शहरं
Join us  
Trending Stories
1
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
2
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
3
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
4
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
5
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
6
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
7
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
8
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
9
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
10
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
11
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
12
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
13
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
14
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
15
टी२० क्रिकेटमध्ये ऋषभ पंत अपयशी का ठरतोय? चेतेश्वर पुजाराने सांगितलं त्यामागचं कारण!
16
आयपीएल २०२५ मध्ये हेनरिक क्लासेनं मारला सर्वात लांब षटकार, पाहा टॉप १० खेळाडूंची यादी
17
'ओयो'विरोधात तक्रार करणारा रिसॉर्ट मालकच आला अडचणीत; अग्रवाल यांच्यावर दाखल झाला होतो गुन्हा
18
...तोपर्यंत तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांचा पगार जप्त करा, हायकोर्टाचे आदेश, कारण काय? 
19
पहलगाम हल्ल्यातील जखमींसाठी मुकेश अंबानींची मोठी घोषणा; म्हणाले 'दहशतवाद हा मानवतेचा शत्रू..'
20
शिमला कराराने सुटलेले भारत-पाकिस्तानमधील वाद; आता पाक देतोय रद्द करण्याची धमकी...

माझ्या हातात सत्ता द्या, भोंगे बंद करून दाखवतो : राज ठाकरे

By suyog.joshi | Updated: March 9, 2024 15:49 IST

मनसेच्या वर्धापन दिनानिमित्त सोहळ्यात हिंदुत्वाचा हुंकार

नाशिक : सध्याचे राजकारण म्हणजे आळवावरचं पाणी झालं आहे. कोण कोणत्या पक्षात अन कोण कोणाबरोबर हेच समजत नाही. वरून दाखवायला वेगळे व आतून सर्व जण एकच असल्याचा टोला लगावत माझ्या हातात सत्ता द्या, मी भोंगे बंद करून दाखवतो असं म्हणत मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जोरदार हल्लाबोल केला. मुंबई येथील पक्षाच्या गुढीपाडवा मेळाव्यात पक्षाची भूमिका जाहीर करू असेही ते म्हणाले. शहरातील दादासाहेब गायकवाड सभागृहात मनसेच्या अठराव्या वर्धापनदिन सोहळ्यानिमित्त शनिवारी आयोजित सभेत ठाकरे यांनी आपल्या २८ मिनिटांच्या भाषणात सध्याच्या राजकारणावर प्रहार केला.

व्यासपीठावर पक्षाचे नेते बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई, अविनाश अभ्यंकर, अभिजित पानसरे, अमित ठाकरे, संदीप देशपांडे, प्रदेश उपाध्यक्ष सलिम शेख, शहराध्यक्ष सुदाम कोंबडे आदींसह पदाधिकारी उपस्थित हाेते. ते म्हणाले, जनसंघ म्हणजे आताचा भाजपा, शिवसेना व मनसे हेच खरे तीन पक्ष आहेत. राष्ट्रवादीला पक्ष म्हणणार नाही. कारण राष्ट्रवादी म्हणजे निवडून येणाऱ्यांची मोळी आहे. शरद पवार हेच करत आले. त्यांना सोबत घेतात. दुसरीकडे गेले तरी ते निवडून येणारच असे सांगत ठाकरे म्हणाले, पक्षाच्या वर्धापनदिनाच्या १८ वर्षात चढ कमी पण उतारच जास्त पाहायला मिळाले. त्यात तुम्हा सर्वांचे चांगले सहकार्य मिळाले. १८ वर्षात पक्षाने केलेली सर्व आंदोलने यशस्वी करून दाखविली. जरांगे पाटील यांनी मी तेव्हाच म्हटलो होतो, आरक्षणासाठी तांत्रिक अडचण आहे, अनेक मोर्चे निघाले. सरकारच्या भुल थापांना बळी पडू नका. खोट आश्वासने सरकार देत असल्याचे ठाकरे यांनी टिकास्त्र सोडले. सूत्रसंचलन पराग शिंत्रे यांनी केले.माझ्या कडेवरती माझीच पोरं खेळवायची आहेत...

सध्याच्या राजकारणावर राज ठाकरे यांनी चांगलीच तोफ डागली. कोण कोणत्या पक्षात अन कोण कोणाबरोबर हेच समजत नाही. त्यामुळे माझ्या कडेवरती माझीच पोरं खेळवायची आहेत, इतरांची नाही. दुसऱ्याची पोरं आपल्या कड्यावर घेऊन खेळवायची मला हौस नाही असा टोला त्यांनी सध्या महाराष्ट्रातील राजकीय स्थितीवर लगावला.

महाराष्ट्र घडवायचाय...आपल्याला महाराष्ट्र घडवायचा आहे. जे जे काही शक्य असेल ते या महाराष्ट्रासाठी करूया. जातीपातीचं राजकारण करायचे नसून छत्रपती शिवाजी महाराजांनी १८ पगड जातीच्या लोकांना एकत्र आणले होते. त्यांचा आदर्श आजच्या राजकारण्यांनी घेण्याची गरज असल्याचे ठाकरे यांनी सांगितले.

टॅग्स :MNSमनसेRaj Thackerayराज ठाकरेNashikनाशिक