडुंब भरले होते. महिन्याभरापासून येवला तालुक्यात केवळ टोमॅटोच्या लागवडीसाठी शेतकरी वर्ग दिसून येत होता. मात्र या पावसामुळे येवला तालुक्यातील पश्चिम भागातील काही ठिकाणी पेरणी योग्य पाऊस झाला असून मका, सोयाबीन, खतांच्या खरेदीसाठी शेतकरी वर्गाने कृषी केंद्रात गर्दी केली असल्याचे दिसून येत आहे.मानोरी, देशमाने, मुखेड, खडकीमाळ आदी परिसरात अजून असाच एक मुसळधार पडल्यास हमखास खरीप हंगामातील पिकांच्या लागवडीस शेतकरी लागणार असल्याचे बोलले जात आहे. रविवारी (दि.२३) सकाळ पासूनच पुन्हा ढगाळ वातावरण होते. तसेच वाºयाचा वेग पूर्ण कमी झाल्याने दमट वातावरण होते आणि विशेष बाब म्हणजे रविवारी पूर्ण दिवस सुर्यनारायणाने दर्शन दिले नव्हते.